शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
2
आजचे राशीभविष्य, ०६ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, लोकप्रियतेत वाढ; मान-सन्मानाचा दिवस
3
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
4
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
5
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
6
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
7
स्टार्टअप्समधून घडवणार १.२५ लाख नवउद्योजक! धोरण जाहीर, ५ वर्षांत ५० हजार स्टार्टअप्स सुरू करण्याचे नियोजन
8
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
9
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
10
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत
11
जळगाव जिल्हा वकील संघाच्या अध्यक्षपदी सागर चित्रे! उपाध्यक्षपदी ॲड. स्मिता झाल्टे; विजयी उमेदवारांचा जल्लोष
12
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
13
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
14
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
15
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
16
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
17
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
18
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
19
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
20
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान

जिल्ह्यात भूविकास बँकेचे 347 लाभार्थी, 5 कोटी 89 लाखांची मिळणार कर्जमाफी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2022 22:42 IST

शेतकऱ्यांना दीर्घ मुदतीचे कर्ज उपलब्ध करून देणाऱ्या भूविकास बँकेत खातेधारकांची संख्या मोठी होती. १९३५ पासून सुरू झालेल्या या बँकेचा कारभार १९९७-९८ पर्यंत सुरळीत होता. त्यानंतर शासनाने हमी नाकारली आणि नाबार्डनेही पतपुरवठा करणे बंद केल्याने ही बँक अडचणीत आली. २०१५ मध्ये बँक अवसायनात निघाली. याचा फटका शेतकऱ्यांसह बँकेतील कर्मचाऱ्यांनाही बसला.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : भूविकास बँक अवसायनात निघाल्यानंतर, कर्जमाफीच्या प्रतीक्षेत शेतकऱ्यांनी कर्जाची परतफेड केली नसल्याने, सातबाऱ्यावर बोजा कायम राहिला. परिणामी, नवीन पीककर्ज घेण्याकरिता अडचणींचा सामना करावा लागत होता. राज्य शासनाने नुकताच कर्जमाफीचा निर्णय घेतल्याने जिल्ह्यातील ३४७ कर्जधारकांचे ५ कोटी ८९ लाख ६८ हजारांचे कर्ज माफ होऊन सातबारा कोरा होणार आहे.शेतकऱ्यांना दीर्घ मुदतीचे कर्ज उपलब्ध करून देणाऱ्या भूविकास बँकेत खातेधारकांची संख्या मोठी होती. १९३५ पासून सुरू झालेल्या या बँकेचा कारभार १९९७-९८ पर्यंत सुरळीत होता. त्यानंतर शासनाने हमी नाकारली आणि नाबार्डनेही पतपुरवठा करणे बंद केल्याने ही बँक अडचणीत आली. २०१५ मध्ये बँक अवसायनात निघाली. याचा फटका शेतकऱ्यांसह बँकेतील कर्मचाऱ्यांनाही बसला. कर्मचाऱ्यांना स्वेच्छानिवृत्ती घ्यावी लागली. शेतकऱ्यांना कर्जमाफीची आणि कर्मचाऱ्यांना त्यांच्या मोबदल्याची प्रतीक्षा होती. अखेर राज्य शासनाने कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच कर्मचाऱ्यांचीही देणी मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.

२५ वर्षांपासून वसुली नाही - कोणत्याही बँकेतून कर्जवाटप सुरू राहिले, तर कर्जाची वसुलीही सुरू असते, पण भूविकास बँकेने सन १९९८ पासून कर्जवाटपच बंद केल्याने शेतकऱ्यांनीही कर्जाची परतफेड केली नाही. विशेषत: ही वसुली करायला मनुष्यबळही नव्हते. त्यामुळे जिल्ह्यातील ३४७ शेतकऱ्यांनी या कर्जाची परतफेड केलीच नाही. शासनाची कर्जमाफी द्यावी, हीच मागणी लावून धरली होती. आता शासनाने ही मागणी मान्य केल्याने या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला.

जिल्ह्यात भूविकास बँकेच्या पूर्वी होत्या सात शाखा, आता केवळ एकाच ठिकाणाहून काम- जिल्ह्यात आठ तालुके असून, या सर्व तालुक्यांतील शेतकरी भूविकास बँकेकडून मोठ्या प्रमाणात कर्जाची उचल करीत असल्याने, पूर्वी बँकेच्या सात शाखा कार्यरत होत्या. या सातही शाखांमध्ये तब्बल ११८ अधिकारी व कर्मचारी कार्यरत होते, पण १९९८ पासून कर्जवाटप बंद केल्यानंतर २०१५ मध्ये ही बँक अवसायनात निघाली. परिणामी, या बँकेत कार्यरत असलेल्या सर्वच अधिकारी व कर्मचाऱ्यांना २०१८ मध्ये सेवामुक्त केले. सर्व कामकाजच ठप्प पडल्याने सातही शाखा बंद करून, आता केवळ वर्ध्यातील एका कार्यालयातून कामकाज सुरू असून, तेथे केवळ तीनच कंत्राटी कर्मचारी कार्यरत असून त्यांच्याही नियमित वेतनाचा थांगपत्ता नाही. 

₹९६४कोटींच्या कर्जमाफीचा निर्णय...

- भूविकास बँकेकडून कर्ज घेतलेल्या राज्यभरातील शेतकऱ्यांना ९६४ कोटी रुपयांची कर्जमाफी देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. यामध्ये जिल्ह्यातील आठही तालुक्यांतील ३४७ शेतकऱ्यांचा समावेश आहे. -    या शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर गेल्या २४ ते २५ वर्षांपासून कर्जाचा बोजा कायम आहे. वारंवार मागणी करूनही याकडे दुर्लक्ष करण्यात आले, परंतु आता या सर्व शेतकऱ्यांचे तब्बल ५ कोटी ८९ लाख ६८ हजारांचे कर्ज माफ होणार आहे.

३४७ शेतकरी अन् ११८ कर्मचाऱ्यांच्या आशा झाल्या पल्लवित- भूविकास बँकेकडून कर्ज घेणाऱ्यांची कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतल्याने जिल्ह्यातील ३४७ शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. यामुळे शेती असूनही शेतकऱ्यांना दुसरीकडून कर्जाची उचल किंवा शेतीचा व्यवहार करण्यात अडचणी येत होत्या. आता यातून सुटका होणार आहे, याशिवाय सेवामुक्त केलेल्या ११८ कर्मचाऱ्यांनाही शासनाकडून वेतन, सेवानिवृत्तीची रक्कम व इतर रक्कम मिळाली नसल्याने, त्यांना अडचणीत दिवस काढावे लागले. शिक्षण, आरोग्य व कुटुंबाचा सांभाळ करताना, तारेवरची कसरत करावी लागली, पण त्यांनाही आता त्यांची हक्काची रक्कम मिळणार, अशी आशा आहे. 

अनेक प्रयत्न झाल्यानंतर आता हा महत्त्वपूर्ण निर्णय झालेला आहे. हा निर्णय शेतकऱ्यांकरिता नक्कीच हिताचा ठरणार आहे. सातबाऱ्यावरील बोजा कमी होताच, तो नव्याने पीककर्ज घेण्यास, तसेच इतर व्यवहार करण्यास पात्र ठरणार आहे. शासनाचा हा निर्णय नक्कीच शेतकरी आणि कर्मचाऱ्यांच्या हिताचा व सकारात्मक म्हणता येईल. यासाठी बरीच वर्ष लढा द्यावा, लागला त्याचे आज फलित झाले आहे.सुरेश रहाटे, अध्यक्ष, लढा ज्येष्ठ नागरिकांचा.

भूविकास बँकेच्या खातेधारक शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा चांगला निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ३४७ कर्जधारकांचे ५ कोटी ८९ लाख ६८ हजारांचे कर्ज माफ होणार आहे. त्यासोबतच जिल्ह्यातील ११८ कर्मचाऱ्यांची १३ कोटी ५० लाखांची देणी शासनाकडून घेणे बाकी असून, तीही लवकरच मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे या निर्णयाने शेतकरी आणि कर्मचारी या दोघांनाही उशिराने का होईना, दिलासा मिळणार आहे.रवींद्र मिटकरी, जिल्हा व्यवस्थापक, भूविकास बँक वर्धा.