शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
2
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
3
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
4
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
5
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
6
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
7
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
8
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
9
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
10
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
11
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
12
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
13
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
14
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
15
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
16
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
17
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
18
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
19
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
20
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल

जलाशयात ३५.२० टक्केच पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2018 22:14 IST

यंदाच्या वर्षी पाहिजे तसा मुसळधार पाऊस न झाल्याने जिल्ह्यातील जलाशयांच्या पाणी पातळीत पाहिजे तशी वाढ झाली नसल्याचे वास्तव आहे. सध्या स्थितीत जिल्ह्यातील ११ जलाशयांमध्ये केवळ ३५.२० टक्केच जलसाठा असून केवळ पोथरा हा एकमेव प्रकल्प १०० टक्के भरला आहे.

ठळक मुद्दे१० प्रकल्प तहानलेलेच : पोथरा प्रकल्प झाला फुल्ल

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : यंदाच्या वर्षी पाहिजे तसा मुसळधार पाऊस न झाल्याने जिल्ह्यातील जलाशयांच्या पाणी पातळीत पाहिजे तशी वाढ झाली नसल्याचे वास्तव आहे. सध्या स्थितीत जिल्ह्यातील ११ जलाशयांमध्ये केवळ ३५.२० टक्केच जलसाठा असून केवळ पोथरा हा एकमेव प्रकल्प १०० टक्के भरला आहे. येत्या काही दिवसात समाधानकारक पाऊस न झाल्यास जिल्ह्यातील नागरिकांना जलसंकटाला सामोरे जाण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तविली जात आहे.यंदाच्या वर्षी सुरूवातीला पावसाने दगा दिल्याने अनेकांच्या अडचणीत भर पडली होती. त्यातच शेतकऱ्यांच्या पेरण्याही खोळंबल्या होत्या. परंतु, जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मुसळधार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणीच्या कामांना वेग दिला. याच कालावधीत जिल्ह्यातील पोथरा हा प्रकल्प १०० टक्के भरला. परंतु, जिल्ह्यातील इतर दहा प्रकल्पांच्या पाणी पातळीत नाममात्र वाढ झाली आहे. गत वर्षीच्या तुलनेत यंदा जुलैच्या चौथ्या आठवड्यापर्यंत जिल्ह्यातील जलाशयांच्या पाणी पातळीत सुमारे दहा टक्क्यांनी वाढ झाल्याचे सांगण्यात येत असले तरी येत्या काही दिवसात जोरदार पाऊस न झाल्यास नागरिकांना पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागणार असल्याचे सांगण्यात येत आहे.गतवर्षी होता २५.४९ टक्के जलसाठागत वर्षी जिल्ह्यातील ११ प्रकल्पात जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत २५.४९ टक्केच जलसाठा होता. यंदाच्या वर्षी जुलै महिन्याच्या चौथ्या आठवड्या अखेरपर्यंत जिल्ह्यातील ११ प्रकल्पात सरासरी ३५.२० इतका जलसाठा असल्याचे सांगण्यात येते. गत वर्षीच्या तुलनेत सुमारे १० टक्के जलसाठा सध्या जलाशयांमध्ये जादा असला तरी अनेकांना समाधानकारक पावसाची प्रतीक्षाच आहे.गत वर्षी पावसाळ्याच्या अखेरीस भरले जलाशयगत वर्षी सुरूवातीला पावसाने हुलकावणीच दिली. त्यामुळे जलसंकटाला सामोरे जावे लागेलच असा विश्वास अनेक तज्ज्ञ व्यक्त करीत होते. मात्र, पावसाळ्याच्या अखेरीस वर्धा जिल्ह्यावर वरुणराजा मेहरबानच झाला. त्यामुळे त्यावेळी जिल्ह्यातील जलाशयांच्या पाणी पातळीत बऱ्यापैकी वाढ झाली होती. यंदाही पावसाळ्याच्या अखेरीसच वरुणराजा जिल्ह्यावर मेहरबान होत जलाशय फुल्ल होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

टॅग्स :DamधरणRainपाऊस