शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

जलाशयात ३५.२० टक्केच पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2018 22:14 IST

यंदाच्या वर्षी पाहिजे तसा मुसळधार पाऊस न झाल्याने जिल्ह्यातील जलाशयांच्या पाणी पातळीत पाहिजे तशी वाढ झाली नसल्याचे वास्तव आहे. सध्या स्थितीत जिल्ह्यातील ११ जलाशयांमध्ये केवळ ३५.२० टक्केच जलसाठा असून केवळ पोथरा हा एकमेव प्रकल्प १०० टक्के भरला आहे.

ठळक मुद्दे१० प्रकल्प तहानलेलेच : पोथरा प्रकल्प झाला फुल्ल

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : यंदाच्या वर्षी पाहिजे तसा मुसळधार पाऊस न झाल्याने जिल्ह्यातील जलाशयांच्या पाणी पातळीत पाहिजे तशी वाढ झाली नसल्याचे वास्तव आहे. सध्या स्थितीत जिल्ह्यातील ११ जलाशयांमध्ये केवळ ३५.२० टक्केच जलसाठा असून केवळ पोथरा हा एकमेव प्रकल्प १०० टक्के भरला आहे. येत्या काही दिवसात समाधानकारक पाऊस न झाल्यास जिल्ह्यातील नागरिकांना जलसंकटाला सामोरे जाण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तविली जात आहे.यंदाच्या वर्षी सुरूवातीला पावसाने दगा दिल्याने अनेकांच्या अडचणीत भर पडली होती. त्यातच शेतकऱ्यांच्या पेरण्याही खोळंबल्या होत्या. परंतु, जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मुसळधार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणीच्या कामांना वेग दिला. याच कालावधीत जिल्ह्यातील पोथरा हा प्रकल्प १०० टक्के भरला. परंतु, जिल्ह्यातील इतर दहा प्रकल्पांच्या पाणी पातळीत नाममात्र वाढ झाली आहे. गत वर्षीच्या तुलनेत यंदा जुलैच्या चौथ्या आठवड्यापर्यंत जिल्ह्यातील जलाशयांच्या पाणी पातळीत सुमारे दहा टक्क्यांनी वाढ झाल्याचे सांगण्यात येत असले तरी येत्या काही दिवसात जोरदार पाऊस न झाल्यास नागरिकांना पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागणार असल्याचे सांगण्यात येत आहे.गतवर्षी होता २५.४९ टक्के जलसाठागत वर्षी जिल्ह्यातील ११ प्रकल्पात जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत २५.४९ टक्केच जलसाठा होता. यंदाच्या वर्षी जुलै महिन्याच्या चौथ्या आठवड्या अखेरपर्यंत जिल्ह्यातील ११ प्रकल्पात सरासरी ३५.२० इतका जलसाठा असल्याचे सांगण्यात येते. गत वर्षीच्या तुलनेत सुमारे १० टक्के जलसाठा सध्या जलाशयांमध्ये जादा असला तरी अनेकांना समाधानकारक पावसाची प्रतीक्षाच आहे.गत वर्षी पावसाळ्याच्या अखेरीस भरले जलाशयगत वर्षी सुरूवातीला पावसाने हुलकावणीच दिली. त्यामुळे जलसंकटाला सामोरे जावे लागेलच असा विश्वास अनेक तज्ज्ञ व्यक्त करीत होते. मात्र, पावसाळ्याच्या अखेरीस वर्धा जिल्ह्यावर वरुणराजा मेहरबानच झाला. त्यामुळे त्यावेळी जिल्ह्यातील जलाशयांच्या पाणी पातळीत बऱ्यापैकी वाढ झाली होती. यंदाही पावसाळ्याच्या अखेरीसच वरुणराजा जिल्ह्यावर मेहरबान होत जलाशय फुल्ल होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

टॅग्स :DamधरणRainपाऊस