शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

साधारण गुन्ह्यांतील २६ बंदीवानांची सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2020 06:00 IST

संपूर्ण जगात कोरोना विषाणूने थैमान घातला आहे. देशातही कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत चालली आहे. कोरोना विषाणूने आता राज्यातही आपले पाय हळू हळू पसरले आहे. कोरोना संक्रमणाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर उपाययोजना राबविण्यात येत असताना कारागृहात असलेल्या बंदीवानांचाही विचार शासनाने केलेला आहे.

ठळक मुद्देकोरोनाचा धसका । २५२ बंदींच्या प्रस्तावाला न्यायालयाच्या मंजुरीची प्रतीक्षा

चैतन्य जोशी।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सध्या देशात कोरोना विषाणूने कहर केला असून या महामारीला रोखण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहे. गृहविभागाच्या आदेशानुसार तसे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कारागृहात असलेल्या साधारण बंदीवानांना सोडण्याचे निर्देश देण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर जे बंदीवान साधारण गुन्ह्यांच्या स्वरुपात कारागृहात होते अशा २६ बंदीवानांना शुक्रवारी कारागृहातून सोडण्यात आले.संपूर्ण जगात कोरोना विषाणूने थैमान घातला आहे. देशातही कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत चालली आहे. कोरोना विषाणूने आता राज्यातही आपले पाय हळू हळू पसरले आहे. कोरोना संक्रमणाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर उपाययोजना राबविण्यात येत असताना कारागृहात असलेल्या बंदीवानांचाही विचार शासनाने केलेला आहे.जे बंदीवान साधारण गुन्ह्यात कारागृहात आलेले आहे अशांना सोडण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे. त्याअनुषंगाने वर्धा जिल्हा कारागृहात बंदीवानांची गर्दी वाढू नये, यासाठी साधारण गुन्ह्यांच्या स्वरुपात अडकलेल्या २६ बंदीवानांना शुक्रवारी सोडण्यात आले आहे.वर्धा जिल्हा कारागृहात २५२ बंदीवानांची क्षमता आहे. सध्या कारागृहात क्षमतेपेक्षा जास्त म्हणजे ३५२ बंदीवान आहेत.सात वर्षांपेक्षा कमी शिक्षा लागणाऱ्या कलमांन्वये तसेच साधारण स्वरुपाच्या गुन्ह्यातील तब्बल २६ बंदीवानांना कारागृहातून सोडण्यात आले आहे. तर २७० बंदीवानांना कारागृहातून मुक्त करण्यासाठी विनंती अर्ज संबंधीत न्यायालयाकडे पाठविण्यात आले आहे. न्ययालयाकडून त्यांचा विचार झाल्यावरच त्या बंदीवानांना देखील सोडण्यात येणार आहे.कारागृहाच्या प्रवेशद्वारावरच बंदीवानांची तपासणीकोरोनाच्या पार्श्वभूमीवर कारागृहात आणल्या जाणाऱ्या बंदीवानांची कारागृहाच्या प्रवेशद्वारावरच आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. जर एखाद्या बंदीवानाला सर्दी, खोकला झाल्याचे निदर्शनास येताच त्यांना रुग्णालयात दाखल केल्या जात आहे.हिंगणघाट न्यायालयाने सोडले सहा बंदीकोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी न्यायालयीन कामकाज देखील बंद ठेवण्यात आले आहे. पण, न्यायालयातील एक कोर्टाचे कामकाज मात्र, सुरू आहे. जिल्हा कारागृह प्रशासनाने २७० बंदीवानांना सोडण्याचे विनंती अर्ज संबंधित न्यायालयात दाखल केले होते. त्यापैकी २६ बंदीवानांना सोडण्यात आले. यामध्ये हिंगणघाट न्यायालयाने ६ बंदीवानांची सुटका केली.सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार साधारण स्वरुपातील असलेल्या तसेच सात वर्षे शिक्षेच्या आतील येत असलेल्या बंदीवानांना मुक्त करण्याच्या सूचना होत्या. त्यानुसार आतापर्यंत २६ बंदीवानांना कारागृहातून सोडण्यात आले आहे तर २५२ बंदीवानांचे विनंतीअर्ज संबंधित न्यायालयाकडे पाठविण्यात आले आहे. संबंधित न्यायालय याबाबतचा विचार करणार आहे.सुहास पवार, कारागृह अधीक्षक, जिल्हा कारागृह, वर्धा.

टॅग्स :jailतुरुंग