शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विधानसभा निवडणुकीचा फैसला; ५ कोटी मतांच्या मोजणीकडे देशाचे लक्ष! मतमोजणीची वेळ काय?
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
4
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
5
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
6
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
7
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
8
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
9
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
10
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
11
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
12
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
13
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
14
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
15
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
16
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
17
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
18
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
19
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
20
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
Daily Top 2Weekly Top 5

वर्धा जिल्ह्यातील पावणेचारशे गावे तहानलेलीच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 14:40 IST

यावर्षी झालेल्या अत्यल्प पर्जन्यमानामुळे भूगर्भातील पाणी पातळी खालावली असून जिल्ह्यातील १३ जलाशयांमध्ये केवळ १३.४३ टक्केच जलसाठा उपलब्ध आहे.

ठळक मुद्देअत्यल्प पर्जन्यमानाचा फटका केवळ १३.४३ टक्के जलसाठा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : यावर्षी झालेल्या अत्यल्प पर्जन्यमानामुळे भूगर्भातील पाणी पातळी खालावली असून जिल्ह्यातील १३ जलाशयांमध्ये केवळ १३.४३ टक्केच जलसाठा उपलब्ध आहे. मार्च महिन्यातच जिल्ह्यातील बहुतांश गावांना कमी-जास्त प्रमाणात पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत असताना जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या आकडेवारीवरून ३७३ गावे तहानलेली असल्याचे स्पष्ट होते. मार्च महिन्यातच ही स्थिती असून जून महिन्यापर्यंत जलसाठा टिकविण्याचे मोठे आव्हान प्रशासनापुढे उभे ठाकले आहे.जिल्ह्यात आर्वी, आष्टी, कारंजा, वर्धा, सेलू, देवळी, हिंगणघाट व समुद्रपूर असे आठ तालुके असून सद्यस्थितीत आर्वी, आष्टी, कारंजा व समुद्रपूर तालुक्यात नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. या परिसरात पहाटेपासूनच पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती करावी लागत आहे. सोबतच इतरही तालुक्यात पाणीबाणी निर्माण झाल्याने कुठे चार तर कुठे आठ दिवसांआठ पाणी पुरवठा केला जात आहे. जिल्ह्यात १३८७ गावांमिळून ४२९ ग्रामपंचायती आहेत. यातील अर्ध्याअधिक गावांमध्ये फेब्रुवारी महिन्यापासूनच पाणीटंचाईच्या झळा बसायला सुरुवात झाली. दिवसेंदिवस ही स्थिती गंभीर होत असताना जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाची उपाययोजना कागदोपत्रीच असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.पाणीपुरवठा विभागाचे कागदी घोडेजिल्ह्यातील पाणी टंचाईसंदर्भात ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने ३७३ गावांकरिता ९५४ उपाययोजनांसाठी १५ कोटी ५९ लाख २५ हजार रुपयांचा आराखडा तयार केला आहे. यामध्ये नवीन विंधन विहीर घेणे, नळ पाणीपुरवठा योजनेची विशेष दुरुस्ती, विंधन विहिरीची विशेष दुरुस्ती, तात्पुरती पूरक नळ योजना, टँकर किंवा बैलगाडीने पाणीपुरवठा करणे, विहिरी खोल करणे व गाळ काढणे, विहीर अधिग्रहण करणे, झिरे व बुडक्या घेणे, प्रगतिपथावरील योजना पूर्ण करणे, विंधन विहिरीचे जलभंजन करणे आदी उपाययोजनांचा समावेश आहे. पण, आतापर्यंत ग्रामीण आर्वी तालुक्यात नांदपूर, बेल्हारा, सालदरा, सावंगी (पो.), पिंपळगाव (व.) जागखुटा व दिघी या ठिकाणी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. आतापर्यंत सात विहिरींचे अधिग्रहण झाले असून पाचची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली आहे.

जलाशयात उपलब्ध असलेल्या जलसाठ्याचे योग्य नियोजन करण्यात आले आहे. पाण्याचा काटकसरीने वापर व्हावा यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, नगरपालिका आदींना सूचना देण्यात आल्या आहेत. महिन्यातून एकदाच या जलाशयातून पाणी सोडले जाणार असून त्याची उचल करून संबंधितांनी त्या पाण्याचा पुरवठा नागरिकांना करणे अपेक्षित आहे.एस. बी. काळे, कार्यकारी अभियंतापाटबंधारे विभाग, वर्धा

टॅग्स :Waterपाणी