शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे 'शिवतीर्थ'हून निघाले, कार थांबवली, काच खाली केली अन् म्हणाले, "मातोश्री'वर चाललोय...!"
2
राहुल गांधींच्या लेखाने राजकीय भूंकप, विधानसभा निवडणूक फिक्सिंगची चौकशी का करत नाही?: सपकाळ
3
राज्यातील महाराष्ट्रविरोधी सरकार घालवायला ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर स्वागत: वडेट्टीवार
4
"मी गावचा माणूस, मला इंग्रजी समजत नाही"; शिक्षणमंत्र्यांनी विद्यार्थिनीसमोर पकडले कान
5
तुम्हाला गुंतवणूकीचा ६०:४० चा नियम माहितीये? पैसे कमावण्याची आहे सोपी पद्धत, जाणून घ्या कसं?
6
Raja Raghuvanshi : सस्पेन्स वाढला! राजा आणि सोनमचं मेघालयमध्ये झालं भांडण? भावाला आल्या धमक्या
7
Fact Check: पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीचं निधन? व्हायरल व्हिडीओमागील सत्य समोर!
8
३० लाखांच्या होम लोनवर वाचतील ४.६३ लाख; आपली कर्जाची रक्कम टाका आणि पाहा किती होईल बचत?
9
Astrology: राहू दशा सुरु झाली हे कसं ओळखावं? राहूमुळे कोणकोणती हानी होते? वाचा!
10
'सुनील तटकरेंनी राजीनामा द्यायला पाहिजे, त्यांनी दिला तर मी नक्की देईन', आमदार महेंद्र थोरवेंचा घणाघात
11
स्कूटरवरून आले, सामान हॉटेलमध्ये ठेवलं अन्...; राजा आणि सोनम बेपत्ता होण्यापूर्वीच्या CCTV व्हिडीओमध्ये काय?
12
“२ तास गोंधळ, मतमोजणी हायजॅक, मोदींचा वाराणसीत जवळपास पराभवच झाला होता”; कुणाचा दावा?
13
एकटं राहायला आवडतं? उषा नाडकर्णी म्हणाल्या, "आमच्या इमारतीत राज ठाकरेंची मावशी..."
14
म्युच्युअल फंड गुंतवणूकदाराचा अचानक मृत्यू झाला तर पैशांचं काय होतं? पाहा महत्त्वाची माहिती आणि प्रक्रिया
15
Astrology: पत्रिका मंगळाची असेल तर सगळेच अमंगल होते का? काय आहे त्यावर उपाय? वाचा!
16
Rahul Gandhi: महाराष्ट्र विधानसभेत 'मॅच फिक्सिंग', राहुल गांधींचा आरोप; भाजपचा पलटवार!
17
Jyoti Malhotra : ज्योती मल्होत्राबाबत मोठा खुलासा; पाकिस्तानमधील रिटायर्ड सब-इन्स्पेक्टरच्या होती संपर्कात
18
COVID19: कोरोना वाढतोय, काळजी घ्या! २४ तासांत ४ मृत्यू, सक्रीय रुग्णांची संख्या ५००० च्या वर!
19
“२०१४, २०१७ ला काय घडले यात रस नाही, आम्ही मागे वळून पाहत नाही”; प्रस्तावावर राऊतांचे विधान
20
'उद्धव ठाकरेंना गर्दीचं मतांमध्ये परिवर्तन करण्यात यश', शरद पवार राज ठाकरेंबद्दल काय म्हणाले?

लॉकडाऊन काळात ३७ दिवसात तब्बल २६६ विवाह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2020 05:00 IST

तीन महिन्यानंतर लॉकडाऊनमध्ये शिथिलता आल्यानंतर काही प्रमाणात व्यवहार आणि जनजीवन पूर्वपदावर आले. जिल्हाधिकाऱ्यांनी लग्न समारंभ मोजक्याच उपस्थितीत साजरा करण्याबाबतचे आदेश निर्गमित केले. तहसीलदारांना नागरिकांचे विवाह सोहळ्यास परवानगी देण्याचे अधिकार मिळाले. सोशल डिस्टन्सिंग, संचारबंदी, तसेच जमावबंदीच्या नियमाचे पालन करण्याचे अधीन राहत अटी, शर्ती घालून लग्नसमारंभांना परवानगी देण्यात आली.

ठळक मुद्देआर्वी तालुक्यात वर-वधू पित्यांकडून थाटमाटाला छेद : समारंभावर होणारा लाखो रुपयांचा अनाठायी खर्च वाचला

राजेश सोळंकी।लोकमत न्यूज नेटवर्कदेऊरवाडा/आर्वी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एन हंगामात लॉकडाऊन होते. दरम्यानच्या ३७ दिवसांच्या काळात कुठलाही थाटमाट न करता तब्बल २६६ विवाह पार पडले. यामुळे लग्नसमारंभांवर होणारा लाखो रुपयांचा चुराडा वाचला.मार्च, एप्रिल व मे हे तीन महिने लग्नसराईचे. मात्र या महिन्यातील सर्व विवाहच लॉकडाउन काळात लॉक झाले. मंगल कार्यालय, बँड बाजा, वराती, घोडा गाडी, आचारी, भोजन, दुकाने, ब्युटीपार्लर आदींवर बंदी घालण्यात आली. सर्वच ठप्प झाले. या लॉकडाऊनची गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत सर्वांनाच झळ बसली.तीन महिन्यानंतर लॉकडाऊनमध्ये शिथिलता आल्यानंतर काही प्रमाणात व्यवहार आणि जनजीवन पूर्वपदावर आले. जिल्हाधिकाऱ्यांनी लग्न समारंभ मोजक्याच उपस्थितीत साजरा करण्याबाबतचे आदेश निर्गमित केले. तहसीलदारांना नागरिकांचे विवाह सोहळ्यास परवानगी देण्याचे अधिकार मिळाले. सोशल डिस्टन्सिंग, संचारबंदी, तसेच जमावबंदीच्या नियमाचे पालन करण्याचे अधीन राहत अटी, शर्ती घालून लग्नसमारंभांना परवानगी देण्यात आली. तालुक्यात पहिली परवानगी टाकळी निजामपूर येथील विवाह सोहळ्यास देण्यात आली होती. तेव्हापासून तर आतापावेतो परवानगीनंतर ३७ दिवसात तब्बल २६६ विवाहसोहळे पार पडले. आजघडीला एका विवाह सोहळ्यास कमीतकमी साधारण ३ ते ५ लाखांचा खर्च येतो. कोरोनाने विवाह सोहळ्यांवर होणारा हा अनाठायी वाचला. तहसीलदार विद्यासागर चव्हाण, नायब तहसीलदार दीपक काळुसे, श्रीधर मोहोड, सुभानखाँ पठाण यांच्या पथकाने या विवाह सोहळ्याची सर्व कागदपत्रे तपासून परवानगी दिली. महत्त्वाचे म्हणजे आजपर्यंत काहीही अडचण न येता व्यवस्थितपणे सोशल डिस्टन्सिंग आणि शासनाच्या निर्देशांचे पालन करून २६६ विवाह पार पडले.

टॅग्स :marriageलग्न