शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

भारतमातेचा जयघोष करीत २२० मजूर स्वगावी रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2020 05:00 IST

२२० मजुरांना नागपूरपर्यंत बसने पाठविण्यात आले. तेथून हे मजूर विशेष रेल्वे गाडीने लखनऊपर्यंतचा प्रवास पूर्ण करणार आहेत. सदर मजुरांना एकूण आठ बसच्या सहाय्याने नागपूरपर्यंत नेण्यात आले. प्रत्येक बसमध्ये एका माजी सैनिकाची नियुक्ती करण्यात आली होती. शिवाय जातेवेळी या मजुरांना शिदोरी म्हणून सोबत जेवनाचा डब्बा, मास्क, सॅनिटायजर, लिंबू, साखर, पाणी तसेच ओआरएसचे पाकिट देण्यात आले होते.

ठळक मुद्देनिरोप घेतेवेळी व्यक्त केली कृतज्ञता : विशेष रेल्वेगाडीने गाठणार लखनऊ

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. याच लॉकडाऊनमुळे वर्धा जिल्ह्यात राज्यातील इतर जिल्ह्यांसह देशातील विविध राज्यातील एकूण ८ हजार ६७ मजूर अडकले. याच मजुरांपैकी २२० मजूर रविवारी भारत मातेचा जयघोष करीत त्यांच्या मुळ गावी जाण्यासाठी रवाना झाले. मूळ गावी जात असलेल्या या मजुरांनी निरोप घेताना वर्धा जिल्हा प्रशासनासह त्यांना वेळोवेळी सहकार्य करणाऱ्या सर्वच सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींप्रती कृतज्ञता व्यक्त केली.लॉकडाऊनमुळे वर्धा जिल्ह्यात अडकेल्या मजुरांपैकी लखनऊच्या दिशेने कोण जाण्यास इच्छुक असल्याची माहिती सुरूवातीला वर्धा जिल्हा प्रशासनाने गोळा केली. त्यानंतर या २२० मजुरांना नागपूरपर्यंत बसने पाठविण्यात आले. तेथून हे मजूर विशेष रेल्वे गाडीने लखनऊपर्यंतचा प्रवास पूर्ण करणार आहेत. सदर मजुरांना एकूण आठ बसच्या सहाय्याने नागपूरपर्यंत नेण्यात आले. प्रत्येक बसमध्ये एका माजी सैनिकाची नियुक्ती करण्यात आली होती. शिवाय जातेवेळी या मजुरांना शिदोरी म्हणून सोबत जेवनाचा डब्बा, मास्क, सॅनिटायजर, लिंबू, साखर, पाणी तसेच ओआरएसचे पाकिट देण्यात आले होते.मजुरांना मुळ गावी रवाना करताना जिल्हाधिकारी विवेक भिमनवार, जि.प.चे मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. सचिन ओंम्बासे, पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, उपविभागीय महसूल अधिकारी सुरेश बगळे, तहसीलदार प्रिती डुडुलकर, शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक योगेश पारधी, वैद्यकीय जनजागृती मंचचे डॉ. सचिन पावडे, जय महाकाली शिक्षण संस्थेचे सचिन अग्निहोत्री, विजय कोंबे, जय हिंद फाऊंडेशनचे बिपीन मोघे आदींची उपस्थिती होती. विशेष म्हणजे नागपूरकडे जाण्यासाठी बस सुरू होताच स्वगावी जाणाºया मजुरांनी भारत माता की जय... यासह राष्ट्रपिता महात्मा गांधी के कर्मभूमी की जय, जय वर्धा असा जयघोष केला. मजुरांकडून होणाºया जयघोषामुळे जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांच्यासह जिल्हा प्रशासनासह तालुका प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी भावुक झाले होते.अधीक्षकांनी पटवून दिले सोशल डिस्टन्सिंगचे महत्त्ववर्धा येथून बसचा प्रवास करून नागपूर आणि नागपूर येथून विशेष प्रवासी रेल्वे गाडीने लखनऊ येथे रवाना झालेल्या मजुरांशी पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनीही संवाद साधला. या संवादादरम्यान त्यांनी स्वगावी जात असलेल्या मजुरांना कोरोनाला हरविण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग हे कसे प्रभावी शस्त्र आहे हे सोप्या शब्दात पटवून दिले.सामाजिक संघटनांनी दिला पॉकेटमनीवर्धा जिल्ह्यात अडकलेल्या २२० मजुरांना रविवारी त्यांच्या मुळ गावी रवाना करण्यात आले. या निरोपादरम्यान काही सामाजिक संघटनांनी सामाजिक बांधिलकी जोपासत गरजू मजुरांना पॉकेटमनी देऊन त्यांच्या मंगलमय प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. एकूणच या उपक्रमामुळे ‘अतिथी देवो भव’चा उद्देशच सामाजिक संघटनांनी जोपासला.जिल्हाधिकाऱ्यांनी साधला संवादमजुरांना त्यांच्या स्वगावी रवाना करण्यापूर्वी जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी मजुरांशी संवाद साधला. मजुरांनी त्यांच्या मुळ गावी गेल्यावर तसेच प्रवासादरम्यान काय दक्षता घ्यावी याची माहिती यावेळी त्यांनी मजुरांना दिली. शिवाय कोरोनावर विजय मिळाल्यावर पुन्हा एकदा वर्धा जिल्ह्यात या असे आवाहन करीत मजुरांचे मनोधैर्य वाढविले.तीन संस्थांनी केली बसची व्यवस्थारविवारी २२० मजुरांना लखनऊच्या दिशेने त्यांच्या मुळ गावी रवाना करण्यात आले. हे मजूर नागपूर येथून सुटणाºया विशेष प्रवासी रेल्वे गाडीने नागपूर ते लखनऊ असा प्रवास करणार असले तरी वर्धा ते नागपूरपर्यंतच्या प्रवासासाठी उत्तम गलवा कंपनी, जय महाकाली शिक्षण संस्था व स्कूल आॅफ स्कॉलरच्यावतीने नि:शुल्क बसेसचा पुरवठा करण्यात आला होता.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या