शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

सौर कृषिपंपातून ३०० दिवस पाणी

By admin | Updated: October 16, 2015 02:52 IST

पारंपरिक पद्धतीने विद्युतीकरण न झालेल्या शेतकऱ्यांना सिंचनाच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी पाच एकरापेक्षा कमी असलेल्या शेतकऱ्यांना सौर कृषी पंप देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.....

आशुतोष सलील : तब्बल २० वर्षे वीज देयक भरण्यापासून सुटकावर्धा: पारंपरिक पद्धतीने विद्युतीकरण न झालेल्या शेतकऱ्यांना सिंचनाच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी पाच एकरापेक्षा कमी असलेल्या शेतकऱ्यांना सौर कृषी पंप देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील ९२० शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. या पंपामुळे शेतकरी वर्षातील ३०० दिवस ओलित करू शकेल. यामुळे सौर कृषीपंप जोडण्याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे जिल्हाधिकारी आशुतोष सलील म्हणाले.घोराड येथे देवराव तडस यांच्या शेतात सौर कृषिपंपाच्या प्रात्यक्षिकाची पाहणी जिल्हाधिकारी सलील यांनी गुरुवारी केली. सौर उर्जेद्वारा तीन अश्वशक्ती तसेच ५ व ७.५ अश्वशक्ती सौरपंपाद्वारा शेतीला सिंचनाची सुविधा उपलब्ध होऊ शकते. शेतकऱ्यांना सौर उर्जेवर कृषी पंपाची प्रत्यक्ष पाहणी करता यावी याकरिता या प्रात्याक्षिकाचे आयोजन करण्यात आले होते. सौर कृषीपंप योजना ही आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांसाठी प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येत आहे. या योजनेमध्ये केंद्र व राज्य शासनाचे अनुदान असून लाभार्थ्यांना केवळ ५ टक्के मिळवून सौर कृषीपंप महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीतर्फे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. धडक सिंचनचे लाभार्थी, अतिदुर्गम भागातील शेतकरी तसेच ज्या गावात विद्युतीकरण झाले नाही, अशा शेतकऱ्यांना या योजनेचा प्राधान्याने लाभ मिळणार आहे.सौर कृषीपंप योजनेचे प्रात्यक्षिक घोराड तसेच समुद्रपूर येथे आयोजित करण्यात आले असून या योजनेंतर्गत तीन अश्वशक्ती पंपासाठी २५० अश्वशक्तीची १२ पॅनेल तसेच पाच अश्वशक्तीसाठी २० पॅनेल राहणार आहेत. ३६५ दिवसांपैकी सौरउर्जेद्वारे ३०० दिवस दररोज आठ तास कृषीपंपाद्वारे शेतकऱ्यांना ओलिताची सुविधा उपलब्ध होणार आहे. सौरपंपाची कालमर्यादा २० ते २५ वर्षे असल्यामुळे २० वर्ष वीज देयक भरण्याची आवश्यकता राहणार नाही. तीन अश्व शक्तीसाठी शेतकऱ्यांना १६ हजार २०० रुपये सहभाग भरल्यास ३ लक्ष २४ हजार रुपयांचा ३ अश्वशक्तीचा सोलार पंप उपलब्ध होणार आहे. शेतकऱ्यांनी योजनेमध्ये सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केले. प्रारंभी वीज कंपनीचे अधीक्षक अभियंता एस.ए. कांबळे यांनी त्यांचे सौर उर्जा प्रात्यक्षिकाबद्दल माहिती दिली. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर भारती, कार्यकारी अभियंता व प्रकल्प समन्वयक विजयकुमार उगले, तहसीलदार होळी, तालुका कृषी अधिकारी आर.एस. जावंधिया, वीज वितरण कंपनीचे उपअभियंता पुरी, जतीन पटेल, पंकज वाढण, अमित वागडे आदी उपस्थित होते.(प्रतिनिधी)आठवड्यातून चार दिवस दिवसाला आठ तर ३ दिवस रात्रीला १० तास थ्रिफेज पुरवठा शेतकऱ्यांना ओलिताकरिता एमईआरसीच्या नियमानुसार आठवड्यातून चार दिवस दिवसाला आठ तास तर तीन दिवस रात्रीला १० तास थ्रिफेज विद्यूत पुरवठा करण्यात येत आहे. या संदर्भात वरिष्ठ कार्यालयाकडून कुठल्याही सूचना अल्याशिवाय बदल करता येत नसल्याची माहिती वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता शंकर कांबळे यांनी दिली. यामुळे शेतकऱ्यांकरिता सौर कृषी पंप योजना लाभाची ठरणार आहे. यात शेतकरी त्याच्या गरजेनुसार त्याचा उपययोग करू शकतो.