शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

वर्धा जिल्ह्यातील पावणेचारशे गावे तहानलेलीच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 14:40 IST

यावर्षी झालेल्या अत्यल्प पर्जन्यमानामुळे भूगर्भातील पाणी पातळी खालावली असून जिल्ह्यातील १३ जलाशयांमध्ये केवळ १३.४३ टक्केच जलसाठा उपलब्ध आहे.

ठळक मुद्देअत्यल्प पर्जन्यमानाचा फटका केवळ १३.४३ टक्के जलसाठा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : यावर्षी झालेल्या अत्यल्प पर्जन्यमानामुळे भूगर्भातील पाणी पातळी खालावली असून जिल्ह्यातील १३ जलाशयांमध्ये केवळ १३.४३ टक्केच जलसाठा उपलब्ध आहे. मार्च महिन्यातच जिल्ह्यातील बहुतांश गावांना कमी-जास्त प्रमाणात पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत असताना जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या आकडेवारीवरून ३७३ गावे तहानलेली असल्याचे स्पष्ट होते. मार्च महिन्यातच ही स्थिती असून जून महिन्यापर्यंत जलसाठा टिकविण्याचे मोठे आव्हान प्रशासनापुढे उभे ठाकले आहे.जिल्ह्यात आर्वी, आष्टी, कारंजा, वर्धा, सेलू, देवळी, हिंगणघाट व समुद्रपूर असे आठ तालुके असून सद्यस्थितीत आर्वी, आष्टी, कारंजा व समुद्रपूर तालुक्यात नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. या परिसरात पहाटेपासूनच पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती करावी लागत आहे. सोबतच इतरही तालुक्यात पाणीबाणी निर्माण झाल्याने कुठे चार तर कुठे आठ दिवसांआठ पाणी पुरवठा केला जात आहे. जिल्ह्यात १३८७ गावांमिळून ४२९ ग्रामपंचायती आहेत. यातील अर्ध्याअधिक गावांमध्ये फेब्रुवारी महिन्यापासूनच पाणीटंचाईच्या झळा बसायला सुरुवात झाली. दिवसेंदिवस ही स्थिती गंभीर होत असताना जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाची उपाययोजना कागदोपत्रीच असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.पाणीपुरवठा विभागाचे कागदी घोडेजिल्ह्यातील पाणी टंचाईसंदर्भात ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने ३७३ गावांकरिता ९५४ उपाययोजनांसाठी १५ कोटी ५९ लाख २५ हजार रुपयांचा आराखडा तयार केला आहे. यामध्ये नवीन विंधन विहीर घेणे, नळ पाणीपुरवठा योजनेची विशेष दुरुस्ती, विंधन विहिरीची विशेष दुरुस्ती, तात्पुरती पूरक नळ योजना, टँकर किंवा बैलगाडीने पाणीपुरवठा करणे, विहिरी खोल करणे व गाळ काढणे, विहीर अधिग्रहण करणे, झिरे व बुडक्या घेणे, प्रगतिपथावरील योजना पूर्ण करणे, विंधन विहिरीचे जलभंजन करणे आदी उपाययोजनांचा समावेश आहे. पण, आतापर्यंत ग्रामीण आर्वी तालुक्यात नांदपूर, बेल्हारा, सालदरा, सावंगी (पो.), पिंपळगाव (व.) जागखुटा व दिघी या ठिकाणी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. आतापर्यंत सात विहिरींचे अधिग्रहण झाले असून पाचची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली आहे.

जलाशयात उपलब्ध असलेल्या जलसाठ्याचे योग्य नियोजन करण्यात आले आहे. पाण्याचा काटकसरीने वापर व्हावा यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, नगरपालिका आदींना सूचना देण्यात आल्या आहेत. महिन्यातून एकदाच या जलाशयातून पाणी सोडले जाणार असून त्याची उचल करून संबंधितांनी त्या पाण्याचा पुरवठा नागरिकांना करणे अपेक्षित आहे.एस. बी. काळे, कार्यकारी अभियंतापाटबंधारे विभाग, वर्धा

टॅग्स :Waterपाणी