शहरं
Join us  
Trending Stories
1
'वक्फ बोर्डाच्या जमिनी मूळ मालकांना परत मिळाव्या'; चंद्रशेखर बावनकुळे यांची मागणी
2
डीपफेक व्हिडीओवर बसणार आळा, मोदी सरकार आणणार डिजिटल इंडिया विधेयक; यूट्यूबवरही नियंत्रण येणार
3
अलकनंदामध्ये मिनी बस ६६० फूट खाली कोसळली; रुद्रप्रयाग दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू, चौकशीचे आदेश
4
भारत-कॅनडा सामन्याचा निकाल लागला! जाणून घ्या टीम इंडियाचं Super 8 वेळापत्रक
5
संरक्षक भिंत तोडून सिमेंट मिक्सर कोसळला सात जण जखमी
6
पाकिस्तानला धुणारा पाऊस गतविजेत्या इंग्लंडची नौका बुडवणार? अँटिग्वावरील लाईव्ह दृश्य
7
मणिपूरमध्ये सचिवालयजवळच्या इमारतीला भीषण आग; जवळच मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान
8
“लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला सर्वाधिक बळ महाराष्ट्राने दिले”; जयंत पाटील स्पष्टच बोलले
9
Raju Shetty : 'महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माझी फसवणूक केली'; राजू शेट्टींचा गंभीर आरोप
10
सरकारकडून अद्यापपर्यंत उपोषणाची दखल का नाही : लक्ष्मण हाके
11
“इटलीत थाट मणिपूरकडे मात्र पाठ, हीच का मोदींची गॅरंटी?”; NCP शरद पवार गटाचा सवाल
12
विराट कोहली कोणत्या गोष्टीवरून चिडलेला दिसला? IND vs CAN सामन्याबाबत महत्त्वाचे अपडेट्स
13
“मी म्हणालो होतो, आम्हाला भाजपामुक्त राम हवा, अयोध्यावासीयांनी करुन दाखवले”: उद्धव ठाकरे
14
इंटरनेटवर पाहून केलेलं डाएटिंग ठरू शकतं जीवघेणं; तुम्हीही करताय का 'ही' चूक?
15
शुबमन गिलने खरंच इंस्टाग्रामवर रोहितला अनफॉलो केले का? राखीव खेळाडूवर शिस्तभंगाची कारवाई?
16
'मविआ'मध्ये छोटा, मोठा भाऊ कुणीही नाही, लवकरच जागावाटप करणार'; पृथ्वीराज चव्हाणांनी चर्चांना दिला पूर्णविराम
17
"आता यांच्यामध्ये बसून..."; भाजपसोबत जाण्यावर उद्धव ठाकरेंचं शरद पवारांसमोर सूचक विधान
18
विधानसभेला तरी प्रकाश आंबेडकरांना सोबत घेणार का? उद्धव ठाकरेंचे एका वाक्यात उत्तर, म्हणाले...
19
“लोकसभेत आमचा स्ट्राइक रेट चांगला, महायुतीत आम्हीच मोठा भाऊ”; शिंदे गटातील नेत्यांचे विधान
20
"विजयाचं श्रेय जसं मला मिळतं, तसंच पराभवाचं कारणही मीच, कार्यकर्त्यांची माफी मागतो"

खड्ड्यांवर २० लाखांचा मुलामा

By admin | Published: July 06, 2017 12:59 AM

शासनाने ई-टेंडरिंगच्या माध्यमातून गैरप्रकार संपविण्याचे प्रयत्न चालविले आहेत; पण याला शासकीय यंत्रणाच बगल देत आहे.

जि.प. तील प्रकार : ४० कामांचे झाले अंदाजपत्रक प्रशांत हेलोंडे। लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : शासनाने ई-टेंडरिंगच्या माध्यमातून गैरप्रकार संपविण्याचे प्रयत्न चालविले आहेत; पण याला शासकीय यंत्रणाच बगल देत आहे. २०१३ पासून रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी ५० हजार रुपयांची कामे देण्याचे प्रकार बंद केले. असे असताना जिल्हा परिषदेकडून ४० कामे काढून २० लाख रुपयांचे इस्टीमेट तयार केले आहे. शासन नवनवीन आदेश काढत असताना जि.प. बांधकाम विभाग जुन्या आदेशावर रेघोट्या ओढत आहे. आता ३०:५४/२४:१९ या हेडखाली वाहतूक योग्य रस्ते दुरूस्ती अभियान अंतर्गत ५० हजारांत एका रोडवर गिट्टी व मुरूम टाकून खड्डे बुजविण्याची आठही तालुक्यांसाठी ४० कामे मंजूर करण्यात आलीत. यात २० लाख रुपयांची उधळपट्टी करण्यात येणार आहे. याबाबत माजी जि.प. सदस्य गजानन गावंडे यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे तक्रार केली आहे. ५० हजारांत खड्डे बुजविण्याचा कार्यक्रम शासनाने २०१३ पासून बंद केला आहे. राज्यभरात बांधकाम विभागाचा एकच आदेश असताना जि.प. बांधकाम विभाग वेगळा आहे काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. २०१६-१७ या वर्षात खड्डे बुजविण्याचा कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. ही सर्व कामे आता सुरू आहेत. महागाई वाढल्याने ५० हजारांत काहीच कामे होत नाही. मग, रस्त्यावर खडी व मुरूम टाकून कोणते खड्डे बुजविले जात आहे, याचा शोध घेणे गरजेचे आहे. या ४० अंदाजपत्रकांत सर्वाधिक कामे आर्वी उपविभागाला देण्यात आली असून उपविभागीय अभियंत्याने मर्जीतील कंत्राटदरांना कामाचे वाटप केल्याची माहिती आहे. जि.प. बांधकाम विभागातील या ४० अंदाजपत्रकांची चांगलीच चर्चा सुरू आहे. रोहणा नजीक एका रस्त्यावर ५० हजार खर्च करण्यात आले. सदर कंत्राटदाराने दोन ट्रॅक्टर खडी व मुरूम टाकला. या अंदाजपत्रकांची चौकशी करीत कारवाई करणे गरजेचे झाले आहे.