शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
5
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
6
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
7
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
8
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
9
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
10
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
11
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
12
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
13
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
14
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
15
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
16
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
17
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
18
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
19
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट

कापड उद्योगाचा धागा उसवला; औद्योगिक नगरीमध्ये नव्या उद्योगांची प्रतीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2022 12:03 IST

हिंगणघाटमध्ये रोजगारावर टाच

भास्कर कलोडे

हिंगणघाट (वर्धा) : देशात स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे होत असताना जिल्ह्यातील हिंगणघाट या औद्योगिक नगरीमध्ये आधुनिकतेचा आणि नवतंत्रज्ञानाचा अभाव दिसून येत आहे. शहरातील १२ हजार कामगारांना रोजगार देणारे इंग्रजकालीन दोन कापड मिल नियोजनशून्यतेमुळे आणि नव तंत्रज्ञानाअभावी बंद पडले आहेत. त्यामुळे कधीकाळी रोजगार देण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या शहरात बेरोजगारी वाढताना दिसत आहे.

इंग्रजकालीन सीपी अॅण्ड बेरार म्हणजे हल्लीच्या मध्यप्रदेशची राजधानी नागपूर असताना कृषी मालावर आधारित अनेक प्रकिया उद्योगांमुळे नागपूरनंतर हिंगणघाट औद्योगिक शहर म्हणून प्रसिद्ध होते. १८८१ मध्ये ३ लाख ५० हजारांची गुंतवणूक करून रायबहादूर बन्सीलाल अबिरचंद डागा यांनी सुरू केलेला आरबीबीए कापड मिल १९६३ मध्ये बंद पडला. तर १९०० मध्ये रायसाहेब रेखचंद मोहता यांनी १८ लाखांची गुंतवणूक करून उभारलेला आरएसआर मोहता कापड उद्योग २०२० मध्ये बंद पडला. शासनाच्या लोकाभिमुख योजनेची योग्य अंमलबजावणी न करणे आणि राजकीय इच्छाशक्तीचा असलेला अभाव, यामुळे जवळपास १२ हजार कामगारांना रोजगार देणारे हे दोन्ही कापड मिल तसेच अनेक जिनिंग प्रेसिंग युनिट बंद पडले आहेत.

शहर व परिसरात रस्ते, रेल्वे व वीज उपलब्ध आहे. शहरालगतच्या परिसरातून ४ मोठ्या नद्या वाहतात. तरीही या ठिकाणी मोठ्या उद्योगांचा अभाव असल्याने बेरोजगारी वाढत आहे. सिंचनाचा अभाव असून नागरिकांना एक दिवसाआड पाणी मिळते. शिक्षणाच्या बाबतीत हिंगणघाट उपविभाग मागासलेला आहे. विज्ञान व तंत्रज्ञान काळाची गरज असताना अभियांत्रिकी, वैद्यकीय, फार्मसी किंवा तांत्रिक अभ्यासक्रम देणारे महाविद्यालय या परिसरात नाही. क्रीडा क्षेत्रातही तालुक्याने मैदान गाजविणारे खेळाडू दिलेत. मात्र तालुक्याला हक्काचे शासकीय क्रीडांगण मिळाले नाही.

औद्योगिक शहराला गतवैभव प्राप्त करून द्या!

राष्ट्रीय महामार्गालगत हे शहर असून आरोग्य सेवाही तोकडी आहे. आरोग्य विभागाने या तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालयात पुरेसा प्रशिक्षित कर्मचारी वर्ग व वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज आहे. उपजिल्हा रुग्णालयाला श्रेणीवर्धित करून जिल्हा रुग्णालयाचा दर्जा देण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असली तरी अद्याप पूर्णत्वास आली नाही. मेट्रोचा विस्तार नागपूर लगतच्या जिल्ह्यात प्रस्तावित असला तरी हिंगणघाट-चंद्रपूर मार्गाकडे दुर्लक्ष आहे. या शहराला औद्योगिक गतवैभव प्राप्त करून देण्याची मागणी जोर धरत आहे.

एकमेव साखर कारखान्यालाही टाळे

तालुक्यातील रेल्वेमार्गाची लांबी १४ किलोमीटर असून ४० किलोमीटरचा राष्ट्रीय महामार्ग तालुक्यातून जातो. तालुक्यात कापूस, सोयाबीन, गहू, तूर आणि ऊस आदी पारंपरिक पिके प्रामुख्याने घेतली जातात. एकेकाळी येथील हळद फार प्रसिद्ध होती, परिसरातील भौगोलिक परिस्थिती उद्योगांसाठी सकारात्मक असली तरी शेतमालावर प्रकिया उद्योगाची वानवा आहे. उपविभागातील एकमेव सहकारी साखर कारखाना अवघ्या काही वर्षातच ऊसाअभावी बंद पडला. तालुक्यात चार नद्या असूनही सिंचनाचा अनुशेष वाढतच चालला आहे.

टॅग्स :businessव्यवसायHinganghatहिंगणघाटwardha-acवर्धा