शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

खैरी धरणात ४२ टक्के जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 22:28 IST

तालुक्यात खैरी धरणाची जल साठवणूक क्षमता १६ दशलक्ष घनमीटर आहे. मागील वर्षी हे धरण १०० टक्के भरून दोनदा ओव्हरफ्लो झाले होते. पण यावर्षी एकदाही ओव्हरफ्लो झाले नाही. आॅक्टोबर महिन्याच्या शेवटी या जलशयात फक्त ४२ टक्के जलसाठा आहे.

ठळक मुद्देअनधिकृत मोटारपंप बंद करणार : ३१ आॅक्टोबरपासून मोहीम राबविणार

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा (घा.) : तालुक्यात खैरी धरणाची जल साठवणूक क्षमता १६ दशलक्ष घनमीटर आहे. मागील वर्षी हे धरण १०० टक्के भरून दोनदा ओव्हरफ्लो झाले होते. पण यावर्षी एकदाही ओव्हरफ्लो झाले नाही. आॅक्टोबर महिन्याच्या शेवटी या जलशयात फक्त ४२ टक्के जलसाठा आहे. यापैकी ३० टक्के पाणी जलयोजनेसाठी राखून ठेवला जातो. तर १२ टक्के पाणी गुराच्या पिण्यासाठी सुरक्षित ठेवले जाते. त्यामुळे या धरणाच्या पाण्याचा होणारा उपसा तत्काळ थांबवावा अशी मागणी कारंजा नगर पंचायतने केली आहे.खैरी धरणात आजच्या घडीला रब्बी पिकाच्या सिंचनाकरिता पाणी शिल्लक नसतानाही, अनधिकृतपणे ५० हून अधिक मोटरपंप द्वारे पाण्याचा उपसा खुलेआम सुरू आहे. पाण्याचा उपसा मोटरपंपाद्वारे असाच सुरू राहिल्यास डिसेंबरमध्ये धरण पूर्णपणे खाली होवून पिण्याचे पाणी मिळणार नाही आणि गुरांच्या पिण्याचा प्रश्न निर्माण होईल अशी अवस्था निर्माण झाली आहे. ३ किंवा ५ अश्वशक्तीच्या मोटरपंपद्वारे सिंचनासाठी होत असलेला पाण्याचा उपसा त्वरित थांबवावा, अशी लेखी तक्रार कारंजा नगरपंचायत अध्यक्षा कल्पना मस्की व उपाध्यक्ष नितीन दर्यापूरकर यांनी केली आहे.या खैरी धरणावर नारा व २२ गावाची पाणी पुरवठा योजना कारंजा शहराची पाणी पुरवठा योजना आणि लोहारी सावंगी येथील जलपुरवठा योजना कार्यान्वित आहे. या तिन्ही मोठ्या जलपुरवठा योजना पुढील पावसाळा येईपर्यंत सुरू राहण्यासाठी धरणात ३० टक्के पाणी साठा शिल्लक असणे अत्यावश्यक आहे. अन्यथा संबंधित २५ गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची भीषण समस्या निर्माण होईल.पुढील भीषण परिस्थिती निर्माण होवू नये म्हणून कार प्रकल्पाच्या सहा. अभियंता सचिन गाढे यांनी धरणा शेजारच्या गावातील ग्रामपंचायतीना रब्बी पिकासाठी कॅनलद्वारे पाणी पुरवठा होणार नाही, असे कळविले आहे. तसेच मोटरपंपद्वारे सिंचनासाठी पाणी उपसा करणाऱ्यांना सुद्धा कडक सुचना देण्यात आल्या आहेत. पण लोक ऐकायला तयार नाहीत. शेवटी नाईलाजाने भविष्यात निर्माण होणारे पेयजलसंकट टाळण्यासाठी वर्धा जिल्हाधिकारी व नागपूर जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेवून ३१ आॅक्टोबर २०१८ पासून अनधिकृत मोटरपंप बंद करून जप्त करण्याची विशेष मोहीम पोलिसांच्या सहकार्याने राबविली जाणार आहे.

न जुमानणाऱ्या शेतकऱ्यांवर कारवाई करणारमागील वर्षीपर्यंत धरणात भरपूर पाणी असल्याने ३० शेतकऱ्यांना मोटरपंपाद्वारे सिंचनासाठी परवानगी दिलेली होती. यावर्षी धरणात ४२ टक्के पाणी असल्यामुळे एकाही शेतकºयाला विद्युत मोटरने पाणी उपसा करण्याची परवानगी दिलेली नाही. तरी काही शेतकरी जबरदस्तीने सिंचनासाठी मोटरपंपद्वारे पाणी उपसा करीत आहे. सुरू असलेले सर्व विद्युत मोटरपंप ३१ आॅक्टोबरपासून विशेष मोहीम राबवून बंद करू न जुमानणाºया शेतकऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करून कडक कारवाई करू असे सांगितले.कारंजा नगर पंचायतने सुद्धा पाण्याचा गैरवापर व उधळपट्टी थांबविण्यासाठी टिल्लूपंप वापरू नका, नळांना तोट्या लावा, वाहने दररोज धुवू नका, नवीन घर बांधणीसाठी पिण्याचे पाणी वापरू नका अशा सूचना केल्या आहेत- पल्लवी राऊत, नगराधिकारी, कारंजा (घा.)

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पwater shortageपाणीटंचाई