शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

वन कायद्यान्वये २५२ गुन्ह्यांची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 23:59 IST

‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’ ही शिकवण विविधतेत एकता असलेली भारतीय संस्कृती प्रत्येकाला शिकवते. परंतु काही जण याच वन संपदेचे नुकसान करीत वन्य प्राण्यांच्या शिकारीही करीत असल्याचे वास्तव आहे.

ठळक मुद्देअवैध वृक्ष कत्तलीसह शिकारीला आळा : पेट्रोलिंग व्हॅन ठरल्या फायद्याच्या

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’ ही शिकवण विविधतेत एकता असलेली भारतीय संस्कृती प्रत्येकाला शिकवते. परंतु काही जण याच वन संपदेचे नुकसान करीत वन्य प्राण्यांच्या शिकारीही करीत असल्याचे वास्तव आहे. वन्य प्राण्याची शिकार करणाऱ्यांना धडा शिकविण्यासह वनसंपदेचे संवर्धन करण्यासाठी सध्या स्थानिक वन विभागाने कंबर कसली आहे. शिवाय वन कायद्यान्वये २५२ गुन्ह्याची नोंद वन विभागाने घेतली आहे.जिल्ह्यात वर्धा, समुद्रपूर, हिंगणी, कारंजा (घा.), तळेगाव, आष्टी, आर्वी व खरांगणा हे वन परिक्षेत्र आहेत. याच परिसरात अवैध वृक्षतोड, वन्य प्राण्यांची शिकार, वन जमिनीवर अतिक्रमण, वन जमिनीवर होणारे अवैध उत्खनन, प्रतिबंधित क्षेत्रात चराई, वन वनवा आदींना आळा घालण्यासाठी वन विभागाच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांकडून सध्या विशेष प्रयत्न केले जात आहेत. वरिष्ठांच्या सुचनेवरून प्रतिबंधात्मक ठरणारे काम करताना काही चूकीचे होत असल्याचे निदर्शनात आल्यामुळे सप्टेंबर अखेरपर्यंत वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी वन कायद्यान्वये २५२ गुन्ह्यांची नोंद घेतली आहे.कुठली अनुचित घटना घडू नये म्हणून वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी वेळोवेळी गस्त घालतात. गस्तीसाठी काही चमूही तयार करण्यात आल्या आहेत. ती चमू सक्रिय राहत असल्याने पूर्वीच्या तुलनेत अवैध वृक्ष कत्तल आणि वन्य प्राण्यांच्या शिकारीच्या प्रकाराला आळा बसल्याचे दिसून येते. गस्तीसाठी तयार करण्यात आलेल्या चमूतील अधिकाऱ्यांकडून वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी वेळोवेळी माहिती जाणून घेतात. तसेच वरिष्ठ अधिकारी योग्य सूचनाही त्यांना करीत असल्याचे वन विभागाच्या कर्मचाºयांनी सांगितले.आठ गस्त तर दोन विशेष पथकवन विभागाच्यावतीने जिल्ह्यातील आठही वन परिक्षेत्र कार्यालयात गस्तीपथक तयार करण्यात आले आहे. इतकेच नव्हे तर तळेगाव आणि जिल्ह्याचे स्थळ असलेल्या वर्धा येथे विशेष भरारी पथक तयार करण्यात आले आहे. अनुचित प्रकाराची माहिती मिळताच ही पथक तात्काळ घटनास्थळ गाठत असल्याने तसेच सदर पथकातील अधिकारी व कर्मचाºयांकडून सध्या वनसंपदा संवर्धनाचा उद्देश जोपासल्या जात असल्याने ही पथके फायद्याचीच ठरत आहेत.जिल्ह्यातील वन संपदा व वन्य प्राण्यांचे संवर्धन व्हावे या उद्देशाला केंद्रस्थानी ठेवून आम्ही काम करीत आहो. आमच्या कामाला नागरिकांचेही सहकार्य मिळत आहे. जिल्ह्यात कुठेही वन कायद्याचे उल्लंघन होत असल्यास त्याची माहिती नागरिकांनी थेट वन विभागाच्या अधिकाºयांना द्यावी. तात्काळ कार्यवाही करण्यात येईल.- सुहास बढेकर, सहाय्यक, वनसंरक्षक, वर्धा.५९ प्रकरणे न्यायप्रविष्टवन कायद्यान्वये दाखल गुन्ह्यापैकी १५४ गुन्हे न्यायदानासाठी प्रतीक्षेत आहेत. त्यापैकी ५९ प्रकरणे न्यायालयात न्यायप्रविष्ट असून ३९ प्रकरणे सक्षम अधिकारी स्तरावर प्रलंबित असल्याचे सांगण्यात आले. तर ५६ प्रकरणे चौकशीत आहेत.९८ प्रकरणांचा निपटारावन कायद्यान्वे एकूण दाखल गुन्ह्यांच्या प्रकरणांपैकी ९८ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला आहे. निपटारा करण्यात आलेले ही प्रकरणे न्यायालयीन आणि विभागीय स्तरावरील असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :forest departmentवनविभागCrime Newsगुन्हेगारी