शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
2
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
3
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
4
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
5
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
6
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
7
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
8
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
9
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
10
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
11
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
12
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
13
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
14
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
15
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
16
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
17
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
18
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
19
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
20
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या

३०५ गरजू लाभार्थ्यांना घरकुलाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2020 05:00 IST

गावाची लोकसंख्या दहा हजारांवर असून हिंगणघाट तालुक्यातील सर्वांत मोठे गाव आहे. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत गतवर्षी योजनेच्या कार्यान्वयनाकरिता पंचायत समिती आणि ग्रामपंचायतीकडून गावात सर्वेक्षण करण्यात आले. घरांची छायाचित्रेही काढण्यात आली. यादीही तयार करण्यात आली.

ठळक मुद्देसंडे अँकर । चार वर्षे लोटले; पंतप्रधान आवास योजना; घोडे अडले कोठे?

लोकमत न्यूज नेटवर्कअल्लीपूर : गरिबांचेही घराचे स्वप्न पूर्ण व्हावे याकरिता केंद्र शासनाची पंतप्रधान आवास योजना आहे. याकरिता केंद्र आणि राज्य शासनाकडून अर्थसहाय्य दिले जाते. मात्र, गरजूंना या योजनेला लाभ मिळाला नसून ३०५ गरजू गरीब, नागरिकांना घरकुलाची चार वर्षांपासून प्रतीक्षा कायम आहे.गावाची लोकसंख्या दहा हजारांवर असून हिंगणघाट तालुक्यातील सर्वांत मोठे गाव आहे. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत गतवर्षी योजनेच्या कार्यान्वयनाकरिता पंचायत समिती आणि ग्रामपंचायतीकडून गावात सर्वेक्षण करण्यात आले. घरांची छायाचित्रेही काढण्यात आली. यादीही तयार करण्यात आली. मात्र, घोडे कुठे अडले, हे कुणालाही कळू शकले नाही. त्यामुळे तीनशेवर गरजू नागरिकांना घरकुलाची प्रतीक्षा आहे. शासनाने घरकूल लाभार्थ्यांसाठी आता अ,ब,क,ड यादीचा निकष लावला आहे. या याद्यांमध्ये प्रचंड घोळ असून अनेक गरजू व गरीब नागरिकांची नावे यातून वगळण्यात आली आहे. त्यामुळे लाभार्थी वंचित आहे. यंत्रणेने लक्ष देण्याची मागणी आहे.घरकुल मिळणार तरी कधी?ग्रामपंचायतीद्वारे सर्वेक्षण करण्यात आले. आता लाभार्थ्यांकडून आधार कार्ड घेतले जात आहे. चार वर्षांपासून प्रक्रिया अतिशय संथगतीने सुरू असल्याने घरकुल मिळणार तरी केव्हा, असा सवाल लाभार्थ्यांनी केला आहे.केवळ दहा जणांना घरकुलाचा लाभपंतप्रधान आवास योजनेचा लाभ कोणत्याही प्रवर्गातील नागरिकांना दिला जातो. मात्र प्रपत्र ब नुसार गावात घरकुल योजना सुरू आहे. २०१६ पासून ओबीसी प्रवर्गातील केवळ लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ मिळाला आहे.शासनाच्या निर्देशानुसार योजनेकरिता आधार कार्ड झेरॉक्स प्रत गोळा करून लिंक करण्याची प्रक्रिया सुरू आहे. लाभार्थ्यांच्या नावाची यादी प्राप्त होताच घरकुल योजनेचा लाभ दिला जाईल.अशोक गव्हाळे, ग्रामविकास अधिकारी, अल्लीपूर

टॅग्स :Pradhan Mantri Awas Yojanaप्रधानमंत्री आवास योजना