शहरं
Join us  
Trending Stories
1
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
2
“सरन्यायाधीश भूषण गवई यांना हात जोडून विनंती आहे की...”; उद्धव ठाकरेंचे साकडे, प्रकरण काय?
3
ICICI बँकेचा यु-टर्न; अकाऊंटमध्ये ५० हजार रुपये नाही तर 'इतकी' रक्कम ठेवावी लागणार
4
७९ वर्षांत असे दोन पंतप्रधान होऊन गेले, ज्यांच्या भाग्यात लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिन आलाच नाही...
5
नवाब मलिकांवर मोठी जबाबदारी; मुंबई महापालिका निवडणुकीबाबत अजित पवारांचा महत्त्वाचा निर्णय
6
Viral Video : काय म्हणावं यांना! लाबुबू डॉलची पूजा करू लागली महिला, म्हणाली "ही बाहुली नाही, तर..."
7
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Nifty २४,६०० च्या वर, IT-फार्मा शेअर्समध्ये मोठी खरेदी
8
राष्ट्रवादीमध्ये नव्या 'दादां'चा उदय! रोहित पवार अजितदादांची पोकळी भरून काढत आहेत का?
9
'फुले' सिनेमाच्या अपयशावर प्रतीक गांधीने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "जितकी अपेक्षा..."
10
पाकिस्तानचं स्वातंत्र्यदिनी हे कसलं सेलिब्रेशन... हवेत गोळीबार, तिघांचा मृत्यू, ६० जखमी
11
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
12
शिल्पा शिरोडकरच्या कारला बसची धडक, अभिनेत्रीने केली तक्रार; तर बस मालकांनी केली अरेरावी
13
आजचे राशीभविष्य : गुरुवार १४ ऑगस्ट २०२५; या ४ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ संभवतो, काहींना मित्रांकडूनही लाभ होतील
14
लंडनच्या भूमीत १८ ऑगस्टला होणार ऐतिहासिक 'लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन'
15
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
16
फडणवीस, शिंदे, ठाकरे आज एका व्यासपीठावर..?; बीडीडीवासीयांचे पाऊल आज नव्या घरात
17
वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक; ४१ अवैध इमारती भोवल्या, ईडीची कारवाई
18
मुनीर यांचा बाष्कळ थयथयाट, भारताविषयी वक्तव्ये करण्याआधी 'आका'ची परवानगी घेतली का?
19
कबुतरांना खाद्यबंदी कायम; 'तुम्ही एकांगी निर्णय घेऊ शकत नाही', हायकोर्टाने मुंबई महापालिकेला फटकारले
20
महाभियोग टाळण्यास राजीनामा हा एकच पर्याय; अन्यथा न्या. वर्मांचे पेन्शन, इतर लाभही जाणार

सौर कृषिपंपातून ३०० दिवस पाणी

By admin | Updated: October 16, 2015 02:52 IST

पारंपरिक पद्धतीने विद्युतीकरण न झालेल्या शेतकऱ्यांना सिंचनाच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी पाच एकरापेक्षा कमी असलेल्या शेतकऱ्यांना सौर कृषी पंप देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.....

आशुतोष सलील : तब्बल २० वर्षे वीज देयक भरण्यापासून सुटकावर्धा: पारंपरिक पद्धतीने विद्युतीकरण न झालेल्या शेतकऱ्यांना सिंचनाच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी पाच एकरापेक्षा कमी असलेल्या शेतकऱ्यांना सौर कृषी पंप देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील ९२० शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. या पंपामुळे शेतकरी वर्षातील ३०० दिवस ओलित करू शकेल. यामुळे सौर कृषीपंप जोडण्याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे जिल्हाधिकारी आशुतोष सलील म्हणाले.घोराड येथे देवराव तडस यांच्या शेतात सौर कृषिपंपाच्या प्रात्यक्षिकाची पाहणी जिल्हाधिकारी सलील यांनी गुरुवारी केली. सौर उर्जेद्वारा तीन अश्वशक्ती तसेच ५ व ७.५ अश्वशक्ती सौरपंपाद्वारा शेतीला सिंचनाची सुविधा उपलब्ध होऊ शकते. शेतकऱ्यांना सौर उर्जेवर कृषी पंपाची प्रत्यक्ष पाहणी करता यावी याकरिता या प्रात्याक्षिकाचे आयोजन करण्यात आले होते. सौर कृषीपंप योजना ही आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांसाठी प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येत आहे. या योजनेमध्ये केंद्र व राज्य शासनाचे अनुदान असून लाभार्थ्यांना केवळ ५ टक्के मिळवून सौर कृषीपंप महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीतर्फे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. धडक सिंचनचे लाभार्थी, अतिदुर्गम भागातील शेतकरी तसेच ज्या गावात विद्युतीकरण झाले नाही, अशा शेतकऱ्यांना या योजनेचा प्राधान्याने लाभ मिळणार आहे.सौर कृषीपंप योजनेचे प्रात्यक्षिक घोराड तसेच समुद्रपूर येथे आयोजित करण्यात आले असून या योजनेंतर्गत तीन अश्वशक्ती पंपासाठी २५० अश्वशक्तीची १२ पॅनेल तसेच पाच अश्वशक्तीसाठी २० पॅनेल राहणार आहेत. ३६५ दिवसांपैकी सौरउर्जेद्वारे ३०० दिवस दररोज आठ तास कृषीपंपाद्वारे शेतकऱ्यांना ओलिताची सुविधा उपलब्ध होणार आहे. सौरपंपाची कालमर्यादा २० ते २५ वर्षे असल्यामुळे २० वर्ष वीज देयक भरण्याची आवश्यकता राहणार नाही. तीन अश्व शक्तीसाठी शेतकऱ्यांना १६ हजार २०० रुपये सहभाग भरल्यास ३ लक्ष २४ हजार रुपयांचा ३ अश्वशक्तीचा सोलार पंप उपलब्ध होणार आहे. शेतकऱ्यांनी योजनेमध्ये सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केले. प्रारंभी वीज कंपनीचे अधीक्षक अभियंता एस.ए. कांबळे यांनी त्यांचे सौर उर्जा प्रात्यक्षिकाबद्दल माहिती दिली. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर भारती, कार्यकारी अभियंता व प्रकल्प समन्वयक विजयकुमार उगले, तहसीलदार होळी, तालुका कृषी अधिकारी आर.एस. जावंधिया, वीज वितरण कंपनीचे उपअभियंता पुरी, जतीन पटेल, पंकज वाढण, अमित वागडे आदी उपस्थित होते.(प्रतिनिधी)आठवड्यातून चार दिवस दिवसाला आठ तर ३ दिवस रात्रीला १० तास थ्रिफेज पुरवठा शेतकऱ्यांना ओलिताकरिता एमईआरसीच्या नियमानुसार आठवड्यातून चार दिवस दिवसाला आठ तास तर तीन दिवस रात्रीला १० तास थ्रिफेज विद्यूत पुरवठा करण्यात येत आहे. या संदर्भात वरिष्ठ कार्यालयाकडून कुठल्याही सूचना अल्याशिवाय बदल करता येत नसल्याची माहिती वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता शंकर कांबळे यांनी दिली. यामुळे शेतकऱ्यांकरिता सौर कृषी पंप योजना लाभाची ठरणार आहे. यात शेतकरी त्याच्या गरजेनुसार त्याचा उपययोग करू शकतो.