शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे संपवली, पण कोणत्याही पंतप्रधानांनी मदत केली नाही," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
रशिया कसं थांबवेल युक्रेन युद्ध? ट्रम्प यांनी UNGA मध्ये सांगितला अमेरिकेचा प्लॅन; पुतिन यांचं टेन्शन वाढणार!
3
पाक गोलंदाजानं केली हसरंगाची कॉपी! मग IND vs PAK मॅचचा दाखला देत इरफाननं काढली 'लायकी' (VIDEO)
4
वैभव खेडेकरांच्या BJP प्रवेशाचा मुहूर्त मिळेना; कार्यकर्त्यांसह मुंबई गाठली पण पक्षप्रवेश नाही
5
पाकिस्तानच्या जाफर एक्सप्रेसमध्ये स्फोट; ट्रेन रुळावरून घसरुन उलटली, काही तासांपूर्वीच लष्कराला करण्यात आलं होतं लक्ष्य
6
बिग सरप्राइज! थेट टीम इंडियाची कॅप्टन्सी मिळाली अन् दिनेश कार्तिक पुन्हा मैदानात उतरण्यास झाला तयार
7
लग्नानंतर वैवाहिक संबध ठेऊ शकला नाही पती, पत्नीनं नपुंसक असल्याचा आरोप करत केली 2 कोटींची मागणी अन् मग...
8
IND vs PAK: पाकिस्तानच्या 'चिल्लर पार्टी'ला हरभजनचा इशारा, म्हणाला- थोडे मोठे व्हा नि मग...
9
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
10
भारताने जिंकलेल्या १९८३ वर्ल्डकप फायनलमधील पंच डिकी बर्ड यांचे ९२व्या वर्षी निधन
11
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
12
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
13
GST कपातीनंतर आता एवढी स्वस्त झालीय ५ स्टार रेटिंग असलेली Tata Punch; जाणून घ्या, कोण कोणत्या कारला देते टक्कर?
14
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
15
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
16
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
17
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
18
चिंताजनक! लहानपणीच्या 'या' छोट्याशा निष्काळजीपणामुळे ५०% वाढतो हृदयरोगाचा धोका
19
गुंडांना आवरा अन्यथा धडा शिकवू, ज्येष्ठ कार्यकर्त्याशी झालेल्या गैरवर्तनावरून काँग्रेसचा भाजपाला इशारा
20
मुलीने पुण्यात मैत्रिणीसोबत बांधली लग्नाची गाठ; आई वडिलांनी लपवून दुसऱ्यांदा तरुणासोबत लावलं लग्न

जलाशयात ३५.२० टक्केच पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2018 22:14 IST

यंदाच्या वर्षी पाहिजे तसा मुसळधार पाऊस न झाल्याने जिल्ह्यातील जलाशयांच्या पाणी पातळीत पाहिजे तशी वाढ झाली नसल्याचे वास्तव आहे. सध्या स्थितीत जिल्ह्यातील ११ जलाशयांमध्ये केवळ ३५.२० टक्केच जलसाठा असून केवळ पोथरा हा एकमेव प्रकल्प १०० टक्के भरला आहे.

ठळक मुद्दे१० प्रकल्प तहानलेलेच : पोथरा प्रकल्प झाला फुल्ल

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : यंदाच्या वर्षी पाहिजे तसा मुसळधार पाऊस न झाल्याने जिल्ह्यातील जलाशयांच्या पाणी पातळीत पाहिजे तशी वाढ झाली नसल्याचे वास्तव आहे. सध्या स्थितीत जिल्ह्यातील ११ जलाशयांमध्ये केवळ ३५.२० टक्केच जलसाठा असून केवळ पोथरा हा एकमेव प्रकल्प १०० टक्के भरला आहे. येत्या काही दिवसात समाधानकारक पाऊस न झाल्यास जिल्ह्यातील नागरिकांना जलसंकटाला सामोरे जाण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तविली जात आहे.यंदाच्या वर्षी सुरूवातीला पावसाने दगा दिल्याने अनेकांच्या अडचणीत भर पडली होती. त्यातच शेतकऱ्यांच्या पेरण्याही खोळंबल्या होत्या. परंतु, जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मुसळधार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणीच्या कामांना वेग दिला. याच कालावधीत जिल्ह्यातील पोथरा हा प्रकल्प १०० टक्के भरला. परंतु, जिल्ह्यातील इतर दहा प्रकल्पांच्या पाणी पातळीत नाममात्र वाढ झाली आहे. गत वर्षीच्या तुलनेत यंदा जुलैच्या चौथ्या आठवड्यापर्यंत जिल्ह्यातील जलाशयांच्या पाणी पातळीत सुमारे दहा टक्क्यांनी वाढ झाल्याचे सांगण्यात येत असले तरी येत्या काही दिवसात जोरदार पाऊस न झाल्यास नागरिकांना पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागणार असल्याचे सांगण्यात येत आहे.गतवर्षी होता २५.४९ टक्के जलसाठागत वर्षी जिल्ह्यातील ११ प्रकल्पात जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत २५.४९ टक्केच जलसाठा होता. यंदाच्या वर्षी जुलै महिन्याच्या चौथ्या आठवड्या अखेरपर्यंत जिल्ह्यातील ११ प्रकल्पात सरासरी ३५.२० इतका जलसाठा असल्याचे सांगण्यात येते. गत वर्षीच्या तुलनेत सुमारे १० टक्के जलसाठा सध्या जलाशयांमध्ये जादा असला तरी अनेकांना समाधानकारक पावसाची प्रतीक्षाच आहे.गत वर्षी पावसाळ्याच्या अखेरीस भरले जलाशयगत वर्षी सुरूवातीला पावसाने हुलकावणीच दिली. त्यामुळे जलसंकटाला सामोरे जावे लागेलच असा विश्वास अनेक तज्ज्ञ व्यक्त करीत होते. मात्र, पावसाळ्याच्या अखेरीस वर्धा जिल्ह्यावर वरुणराजा मेहरबानच झाला. त्यामुळे त्यावेळी जिल्ह्यातील जलाशयांच्या पाणी पातळीत बऱ्यापैकी वाढ झाली होती. यंदाही पावसाळ्याच्या अखेरीसच वरुणराजा जिल्ह्यावर मेहरबान होत जलाशय फुल्ल होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

टॅग्स :DamधरणRainपाऊस