शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

भारतमातेचा जयघोष करीत २२० मजूर स्वगावी रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2020 05:00 IST

२२० मजुरांना नागपूरपर्यंत बसने पाठविण्यात आले. तेथून हे मजूर विशेष रेल्वे गाडीने लखनऊपर्यंतचा प्रवास पूर्ण करणार आहेत. सदर मजुरांना एकूण आठ बसच्या सहाय्याने नागपूरपर्यंत नेण्यात आले. प्रत्येक बसमध्ये एका माजी सैनिकाची नियुक्ती करण्यात आली होती. शिवाय जातेवेळी या मजुरांना शिदोरी म्हणून सोबत जेवनाचा डब्बा, मास्क, सॅनिटायजर, लिंबू, साखर, पाणी तसेच ओआरएसचे पाकिट देण्यात आले होते.

ठळक मुद्देनिरोप घेतेवेळी व्यक्त केली कृतज्ञता : विशेष रेल्वेगाडीने गाठणार लखनऊ

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. याच लॉकडाऊनमुळे वर्धा जिल्ह्यात राज्यातील इतर जिल्ह्यांसह देशातील विविध राज्यातील एकूण ८ हजार ६७ मजूर अडकले. याच मजुरांपैकी २२० मजूर रविवारी भारत मातेचा जयघोष करीत त्यांच्या मुळ गावी जाण्यासाठी रवाना झाले. मूळ गावी जात असलेल्या या मजुरांनी निरोप घेताना वर्धा जिल्हा प्रशासनासह त्यांना वेळोवेळी सहकार्य करणाऱ्या सर्वच सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींप्रती कृतज्ञता व्यक्त केली.लॉकडाऊनमुळे वर्धा जिल्ह्यात अडकेल्या मजुरांपैकी लखनऊच्या दिशेने कोण जाण्यास इच्छुक असल्याची माहिती सुरूवातीला वर्धा जिल्हा प्रशासनाने गोळा केली. त्यानंतर या २२० मजुरांना नागपूरपर्यंत बसने पाठविण्यात आले. तेथून हे मजूर विशेष रेल्वे गाडीने लखनऊपर्यंतचा प्रवास पूर्ण करणार आहेत. सदर मजुरांना एकूण आठ बसच्या सहाय्याने नागपूरपर्यंत नेण्यात आले. प्रत्येक बसमध्ये एका माजी सैनिकाची नियुक्ती करण्यात आली होती. शिवाय जातेवेळी या मजुरांना शिदोरी म्हणून सोबत जेवनाचा डब्बा, मास्क, सॅनिटायजर, लिंबू, साखर, पाणी तसेच ओआरएसचे पाकिट देण्यात आले होते.मजुरांना मुळ गावी रवाना करताना जिल्हाधिकारी विवेक भिमनवार, जि.प.चे मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. सचिन ओंम्बासे, पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, उपविभागीय महसूल अधिकारी सुरेश बगळे, तहसीलदार प्रिती डुडुलकर, शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक योगेश पारधी, वैद्यकीय जनजागृती मंचचे डॉ. सचिन पावडे, जय महाकाली शिक्षण संस्थेचे सचिन अग्निहोत्री, विजय कोंबे, जय हिंद फाऊंडेशनचे बिपीन मोघे आदींची उपस्थिती होती. विशेष म्हणजे नागपूरकडे जाण्यासाठी बस सुरू होताच स्वगावी जाणाºया मजुरांनी भारत माता की जय... यासह राष्ट्रपिता महात्मा गांधी के कर्मभूमी की जय, जय वर्धा असा जयघोष केला. मजुरांकडून होणाºया जयघोषामुळे जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांच्यासह जिल्हा प्रशासनासह तालुका प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी भावुक झाले होते.अधीक्षकांनी पटवून दिले सोशल डिस्टन्सिंगचे महत्त्ववर्धा येथून बसचा प्रवास करून नागपूर आणि नागपूर येथून विशेष प्रवासी रेल्वे गाडीने लखनऊ येथे रवाना झालेल्या मजुरांशी पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनीही संवाद साधला. या संवादादरम्यान त्यांनी स्वगावी जात असलेल्या मजुरांना कोरोनाला हरविण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग हे कसे प्रभावी शस्त्र आहे हे सोप्या शब्दात पटवून दिले.सामाजिक संघटनांनी दिला पॉकेटमनीवर्धा जिल्ह्यात अडकलेल्या २२० मजुरांना रविवारी त्यांच्या मुळ गावी रवाना करण्यात आले. या निरोपादरम्यान काही सामाजिक संघटनांनी सामाजिक बांधिलकी जोपासत गरजू मजुरांना पॉकेटमनी देऊन त्यांच्या मंगलमय प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. एकूणच या उपक्रमामुळे ‘अतिथी देवो भव’चा उद्देशच सामाजिक संघटनांनी जोपासला.जिल्हाधिकाऱ्यांनी साधला संवादमजुरांना त्यांच्या स्वगावी रवाना करण्यापूर्वी जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी मजुरांशी संवाद साधला. मजुरांनी त्यांच्या मुळ गावी गेल्यावर तसेच प्रवासादरम्यान काय दक्षता घ्यावी याची माहिती यावेळी त्यांनी मजुरांना दिली. शिवाय कोरोनावर विजय मिळाल्यावर पुन्हा एकदा वर्धा जिल्ह्यात या असे आवाहन करीत मजुरांचे मनोधैर्य वाढविले.तीन संस्थांनी केली बसची व्यवस्थारविवारी २२० मजुरांना लखनऊच्या दिशेने त्यांच्या मुळ गावी रवाना करण्यात आले. हे मजूर नागपूर येथून सुटणाºया विशेष प्रवासी रेल्वे गाडीने नागपूर ते लखनऊ असा प्रवास करणार असले तरी वर्धा ते नागपूरपर्यंतच्या प्रवासासाठी उत्तम गलवा कंपनी, जय महाकाली शिक्षण संस्था व स्कूल आॅफ स्कॉलरच्यावतीने नि:शुल्क बसेसचा पुरवठा करण्यात आला होता.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या