शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

खैरी धरणात ४२ टक्के जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 22:28 IST

तालुक्यात खैरी धरणाची जल साठवणूक क्षमता १६ दशलक्ष घनमीटर आहे. मागील वर्षी हे धरण १०० टक्के भरून दोनदा ओव्हरफ्लो झाले होते. पण यावर्षी एकदाही ओव्हरफ्लो झाले नाही. आॅक्टोबर महिन्याच्या शेवटी या जलशयात फक्त ४२ टक्के जलसाठा आहे.

ठळक मुद्देअनधिकृत मोटारपंप बंद करणार : ३१ आॅक्टोबरपासून मोहीम राबविणार

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा (घा.) : तालुक्यात खैरी धरणाची जल साठवणूक क्षमता १६ दशलक्ष घनमीटर आहे. मागील वर्षी हे धरण १०० टक्के भरून दोनदा ओव्हरफ्लो झाले होते. पण यावर्षी एकदाही ओव्हरफ्लो झाले नाही. आॅक्टोबर महिन्याच्या शेवटी या जलशयात फक्त ४२ टक्के जलसाठा आहे. यापैकी ३० टक्के पाणी जलयोजनेसाठी राखून ठेवला जातो. तर १२ टक्के पाणी गुराच्या पिण्यासाठी सुरक्षित ठेवले जाते. त्यामुळे या धरणाच्या पाण्याचा होणारा उपसा तत्काळ थांबवावा अशी मागणी कारंजा नगर पंचायतने केली आहे.खैरी धरणात आजच्या घडीला रब्बी पिकाच्या सिंचनाकरिता पाणी शिल्लक नसतानाही, अनधिकृतपणे ५० हून अधिक मोटरपंप द्वारे पाण्याचा उपसा खुलेआम सुरू आहे. पाण्याचा उपसा मोटरपंपाद्वारे असाच सुरू राहिल्यास डिसेंबरमध्ये धरण पूर्णपणे खाली होवून पिण्याचे पाणी मिळणार नाही आणि गुरांच्या पिण्याचा प्रश्न निर्माण होईल अशी अवस्था निर्माण झाली आहे. ३ किंवा ५ अश्वशक्तीच्या मोटरपंपद्वारे सिंचनासाठी होत असलेला पाण्याचा उपसा त्वरित थांबवावा, अशी लेखी तक्रार कारंजा नगरपंचायत अध्यक्षा कल्पना मस्की व उपाध्यक्ष नितीन दर्यापूरकर यांनी केली आहे.या खैरी धरणावर नारा व २२ गावाची पाणी पुरवठा योजना कारंजा शहराची पाणी पुरवठा योजना आणि लोहारी सावंगी येथील जलपुरवठा योजना कार्यान्वित आहे. या तिन्ही मोठ्या जलपुरवठा योजना पुढील पावसाळा येईपर्यंत सुरू राहण्यासाठी धरणात ३० टक्के पाणी साठा शिल्लक असणे अत्यावश्यक आहे. अन्यथा संबंधित २५ गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची भीषण समस्या निर्माण होईल.पुढील भीषण परिस्थिती निर्माण होवू नये म्हणून कार प्रकल्पाच्या सहा. अभियंता सचिन गाढे यांनी धरणा शेजारच्या गावातील ग्रामपंचायतीना रब्बी पिकासाठी कॅनलद्वारे पाणी पुरवठा होणार नाही, असे कळविले आहे. तसेच मोटरपंपद्वारे सिंचनासाठी पाणी उपसा करणाऱ्यांना सुद्धा कडक सुचना देण्यात आल्या आहेत. पण लोक ऐकायला तयार नाहीत. शेवटी नाईलाजाने भविष्यात निर्माण होणारे पेयजलसंकट टाळण्यासाठी वर्धा जिल्हाधिकारी व नागपूर जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेवून ३१ आॅक्टोबर २०१८ पासून अनधिकृत मोटरपंप बंद करून जप्त करण्याची विशेष मोहीम पोलिसांच्या सहकार्याने राबविली जाणार आहे.

न जुमानणाऱ्या शेतकऱ्यांवर कारवाई करणारमागील वर्षीपर्यंत धरणात भरपूर पाणी असल्याने ३० शेतकऱ्यांना मोटरपंपाद्वारे सिंचनासाठी परवानगी दिलेली होती. यावर्षी धरणात ४२ टक्के पाणी असल्यामुळे एकाही शेतकºयाला विद्युत मोटरने पाणी उपसा करण्याची परवानगी दिलेली नाही. तरी काही शेतकरी जबरदस्तीने सिंचनासाठी मोटरपंपद्वारे पाणी उपसा करीत आहे. सुरू असलेले सर्व विद्युत मोटरपंप ३१ आॅक्टोबरपासून विशेष मोहीम राबवून बंद करू न जुमानणाºया शेतकऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करून कडक कारवाई करू असे सांगितले.कारंजा नगर पंचायतने सुद्धा पाण्याचा गैरवापर व उधळपट्टी थांबविण्यासाठी टिल्लूपंप वापरू नका, नळांना तोट्या लावा, वाहने दररोज धुवू नका, नवीन घर बांधणीसाठी पिण्याचे पाणी वापरू नका अशा सूचना केल्या आहेत- पल्लवी राऊत, नगराधिकारी, कारंजा (घा.)

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पwater shortageपाणीटंचाई