शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

३२१ किमीचे राज्य मार्ग, ७२६ किमीचे प्रमुख जिल्हा मार्ग खड्डेमय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 05:00 IST

दर्जोन्नत झालेले हिंगणघाट तालुक्यातील १६८ किमीचे सहा प्रमुख जिल्हा मार्ग नव्याने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वळते करण्यात आले आहेत, तर देवळी तालुक्यातील २० किमीचा एक प्रमुख जिल्हा मार्ग दर्जोन्नत झाल्याने जि. प.च्या बांधकाम विभागाकडून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वळता करण्यात आला आहे.

महेश सायखेडेलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यातील आठपैकी पाच तालुक्यांतील तब्बल ३२१ किमीचे राज्य मार्ग तसेच ७२३ किमीचे प्रमुख जिल्हा मार्ग खड्डेमय असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निदर्शनास आले आहे. याच मार्गांवरील जीवघेणे खड्डे बुजविण्याच्या कामाला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने सुरुवात करण्यात आली असली, तरी उसंत घेत सुरू असलेला पाऊस खड्डे बुजविण्याच्या कामात व्यत्यय आणत असल्याचे वास्तव आहे.दर्जोन्नत झालेले हिंगणघाट तालुक्यातील १६८ किमीचे सहा प्रमुख जिल्हा मार्ग नव्याने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वळते करण्यात आले आहेत, तर देवळी तालुक्यातील २० किमीचा एक प्रमुख जिल्हा मार्ग दर्जोन्नत झाल्याने जि. प.च्या बांधकाम विभागाकडून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वळता करण्यात आला आहे. सध्य:स्थितीत देवळी तालुक्यातील ४२ टक्के राज्य मार्ग, तर ६३ टक्के प्रमुख जिल्हा मार्गांवरील खड्डे, हिंगणघाट तालुक्यातील ६८ टक्के राज्य मार्ग, तर ५३ टक्के प्रमुख जिल्हा मार्गावरील खड्डे, समुद्रपूर तालुक्यातील ६९ टक्के राज्य मार्ग, तर ४८ टक्के प्रमुख जिल्हा मार्गावरील खड्डे सेलू तालुक्यातील ५२ टक्के राज्य मार्ग, तर ५२ टक्के प्रमुख जिल्हा मार्गावरील खड्डे तसेच वर्धा तालुक्यातील राज्य मार्गावरील ६९ टक्के, तर प्रमुख जिल्हा मार्गावरील ७२ टक्के खड्डे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून बुजविण्यात आले आहे. पण, पावसामुळे पुन्हा नवीन खड्डे तयार होत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील खड्डे बुजविण्याची टक्केवारी कमी होत आहे.

पावसाने विश्रांती घेताच दिली जाणार गती- जिल्ह्यातील राज्य मार्ग तसेच प्रमुख जिल्हा मार्ग गुळगुळीत व्हावा यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग प्रयत्न करीत आहे; पण सध्या उसंत घेत सुरू असलेल्या पावसामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अडचणीत भर टाकली आहे. असे असले तरी पावसाने विश्रांती घेताच जीवघेणे खड्डे बुजविण्याच्या कामाला गती दिली जाणार असल्याचे सांगण्यात आले.- जिल्हा परिषद प्रशासनाकडून तब्बल सात दर्जोन्नत दस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाला वळते झाल्याने यंदा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वाट्याला खड्डेमय रस्ते जास्त आले आहेत. पण तेही लवकर गुळगुळीत करण्याचा मानस सार्वजनिक बांधकाम विभागाचा आहे. 

 

टॅग्स :highwayमहामार्गroad safetyरस्ते सुरक्षा