शहरं
Join us  
Trending Stories
1
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
3
Kenya Plane Crash: घरांवरच कोसळले वैद्यकीय पथकाला घेऊन जाणारे विमान; २ डॉक्टरसह ६ जण ठार
4
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
5
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
6
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
7
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
8
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
9
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
10
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
11
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
12
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
13
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
14
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
15
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
16
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
17
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
18
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
19
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
20
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी

१.६४ लाख शेतकऱ्यांना ३१.६७ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 21:47 IST

मागील खरीप हंगामात कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला होता. यामुळे अनेक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सोसावे लागले होते. सदर नुकसानग्रस्त कापूस उत्पादक शेतकऱ्यांना शासकीय मदत जाहीर करण्यात आली होती.

ठळक मुद्देबोंडअळीच्या नुकसानाची मदत खात्यात जमा : आठही तालुक्यांमध्ये पहिल्या हप्त्याचे वाटप

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मागील खरीप हंगामात कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला होता. यामुळे अनेक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सोसावे लागले होते. सदर नुकसानग्रस्त कापूस उत्पादक शेतकऱ्यांना शासकीय मदत जाहीर करण्यात आली होती. आता तिचे वाटप सुरू करण्यात आले आहे. वर्धा जिल्ह्यात पहिल्या हप्त्यातील मदत शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात जमा केली जात आहे. यात १२ जूनपर्यंत जिल्ह्यातील १ लाख ६४ हजार ४६३ शेतकऱ्यांच्या खात्यात मदतीची ३१ कोटी ६७ लाख रुपये वळते करण्यात आले आहेत.मागील खरीप हंगामात कपाशीवर आलेल्या बोंडअळीमुळे शेतकरी हवालदिल झाला होता. यामुळे शेतकऱ्यांना मदत करण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आला. या योजनेची अंमलबजावणी करण्याकरिता जिल्ह्याला १५३ कोटी ७८ लाख ८७ हजार रुपये प्राप्त झाले आहेत. या रकमेतून २ लाख १२ हजार ९५२ शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. जिल्ह्यात मागील खरीप हंगामात एकूण २ लाख १३ हजार १२२ शेतकऱ्यांनी २ लाख ५४ हजार ५२६.३८ हेक्टर क्षेत्रात कपाशीची लागवड केली होती. गुलाबी बोंडअळीचा जवळपास सर्वच शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागले. यामुळे शासनाच्या सूचनेनुसार कृषी विभाग आणि महसूल विभागाच्यावतीने संयुक्त सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना जिरायती व बागायती, असे वर्गीकरण करून मदत देण्याचा निर्णय राज्य शासनाकडून घेण्यात आला. या निर्णयानुसार जिल्ह्यातील २ लाख २५ हजार ८९.८८ हेक्टरवरील पीक मदतीसाठी पात्र ठरले आहे. यात २ लाख १२ हजार ९५२ शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्यात आली आहे. यासाठी पहिला हप्ता म्हणून ४१ कोटी ०१ लाख रुपये जिल्हा प्रशासनाकडून ‘रिलीज’ करण्यात आले आहेत. यातून पहिल्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येत आहे. १२ जूनपर्यंत जिल्ह्यातील १ लाख ६४ हजार ४६३ म्हणजे ७७.२३ टक्के शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ३१ कोटी ६७ लाख रुपये जमा करण्यात आले आहेत. उर्वरित ४८ हजार ४८९ शेतकऱ्यांच्या बँक खात्यातही मदतीच्या पहिल्या हप्त्याची रक्कम एक-दोन दिवसांत जमा करण्यात येणार आहे.पहिल्या हप्त्यातील सर्व शेतकऱ्यांना मदतीची रक्कम प्राप्त झाल्यानंतर उर्वरित मदतही दिली जाणार आहे. एकूण तीन हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांना बोंडअळीच्या नुकसान भरपाईची मदत प्रदान करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. वर्धा तालुक्यात ३ कोटी १२ लाख (४७.६३ टक्के), सेलू तालुक्यात ३ कोटी ३५ लाख (५६.२८ टक्के), आर्वी ३ कोटी ८६ लाख (९८.९७ टक्के), आष्टी १ कोटी ७२ लाख रुपये (६०.७८ टक्के) शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. शिवाय देवळी तालुक्यात ४ कोटी ८७ लाख, हिंगणघाट ७ कोटी ७३ लाख, समुद्रपूर ६ कोटी ३७ लाख आणि कारंजा तालुक्यात २ कोटी ८१ लाख ही १०० टक्के शेतकऱ्यांच्या खात्यात वळती करण्यात आली आहे. एकूण ७७.२३ टक्के शेतकºयांच्या खात्यात मदतीची रक्कम वळती झाली असून २२.७७ टक्के शेतकऱ्यांना एक-दोन दिवसांत मदत मिळणार आहे.खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना आधारशासनाकडून जाहीर झालेल्या बोंडअळीच्या नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत असल्याने शेतकऱ्यांना खरीप हंगामात आधार झाला आहे. पहिल्या हप्त्यातील रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली असून उर्वरित रक्कमही दुसऱ्या व तिसऱ्या हप्त्यात खात्यात जमा करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.चार तालुक्यांत १०० टक्के वाटपजिल्ह्यातील आठ तालुक्यांमध्ये एकूण २ लाख १२ हजार ९५२ शेतकऱ्यांना मदतीच्या रकमेचे वाटप करावयाचे होते. यासाठी पहिल्या हप्त्यात ४१ कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले. या रकमेचे चार तालुक्यांमध्ये १०० टक्के वाटप करण्यात आले आहे. यात देवळी, हिंगणघाट, समुद्रपूर आणि कारंजा तालुक्याचा समावेश आहे. उर्वरित तालुक्यांमध्ये काही रक्कम शिल्लक असून शेतकºयांचे खाते क्रमांक क्लियर होताच ती वितरित केली जाणार आहे.दोन हप्त्यात ११२ कोटींचे वितरणपहिल्या हप्त्यामध्ये शासनाकडून ४१ कोटी ०१ लाख रुपयांचे वाटप केले जात आहे. उर्वरित ११२ कोटी ७८ लाख ८७ हजार रुपयांच्या मदतीचे वाटप दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात करण्यात येणार आहे. आता ही रक्कम वितरित करण्याकरिता शासनाकडून किती दिवस लागतात, हे मात्र पाहावे लागणार आहे.

टॅग्स :cottonकापूस