शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात पुन्हा बरसणार! या जिल्ह्यांमध्ये 'शक्ती' चक्रीवादळाचा इशारा; जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस
2
ज्योती मल्होत्रानंतर आणखी २ युट्यूबर अटकेत; पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असल्याचा आरोप
3
रहस्यमय! ६० विमा पॉलिसी, ३९ कोटी अन् ३ हत्या; आई-बाप आणि पत्नीच्या मृत्यूचा 'त्याने' केला सौदा
4
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
5
अमेरिकेच्या 'H-1B' निर्णयाने जगभरातील संधींचे दरवाजे उघडले! कॅनडा-जर्मनीचा नवा गेम प्लॅन, भारतीयांना मोठा फायदा
6
आजचे राशीभविष्य- ४ ऑक्टोबर २०२५: पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या, कमी वेळात जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा
7
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
8
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
9
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
10
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
11
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
12
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
13
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत
14
संपादकीय : आता खरी लढाई! मेळावे झाले, घोषणा झाल्या... आता सीमोल्लंघन कधी?
15
पाणंद रस्ते मोकळे करा,  तरच मिळेल सरकारी लाभ; प्रस्ताव विचाराधीन
16
सोमवारपासून परतीच्या सरी; चक्रीवादळ 'शक्ती'मुळे महाराष्ट्रात पुन्हा पाऊस? हवामान खात्याचा नेमका अंदाज काय?
17
डोनाल्ड ट्रम्प आता सिनेमावाल्यांवर का भडकले?
18
आपण जंगलाला आग लावली, पूर गावात बोलावला!
19
मनोज जरांगेंचा १९९४ च्या जी. आर. विरोधात एल्गार! 'या' दोन मोठ्या जातींच्या आरक्षणावर बोलले
20
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट

लॉकडाऊन काळात ३७ दिवसात तब्बल २६६ विवाह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2020 05:00 IST

तीन महिन्यानंतर लॉकडाऊनमध्ये शिथिलता आल्यानंतर काही प्रमाणात व्यवहार आणि जनजीवन पूर्वपदावर आले. जिल्हाधिकाऱ्यांनी लग्न समारंभ मोजक्याच उपस्थितीत साजरा करण्याबाबतचे आदेश निर्गमित केले. तहसीलदारांना नागरिकांचे विवाह सोहळ्यास परवानगी देण्याचे अधिकार मिळाले. सोशल डिस्टन्सिंग, संचारबंदी, तसेच जमावबंदीच्या नियमाचे पालन करण्याचे अधीन राहत अटी, शर्ती घालून लग्नसमारंभांना परवानगी देण्यात आली.

ठळक मुद्देआर्वी तालुक्यात वर-वधू पित्यांकडून थाटमाटाला छेद : समारंभावर होणारा लाखो रुपयांचा अनाठायी खर्च वाचला

राजेश सोळंकी।लोकमत न्यूज नेटवर्कदेऊरवाडा/आर्वी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एन हंगामात लॉकडाऊन होते. दरम्यानच्या ३७ दिवसांच्या काळात कुठलाही थाटमाट न करता तब्बल २६६ विवाह पार पडले. यामुळे लग्नसमारंभांवर होणारा लाखो रुपयांचा चुराडा वाचला.मार्च, एप्रिल व मे हे तीन महिने लग्नसराईचे. मात्र या महिन्यातील सर्व विवाहच लॉकडाउन काळात लॉक झाले. मंगल कार्यालय, बँड बाजा, वराती, घोडा गाडी, आचारी, भोजन, दुकाने, ब्युटीपार्लर आदींवर बंदी घालण्यात आली. सर्वच ठप्प झाले. या लॉकडाऊनची गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत सर्वांनाच झळ बसली.तीन महिन्यानंतर लॉकडाऊनमध्ये शिथिलता आल्यानंतर काही प्रमाणात व्यवहार आणि जनजीवन पूर्वपदावर आले. जिल्हाधिकाऱ्यांनी लग्न समारंभ मोजक्याच उपस्थितीत साजरा करण्याबाबतचे आदेश निर्गमित केले. तहसीलदारांना नागरिकांचे विवाह सोहळ्यास परवानगी देण्याचे अधिकार मिळाले. सोशल डिस्टन्सिंग, संचारबंदी, तसेच जमावबंदीच्या नियमाचे पालन करण्याचे अधीन राहत अटी, शर्ती घालून लग्नसमारंभांना परवानगी देण्यात आली. तालुक्यात पहिली परवानगी टाकळी निजामपूर येथील विवाह सोहळ्यास देण्यात आली होती. तेव्हापासून तर आतापावेतो परवानगीनंतर ३७ दिवसात तब्बल २६६ विवाहसोहळे पार पडले. आजघडीला एका विवाह सोहळ्यास कमीतकमी साधारण ३ ते ५ लाखांचा खर्च येतो. कोरोनाने विवाह सोहळ्यांवर होणारा हा अनाठायी वाचला. तहसीलदार विद्यासागर चव्हाण, नायब तहसीलदार दीपक काळुसे, श्रीधर मोहोड, सुभानखाँ पठाण यांच्या पथकाने या विवाह सोहळ्याची सर्व कागदपत्रे तपासून परवानगी दिली. महत्त्वाचे म्हणजे आजपर्यंत काहीही अडचण न येता व्यवस्थितपणे सोशल डिस्टन्सिंग आणि शासनाच्या निर्देशांचे पालन करून २६६ विवाह पार पडले.

टॅग्स :marriageलग्न