शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

वर्धा जिल्ह्यातील २ हजार ९५६ शिक्षकांच्या होणार तीन टप्प्यांत कोविड टेस्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 14:28 IST

Wardha News शालेय शिक्षण विभागाने आता २७ जानेवारी, २०२१ पासन पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतल्याने जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागातील यंत्रणेने नियोजनास सुरुवात केली असून, गतीने कामे होत आहे.

ठळक मुद्दे२७ जानेवारीपासून होणार पाचवी ते आठवीच्या शाळा सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क 

वर्धा : आठ ते नऊ महिने सर्वत्र कोरोनाने केलेल्या दमछाकीनंतर शासनाच्या आदेशानुसार २३ नोव्हेंबर, २०२० पासून नववी ते बारावीचे नियमित वर्ग सुरू झाले. त्याच पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाने आता २७ जानेवारी, २०२१ पासन पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतल्याने जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागातील यंत्रणेने नियोजनास सुरुवात केली असून, गतीने कामे होत आहे.

नववी ते बारावीचे प्रत्यक्षात अध्यापन सुरू झाले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळांमध्ये विद्यार्थी संख्या जरी कमी असली, तरी शाळा कोरोनाचे सर्व नियमांचे पालन करून नियमित सुरू झालेली आहे. शाळा सुरू होण्यापूर्वी काळजी म्हणून सर्व वर्गखोल्या, शाळेच्या परिसरात जंतुनाशक फवारणीही करून घेण्यात आली होती.

त्याच पार्श्वभूमीवर नववी ते बारावी वर्गात शिकविणाऱ्या सर्व शिक्षकांची त्या-त्या तालुकास्तरावर आरोग्य विभागामार्फत कोरोना तपासणी करण्यात आली होती. विद्यार्थ्यांना शाळेत पाठवायचे की नाही, यासाठी पालकांकडून संमतीपत्र भरून घेण्यात आले होते, तसेच संस्थेची परवानगी शाळा सुरू करण्यासाठी घेण्यात आली होती. हीच सर्व प्रक्रिया आता पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्यासाठी शिक्षण विभाग राबविणार असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे.

जिल्ह्यातील विद्यार्थी संख्या ७४ हजार ३०१

जिल्हातील शिक्षकांची संख्या २ हजार ९५६

तीन टप्प्यांत शिक्षकांची कोरोना ‘टेस्ट’

पाचवी ते आठव्या वर्गाला शिकविणारे खासगी आणि जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांची तीन टप्प्यांत कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यांत ३३ टक्के, दुसऱ्या टप्प्यांत ३३ टक्के आणि तिसऱ्या टप्प्यांत ३३ टक्के शिक्षकांची टेस्ट करण्यात येईल. ही चाचणी ८ तालुक्यांतील प्राथमिक आरोग्य केंद्र, तालुका रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालयात करण्यात येईल. याबाबत जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी प्राथमिक आणि आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची सभा तातडीने होणार आहे. त्यानंतर, निर्णय घेऊन २७ तारखेपर्यंत पाचवी ते आठवी वर्गाला शिकविणाऱ्या सर्व शिक्षकांच्या कोरोना चाचणी संदर्भात नियोजन करण्यात येणार आहे.

पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्याचे शासनाचे आणि शिक्षण विभागाचे आदेश आहे. त्यामुळे सर्वोतोपरी काळजी घेतली जाणार आहे. एकाच शाळेत एकाच दिवशी सर्व शिक्षकांची तपासणी होणार नाही. शाळेतील ३३ टक्के शिक्षकच कोरोना तपासणीला पाठवायचे आहेत. विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्याबाबत पालकांचे संमतीपत्र त्यांना घ्यावे लागणार आहे. आरोग्य विभाग आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची सभा झाल्यावर गटशिक्षणाधिकाऱ्यांना तशा सूचना दिल्या जाणार आहे. तालुकास्तरावर खासगी, जि.प.च्या शाळा आणि शिक्षकांना निर्देश देऊन कोविड टेस्ट करण्याचे नियोजन करतील.

लिंबाजी सोनवणे

शिक्षणाधिकारी, (प्रा.) जि.प.वर्धा.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस