शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

२१ जलाशये फुल्ल...

By admin | Updated: September 28, 2015 02:22 IST

जिल्ह्यात यंदा कमी कालावधीत दमदार पाऊस झाला. त्यामुळे कोरडवाहू शेतीला याचा तितकासा फायदा झाला नसला तरी जिल्ह्यातील जलाशयाची पातळी वाढविण्यासाठी तो पुरक ठरला.

११ ओव्हरफ्लो : पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटलावर्धा : जिल्ह्यात यंदा कमी कालावधीत दमदार पाऊस झाला. त्यामुळे कोरडवाहू शेतीला याचा तितकासा फायदा झाला नसला तरी जिल्ह्यातील जलाशयाची पातळी वाढविण्यासाठी तो पुरक ठरला. जिल्ह्यातील मध्यम व मोठे दहा तर लघु अकरा अशी एकूण २१ जलाशये शंभर टक्के भरली आहेत तर ११ जलाशये ओव्हर फ्लो झाल्याने सांडव्यावरून पाणी वाहत आहे. त्यामुळे यंदाच्या दमदार पावसाने जलाशयाची पातळी वाढून उन्हाळ्यातील जलसंकट टळल्याचे बोलल्या जात आहे. जिल्ह्यामध्ये एकूण १५ मोठे व मध्यम जलायश आहेत. त्यामध्ये सर्व मिळून १५७४.४८० दलघमी. जलसाठ्याची क्षमता आहे. आतापर्यंत १२१४.८९ दलघमी जलसाठा उपलब्ध झाला आहे. मागील वर्षी २३ सप्टेंबरपर्यंत १२५३.५२ दलघमी जलसाठा होता. जिल्ह्यात एकूण २० लघू प्रकल्प असून त्यांची साठवणूक क्षमता ३३.२९६ दलघमी इतकी आहे. यामध्ये सध्या २९.२३ दलघमी इतका जलसाठा उपलब्ध आहे. १५ मोठ्या व मध्य जलाशयापैकी धाम प्रकल्प, पोथरा जलाशय, पंचधारा प्रकल्प, डोगरगाव प्रकल्प, मदन प्रकल्प, मदन उन्नई धरण, नांद प्रकल्प, उर्ध्व वर्धा प्रकल्प, वर्धा कार नदी प्रकल्प, सुकळी लघू प्रकल्प हे शंभर टक्के भरले आहे. पंचधारा व नांद प्रकल्प वगळता उर्वरित नऊ प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर लहादेवी, अंबाझरी, पांझरा बोथली, उमरी, आंजी बोरखेडी, दहेगाव गोंडी, रोठा-२, आष्टी, कन्नमवारग्राम, मलकापूर, हराशी हे अकरा लघु प्रकल्पही शंभर टक्के भरले आहेत. यातील हराशी या एकाच लघु प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सहा लघु जलाशय हे ७५ टक्के भरलेले आहे. सध्या जिल्ह्यातील बहुतांश जलाशय फुल्ल झाल्याने यावर्षी पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचाही प्रश्न मिटणार असल्याचे दिसून येत आहे.(शहर प्रतिनिधी)निम्न वर्धाचा जलसाठा सर्वात कमीजिल्ह्यातील पंधरा मोठे व मध्यम प्रकल्पामध्ये आर्वी तालुक्यातील निम्न वर्धा प्रकल्पाचाही समावेश आहे. या १५ जलाशयापैकी दहा जलाशय शंभर टक्के तर तीन जलाशय ८० टक्क्याच्या वर भरलेले असताना निम्न वर्धा प्रकल्पात आतापर्यंत केवळ १७.५८ टक्केच जलसाठा असल्याचे नमुद करण्यात आले आहे. या जलाशयाची क्षमता २५३.२४० दलघमी असून आतापर्यंत ३८.१३० दलघमी जलसाठा उपयुक्त आहे.