शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
2
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
3
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
4
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
5
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश
6
मुकेश अंबानींचा पगार किती? आकडा वाचून विश्वास बसणार नाही, ५ वर्षांपासून एकदाही बदल नाही!
7
बापरे! आई-वडिलांच्या एका छोट्याशा चुकीचा मुलांना त्रास, चेहऱ्यावर पडतात पांढरे डाग
8
Video: २५ हजार कमावतो, १० तर भाडेच भरतो...; सैयाराच्या गाण्याचे कार्पोरेट व्हर्जन लोकांच्या काळजाला भिडले...
9
ट्रम्प टॅरिफचा परिणाम, सोन्या-चांदीचे दर उच्चांकी स्तरावर; खरेदीसाठी आणखी खिसा रिकामा करावा लागणार
10
आधी फिल्मी स्टाईलने माहिती घेतली, कारवाई केली, आता त्याच कंपनीने शिंदेंच्या मंत्र्यांच्या कार्यक्रमाला स्पॉन्सर केले
11
इस्रायल, ब्रिटनपासून युक्रेनपर्यंत...; 'ही' धोकादायक मिसाईल खरेदी करण्यासाठी १९ देशांची धडपड!
12
रक्षाबंधन असणार खास! ६५ वर्षांपूर्वी जत्रेत हरवलेली बहीण सापडली, नातवाने भावाशी भेट घडवली
13
'अमेरिका दबाव टाकू शकत नाही; भारतानेही त्यांच्यावर ५०% कर लादावा', शशी थरुर थेट बोलले
14
मुंबई-गोवा ‘वंदे भारत’ २० कोचची होणार? कधीपासून सेवा सुरू करणार? प्रवाशांचा तुफान प्रतिसाद
15
ट्रम्पचा 'टॅरिफ बॉम्ब' थांबता थांबेना! आता थेट चिप्सवर १००% शुल्क, तुमच्या खिशाला किती फटका बसेल?
16
Shravan Purnima 2025: श्रावण पौर्णिमेला कोळीबांधव का करतात रामाची पूजा? जाणून घ्या कारण!
17
मॉर्फ कमी होते म्हणून की काय Elon Musk आता खालच्या पातळीवर उतरले; ग्रोक एआय देणार आता नग्न फोटो 
18
मुलीची पाठवणी करताना वधूपिता गहिवरला, डबडबल्या डोळ्यांनी जावईबापूंना म्हणाला- माझी लेक... (VIDEO)
19
कोरोना काळात एका गोळीसाठी अमेरिका तडफडत होता, भारताने एका कॉलवर ५० लाख टॅब्लेट पाठवल्या आणि आता...
20
५०० रुपयांच्या SIP चा हप्ता चुकला अन् बँकने लावला ५९० रुपये दंड, तुही तर ही चूक करत नाही ना?

वन कायद्यान्वये २५२ गुन्ह्यांची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 23:59 IST

‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’ ही शिकवण विविधतेत एकता असलेली भारतीय संस्कृती प्रत्येकाला शिकवते. परंतु काही जण याच वन संपदेचे नुकसान करीत वन्य प्राण्यांच्या शिकारीही करीत असल्याचे वास्तव आहे.

ठळक मुद्देअवैध वृक्ष कत्तलीसह शिकारीला आळा : पेट्रोलिंग व्हॅन ठरल्या फायद्याच्या

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’ ही शिकवण विविधतेत एकता असलेली भारतीय संस्कृती प्रत्येकाला शिकवते. परंतु काही जण याच वन संपदेचे नुकसान करीत वन्य प्राण्यांच्या शिकारीही करीत असल्याचे वास्तव आहे. वन्य प्राण्याची शिकार करणाऱ्यांना धडा शिकविण्यासह वनसंपदेचे संवर्धन करण्यासाठी सध्या स्थानिक वन विभागाने कंबर कसली आहे. शिवाय वन कायद्यान्वये २५२ गुन्ह्याची नोंद वन विभागाने घेतली आहे.जिल्ह्यात वर्धा, समुद्रपूर, हिंगणी, कारंजा (घा.), तळेगाव, आष्टी, आर्वी व खरांगणा हे वन परिक्षेत्र आहेत. याच परिसरात अवैध वृक्षतोड, वन्य प्राण्यांची शिकार, वन जमिनीवर अतिक्रमण, वन जमिनीवर होणारे अवैध उत्खनन, प्रतिबंधित क्षेत्रात चराई, वन वनवा आदींना आळा घालण्यासाठी वन विभागाच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांकडून सध्या विशेष प्रयत्न केले जात आहेत. वरिष्ठांच्या सुचनेवरून प्रतिबंधात्मक ठरणारे काम करताना काही चूकीचे होत असल्याचे निदर्शनात आल्यामुळे सप्टेंबर अखेरपर्यंत वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी वन कायद्यान्वये २५२ गुन्ह्यांची नोंद घेतली आहे.कुठली अनुचित घटना घडू नये म्हणून वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी वेळोवेळी गस्त घालतात. गस्तीसाठी काही चमूही तयार करण्यात आल्या आहेत. ती चमू सक्रिय राहत असल्याने पूर्वीच्या तुलनेत अवैध वृक्ष कत्तल आणि वन्य प्राण्यांच्या शिकारीच्या प्रकाराला आळा बसल्याचे दिसून येते. गस्तीसाठी तयार करण्यात आलेल्या चमूतील अधिकाऱ्यांकडून वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी वेळोवेळी माहिती जाणून घेतात. तसेच वरिष्ठ अधिकारी योग्य सूचनाही त्यांना करीत असल्याचे वन विभागाच्या कर्मचाºयांनी सांगितले.आठ गस्त तर दोन विशेष पथकवन विभागाच्यावतीने जिल्ह्यातील आठही वन परिक्षेत्र कार्यालयात गस्तीपथक तयार करण्यात आले आहे. इतकेच नव्हे तर तळेगाव आणि जिल्ह्याचे स्थळ असलेल्या वर्धा येथे विशेष भरारी पथक तयार करण्यात आले आहे. अनुचित प्रकाराची माहिती मिळताच ही पथक तात्काळ घटनास्थळ गाठत असल्याने तसेच सदर पथकातील अधिकारी व कर्मचाºयांकडून सध्या वनसंपदा संवर्धनाचा उद्देश जोपासल्या जात असल्याने ही पथके फायद्याचीच ठरत आहेत.जिल्ह्यातील वन संपदा व वन्य प्राण्यांचे संवर्धन व्हावे या उद्देशाला केंद्रस्थानी ठेवून आम्ही काम करीत आहो. आमच्या कामाला नागरिकांचेही सहकार्य मिळत आहे. जिल्ह्यात कुठेही वन कायद्याचे उल्लंघन होत असल्यास त्याची माहिती नागरिकांनी थेट वन विभागाच्या अधिकाºयांना द्यावी. तात्काळ कार्यवाही करण्यात येईल.- सुहास बढेकर, सहाय्यक, वनसंरक्षक, वर्धा.५९ प्रकरणे न्यायप्रविष्टवन कायद्यान्वये दाखल गुन्ह्यापैकी १५४ गुन्हे न्यायदानासाठी प्रतीक्षेत आहेत. त्यापैकी ५९ प्रकरणे न्यायालयात न्यायप्रविष्ट असून ३९ प्रकरणे सक्षम अधिकारी स्तरावर प्रलंबित असल्याचे सांगण्यात आले. तर ५६ प्रकरणे चौकशीत आहेत.९८ प्रकरणांचा निपटारावन कायद्यान्वे एकूण दाखल गुन्ह्यांच्या प्रकरणांपैकी ९८ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला आहे. निपटारा करण्यात आलेले ही प्रकरणे न्यायालयीन आणि विभागीय स्तरावरील असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :forest departmentवनविभागCrime Newsगुन्हेगारी