शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

लाखावर लोकसंख्या सुरक्षेसाठी २० पोलीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2020 05:00 IST

जनतेच्या सुरक्षिततेसाठी आणि गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वातंत्र्यपूर्व काळापासून शहरात एकमेव पोलीस ठाणे आहे. ठाण्यात एक पोलीस निरीक्षक, एक सहायक पोलीस निरीक्षक, दोन पोलीस उपनिरीक्षक, एक सहायक फौजदार, दहा हवालदार, नऊ नायक पोलीस आणि १५ शिपाई, याप्रमाणे अधिकारी सोडून केवळ ३५ पोलीस कर्मचारी आहेत.

ठळक मुद्देकारंजा तालुक्यातील वास्तव : गुन्हेगारीचा आलेख वाढताच

अरुण फाळके।लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा (घा.) : लाखावर लोकसंख्या असलेल्या या तालुक्याकरिता पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा ३५ जणांचा अपुरा फौजफाटा आहे. यातील प्रत्यक्ष २० पोलीस कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर जनतेची सुरक्षा आणि गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी आहे. त्यामुळे पुरेसा पोलीस कर्मचारी द्यावा, अशी मागणी तालुक्यातील नागरिकांनी केली आहे.जनतेच्या सुरक्षिततेसाठी आणि गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वातंत्र्यपूर्व काळापासून शहरात एकमेव पोलीस ठाणे आहे. ठाण्यात एक पोलीस निरीक्षक, एक सहायक पोलीस निरीक्षक, दोन पोलीस उपनिरीक्षक, एक सहायक फौजदार, दहा हवालदार, नऊ नायक पोलीस आणि १५ शिपाई, याप्रमाणे अधिकारी सोडून केवळ ३५ पोलीस कर्मचारी आहेत. यापैकी न्यायालयीन कामासाठी ३, दारू प्रकरणे, अपघातांच्या घटनांमधील, अहवाल नागपूरवरून आणणे आणि नोटीस तामील करणे, महत्त्वाच्या व्यक्तींची सुरक्षा व्यवस्था करणे या कामासाठी दररोज १५ पोलीस कर्मचारी लागतात, म्हणजेच जनतेच्या सुरक्षिततेसाठी व गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी केवळ २० पोलीस कर्मचारी. त्यातील काही व्यक्तीगत सुटीवर जातात. महिला पोलिसांची प्रसूती रजा टाळताच येत नाही. या सर्व बाबींचा विचार केल्यास कारंजा पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी संख्या अत्यंत तोकडी पडत आहे. हा कर्मचारीवर्ग कारंजा तालुक्यातील गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यास असमर्थ ठरत आहे. पोलीस ठाण्यातील कर्मचारी संख्या, व अधिकारी संख्या वाढवून देण्यात यावी, अशी मागणी शासनाकडे तालुकावासींनी केली आहे.बांगडापूर, सारवाडीत हवी चौकीबांगडापूर किंवा कन्नमवारग्रामसह सारवाडी या अतिदुर्गम व जंगलव्याप्त आणि आदिवासीबहुल परिसरात कायमस्वरूपी पोलीस चौकी देण्यात यावी, ही सर्व गावे कारंजा पोलीस ठाण्यापासून ४० ते ५० किलोमीटर अंतरावर आहेत.या परिसरातून जाणाऱ्या वर्धा रस्त्यावर अनेक अपघात घडतात. लुटमारीच्या घटना घडलेल्या आहेत. घनदाट जंगल असल्यामुळे अवैध व्यवसायाला वाव आहे. त्यावरसुद्धा नियंत्रण ठेवता येईल.१०२ गावे, ४९ ग्रामपंचायतीतालुक्यात १०२ गावे ४९ ग्रामपंचायती, एक नगरपंचायत असून एक लाखाहून अधिक लोकसंख्या आहे. तालुक्यातील दोन टोकाच्या गावांमधील अंतर ८० किलोमीटरपेक्षा अधिक आहे.तालुक्याच्या मध्यभागातून महामार्ग क्रमांक ६ जात असून जंगलव्याप्त परिसर असल्यामुळे अपघात आणि गुन्हेगारीचे प्रमाणही लक्षणीय आहे. तुलनात्मक दृष्ट्या आर्वी, आष्टी तालुक्यापेक्षा या तालुक्यात गुन्ह्यांचे प्रमाणही अधिक आहे.

टॅग्स :Policeपोलिस