शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत वादळ वारं सुटलंय... विमानतळाचा रनवे बंद; पावसाला सुरुवात, मेट्रो-१ सेवा ठप्प
2
ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबईत आधी धुळीचं वादळ; मग धो-धो पाऊस
3
VIDEO : हे कोण... आपण कोण...? महिलांचे हिजाब वर करून बघू लागल्या माधवी लता! FIR दाखल
4
आर्थिक संकटातून सावरणाऱ्या अफगाणिस्तानला पुराचा तडाखा; 300हून अधिक लोकांचा मृत्यू
5
काँग्रेसकडून अचानक 'जय मराठी'चा नारा; सरकार स्थापन होताच...; जयराम रमेश यांचं वचन
6
दादागिरी पडली महागात, मतदान केंद्रात मारहाण करणाऱ्या आमदारावर मतदाराने उगारला हात
7
महाराष्ट्रात दुपारी १ वाजेपर्यंत ३०.८५ टक्के मतदान; 'या' मतदारसंघात मिळाला सर्वाधिक प्रतिसाद!
8
'अडवाणी, मुरली मनोहर जोशींप्रमाणे नरेंद्र मोदींनाही ७५ वर्षानंतर राजकारणातून निवृत्त करणार का? काँग्रेसचा सवाल
9
'4 जूनपूर्वी खरेदी करा, दमदार वाढ होणार...', शेअर बाजाराबाबत अमित शाहंची भविष्यवाणी
10
शाहीन आफ्रिदी आणि अफगाणिस्तानच्या चाहत्यामध्ये बाचाबाची, नेमकं काय घडलं? Video
11
'माझ्या परवानगीशिवाय मला जन्म का दिला?' नाराज मुलीने आई-वडीलांवरच दाखल केला खटला
12
Share Market मध्ये रिकव्हरी; फार्मा, आयटी, बँक इंडेक्समुळे तेजी; TATA Motors आपटला
13
Arvind Kejriwal : "कधी कधी अपमानित करायचे..."; अरविंद केजरीवालांनी सांगितली जेलमधील आपबीती
14
RCB च्या विजयाने Play Off चे गणित किचकट झाले! ३ स्थानासाठी ७ संघ मैदानात उरले
15
मराठी मालिकेच्या सेटवर बिबट्याची एन्ट्री, ४०० भाग पूर्ण झाल्यानिमित्त होतं सेलिब्रेशन
16
'पाकिस्तानने बांगड्या भरल्या नसतील तर आम्ही त्यांना बांगड्या भरण्यास भाग पाडू', नरेंद्र मोदींचा टोला   
17
Virat Kohli-अनुष्का शर्माची २.५ कोटींच्या गुंतवणूकीचे झाले ९ कोटी; आता कंपनीचा येणार IPO, गुंतवणूक करणार का?
18
धावत्या BULLET ला लागली आग; पेट्रोल टाकीचा स्फोट होऊन एकाचा मृत्यू तर 9 गंभीर जखमी
19
पैसे काढण्याशिवायही आहे तुमच्या ATM कार्डाचा उपयोग, त्यावर मिळणाऱ्या विम्याची माहिती आहे का? पाहा
20
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates :राज्यात निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात दुपारी १ वाजेपर्यंत सरासरी ३०.८५ टक्के मतदान झाले

२,५३१ आॅटोंची विना परवाना प्रवासी वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 11:52 PM

जिल्ह्यात प्रवाशांना त्यांच्या स्थळी पोहोचविण्याकरिता अनेक आॅटो रस्त्याने धावत आहेत. यातील तब्बल २ हजार ५३१ आॅटो चालकांकडे प्रवासी वाहतूक परवाना नसल्याचे समोर आले आहे.

ठळक मुद्दे२,९०० आॅटोंनाच प्रवासी परवाना : उप प्रादेशिक परिवहन विभागाकडून तपासणी मोहीम

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यात प्रवाशांना त्यांच्या स्थळी पोहोचविण्याकरिता अनेक आॅटो रस्त्याने धावत आहेत. यातील तब्बल २ हजार ५३१ आॅटो चालकांकडे प्रवासी वाहतूक परवाना नसल्याचे समोर आले आहे. या आॅटोतून प्रवास करणे अवैध असून वाहतूक कायद्याची पायमल्ली करणाऱ्या या आॅटोचालकांवर उप प्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने दंडात्मक कारवाई करण्याकरिता एक मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे.अवैधपणे चालणाºया रिक्षांमधून प्रवासी वाहतूक करणे पूर्णता: बेकायदेशीर आहे. अशा वाहनास अपघात झाल्यास अशी वाहतूक मुळातच बेकायदेशीर असल्याने प्रवासी कोणत्याही विमा संरक्षणास पात्र राहत नाही. यासाठी अवैध रिक्षातून प्रवास करणे नागरिकांनी टाळणे गरजेचे आहे. यासाठी जिल्ह्यात खाजगी संवर्ग आॅटोरिक्षा अवैध प्रवासी वाहतूक तपासणी विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे.बसस्थानक असो वा रेल्वे स्थानक या ठिकाणाहून प्रवाशांना त्यांच्या नियोजित स्थळी पोहोचविण्याकरिता आॅटो चालकांना परवाना देण्यात आला आहे. वर्धेत असा परवाना धारक आॅटोचालकांची संख्या २ हजार ९०० एवढी आहे. या आॅटो चालकांकडून दूरचे प्रवासी नेण्याची जबाबदारी पार पाडली जात आहे. शहरात मात्र खासगी आॅटो चालकांकडून प्रवासी वाहतूक होत असल्याचे दिसून आले आहे.या मोहिमेत केवळ आॅटोच नाही तर इतर अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांचीही तपासणी करण्यात येणार आहे. या मोहिमेत आॅटो चालकांना त्यांचा खासगी वाहनाचा परवाना रद्द करून तो प्रवासी वाहनाचा करण्यासंदर्भातही नोटीस बजावण्यात येणार असल्याची माहिती उप प्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने देण्यात आली आहे.नव्या आॅटोंना मुभा, जुन्यांना दंडउप प्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या या मोहिमेत आॅटो चालकांना काही शुल्क भरून त्यांचा परवाना प्रवासी करण्याच्या सूचना करण्यात येत आहे. ही मुभा केवळ नवीन आॅटो चालकांना देण्यात आली आहे. जुन्या आॅटो चालकांना मात्र दंड करण्यात येणार असल्याची माहिती आहे.यापूर्वी उप प्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने अशीच मोहीम राबविण्यात आली होती. या मोहिमेत काही आॅटो चालकांनी त्यांचा परवाना बदलवून घेतला आहे. यामुळे इतर आॅटो चालकांनी आपला खासगी परवाना बदलवून घ्यावा.अवैधपणे चालणाऱ्या आॅटो रिक्षांमधून प्रवासी वाहतूक बेकायदेशीर आहे. अशा वाहनास अपघात झाल्यास प्रवाशी कोणत्याही विमा संरक्षणास पात्र राहत नाही. यासाठी अवैध आॅटो रिक्षातून प्रवास करणे नागरिकांनी टाळावे. यासाठी जिल्ह्यात खाजगी संवर्ग अ‍ॅटोरिक्षा अवैध प्रवासी वाहतूक तपासणी विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे.- विजय तिराणकर, सहाय्यक उप प्रादेशिक परिवहन अधिकारी वर्धा.