शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

सात महिन्यांत ३६३ नागरिकांना ‘स्रेकबाईट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2019 06:00 IST

शेतीची कामे करताना सर्पदंश होण्याची शक्यता अधिक असते. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर बिनविषारी साप आहेत. तर विषारी सापांची संख्याही बऱ्यापैकी आहे. साप चावल्यानंतर उपचार म्हणून प्रतिबंधक लस दिली जाते. वाढत्या घटना लक्षात घेता सर्वच केंद्रांवर औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध करून देण्यात आला आहे.

ठळक मुद्देशेतीची कामे करताना दक्षता घेणे गरजेचे

चैतन्य जोशी।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पावसाळ्यात शेतीची कामे करताना सर्पदंशाच्या घटना घडतात. एप्रिल ते ऑक्टोबर या सात महिन्याच्या कालावधीत जिल्ह्यातील तब्बल ३६३ नागरिकांंना सर्पदंश झाल्याची नोंद प्रशासनाने घेतली आहे. सर्पदंशाच्या सर्वाधिक घटना शेतीची कामे करताना घडल्या असल्याने शेतमजुरांसह शेतकऱ्यांनी दक्ष राहूनच शेतीची विविध कामे करणे गरजेचे आहे.सर्पदंश प्रतिबंधक लसींची उपलब्धता सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांसह उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आली आहे. सध्या स्थितीत जिल्ह्यातील आरोग्य केंद्रांमध्ये सुमारे दहा हजार लस उपलब्ध आहे. मात्र, लसींचा वापर वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्याचा सल्ला जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने दिला आहे. शेतीची कामे करताना सर्पदंश होण्याची शक्यता अधिक असते. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर बिनविषारी साप आहेत. तर विषारी सापांची संख्याही बऱ्यापैकी आहे. साप चावल्यानंतर उपचार म्हणून प्रतिबंधक लस दिली जाते. वाढत्या घटना लक्षात घेता सर्वच केंद्रांवर औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध करून देण्यात आला आहे. सर्पदंश झालेल्या रुग्णांना लसीसाठी खासगी रुग्णालयात पैसे मोजावे लागतात; पण शासकीय रुग्णालयांमध्ये ही लस नि:शुल्क दिली जात असल्याचे सांगण्यात आले.लस संपल्यास तात्काळ उपलब्धसर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये लस उपलब्ध आहे. प्रत्येक आरोग्य केंद्राकडून जेवढी मागणी असेल तेवढ्या लसींचा साठा त्या ठिकाणी उपलब्ध करून दिला जात आहे. सर्पदंश झालेला एखादा रुग्ण दाखल झाल्यानंतर त्याला सर्व लस देण्यात आल्यावर संबंधितांकडे लसीची मागणी करण्यात येते. त्यानंतर त्वरित लस पुरविण्यात येत.लस असते; पण डॉक्टर नसतात!प्राथमिक आरोग्य केंद्रांवर लस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मात्र, डॉक्टरच वेळेवर हजर राहत नसल्याची ओरड होत आहे. त्यामुळे बहुधा खासगी डॉक्टरांचा आधार नागरिकांना घ्यावा लागतो. समस्या लक्षात घेता आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तातडीने योग्य कारवाईची गरज आहे.सध्या शेतीची कामे सुरू असल्याने सर्पदंशाच्या घटना घडत आहेत. सर्पदंशाची लस सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये उपलब्ध आहे. सर्पदंश झाल्यावर रुग्णाला तत्काळ नजीकच्या रूग्णालयात न्यावे. शिवाय औषधोपचार घ्यावा.- डॉ. अजय डवले, जिल्हा आरोग्य अधिकारी, वर्धा.

टॅग्स :snakeसाप