शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
3
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
4
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
5
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
6
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
7
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
8
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
9
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
10
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
11
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा
12
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
13
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
14
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
15
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
16
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
17
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
18
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
19
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
20
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप

‘बर्ड फ्लू’ रोखण्यासाठी वर्धा जिल्ह्यात २४ ‘रॅपिड रिस्पॉन्स टिम’ तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 12:45 PM

Wardha News वर्धा जिल्ह्यात राज्यस्तर आणि स्थानिक स्तर असे एकूण १०५ पशुवैद्यकीय संस्था असून, त्यांच्या माध्यमातून सर्वेक्षणाचे काम सुरू झाले आहे.

ठळक मुद्देसतर्कता बाळगण्याचे आवाहन आपत्ती व्यवस्थापन कक्ष सज्ज

 लोकमत न्यूज नेटवर्क

वर्धा : जिल्ह्यात अद्यापही बर्ड फ्लूचे निदान झाले नाही. मात्र, स्थलांतरित पक्षी, पानथळे, तलाव तसेच पोल्ट्री फार्म येथे यंत्रणांनी पाळत ठेवून सतर्क राहावे, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाने केले आहे. जिल्ह्यात राज्यस्तर आणि स्थानिक स्तर असे एकूण १०५ पशुवैद्यकीय संस्था असून, त्यांच्या माध्यमातून सर्वेक्षणाचे काम सुरू झाले आहे. रोगाचा शिरकाव झाल्यास दक्षता घेण्यासाठी प्रत्येकी तीन अधिकारी, कर्मचाऱ्यांचा समावेश असलेल्या २४ शिघ्र कृतिदल (रॅपिड रिस्पॉन्स टिम) तयार करण्यात आल्या आहेत. तसेच आपत्ती व्यवस्थापन कक्षाचीही निर्मिती करण्यात आली आहे.

बर्ड फ्लूचा प्रसार स्थलांतरित पक्ष्यामुळे होतो. पक्षी तलाव व लगतच्या कार्यक्षेत्रात राहत असल्याने संबंधित यंत्रणांना एव्हियन इन्फ्लूएन्झा (बर्ड फ्लू) रोग प्रादुर्भाव संबंधी सतर्कता बाळगण्यासाठी लघुसिंचन विभाग, वनविभाग, पंचायत समितीच्या कार्यक्षेत्रात कुक्कुट पक्षी, वन्यपक्षी व स्थलांतरित पक्षी यांच्यामध्ये असाधारण मृत पक्षी दिसून आल्यास त्वरित जवळच्या सहायक आयुक्त पशुसंवर्धन, तालुका लघु पशु चिकित्सालय किंवा पशुवैद्यकीय दवाखान्यात संपर्क साधावा, असे आवाहन जि.प.चे मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. ओम्बासे यांनी केले आहे. आहाराच्या पद्धती लक्षात घेता तसेच अंडी व कुक्कुट मांस ७० अंश सेंटीग्रेड तापमानावर ३० मिनिटे शिजवून खाल्यास या रोगाचा विषाणू निष्क्रिय होत असल्याने अंडी व मांस खाणे हे पूर्णत: सुरक्षित आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये, कोंबडी विक्रेत्यांनी ग्राहकांमध्ये आत्मविश्वास वाढविण्यास मदत होण्यासाठी मास्क व ग्लोव्हजचा वापर करावा, असे आवाहन पशुसंवर्धन अधिकारी डॉ. प्रज्ञा डायगव्हाणे यांनी केले.

प्रत्येक ग्रामपंचायतीने धुण्याचा सोडा ( ठं2उङ्म3 सोडियम कार्बोनेट) चे 1 लिटर पाण्यामध्ये ७ ग्रॅम याप्रमाणे द्रावण तयार करून कोंबड्यांची खुराडे, गुरांचे गोठे, गावातील गटारे, नाल्या, पशुपक्ष्यांचा वावर असलेल्या भिंती व जमिनीवर तत्काळ फवारणी करावी. दर १५ दिवसांच्या अंतराने ३ वेळा फवारणी करावी, सद्य:स्थितीत जिल्ह्यात कुक्कुट पक्षी, वन्यपक्षी व स्थलांतरित पक्षी यांच्यामध्ये कुठेही असाधारण मृतकांची नाही. पक्ष्यांमध्ये असाधारण मृतक दिसून आल्यास नजीकच्या पशुवैद्याकीय दवाखाना, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी संपर्क करावा. असे आवाहन सभापती माधव चंदनखेडे, सत्यजित बढे, प्रवीण तिखे यांनी केले आहे.

असा होतो संसर्ग...

जागतिक आरोग्य संघटनेनुसार बर्ड फ्लू हा कुक्कुट पक्षांना विषाणुमुळे होणारा रोग असून संसर्गजन्य रोग आहे. यात सर्वात संसर्गजन्य स्ट्रेन एच ५ एन १ आहे. एव्हिएन इन्फल्युएन्झा या विषाणुचे अ,ब,क असे तीन प्रकार आहे. अ विषाणू हा कुक्कुटपक्षी, अन्य पक्षी, प्राणी तसेच मानवांमध्ये आढळत असून, विषाणू बी व सी फक्त मानवांमध्ये आढळतो. या विषाणुद्वारे रोग उद्भवण्याचा कालावधी २४ तास ते १४ दिवसांचा आहे. या विषाणूचा प्रसार एका कुक्कुट पक्षातून दुसऱ्या कुक्कुट पक्षांमध्ये मुख्यत: हवेतून व स्थलांतरित पक्षी, वन्यपक्ष्यांच्या माध्यमातून होतो.

 

रोगाची लक्षणे

- उदासीनता.

- भूक मंदावणे.

- अंडी उत्पादन कमी होणे.

-शिंकणे व खाेकणे.

- डोळ्यांतून पाणी येणे.

- डोक्यावर सूज येणे.

- डोक्यावरील तुऱ्यावर फोड येणे.

- पंख नसलेला भाग निळसर पडणे.

अशी घ्यावी काळजी...

प्रादुर्भाव टाळण्यासाठी पोल्ट्री फार्मला इतर राज्यांतून, जिल्ह्यातून येणाऱ्या वाहनांचे निर्जंतुकीकरण व पक्षिगृहांना बाहेरून निर्जंतुकीकरणासाठी २ टक्के सोडिअम हायड्रोक्साइड किंवा २ ते ४ टक्के सोडिअम हायपोक्लोराइटचा वापर करावा.

मृत पक्ष्यांना हात लावू नये किंवा शवविच्छेदन करू नये, परस्पर विल्हेवाट लावू नये.

टॅग्स :Bird Fluबर्ड फ्लू