शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

Namo Shetkari Yojana: शेतकरी सन्मान निधी योजनेचा १९ वा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 18:07 IST

Namo Shetkari Yojana: मिळाले २६ कोटी : २७७२ शेतकऱ्यांची केवायसी पेंडिंग

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा १९ वा हप्ता फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा झाला. वर्धा जिल्ह्यातील १ लाख ३४ हजार ७३५ शेतकऱ्यांना दोन हजार रुपयांचा हप्ता मिळाला आहे. यामुळे शेतकऱ्यांना शेतीपूरक साहित्य खरेदी करण्यासाठी हातभार लागला आहे.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकूण २६ कोटी ९४ लाख ७० हजार रुपये मिळाले आहे. शेतकऱ्यांना मिळणारे उत्पन्न अनिश्चित असते. यामुळे शेतकऱ्यांना शेतीपूरक साहित्य खरेदी करण्यासाठी अडचणी येत असतात. 

बऱ्याच वेळा शेतकऱ्यांकडे पैसे नसल्यामुळे शेतातील किरकोळ खर्च करता येत नाही. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक हाल होत असतात. मात्र, पंतप्रधान शेतकरी सन्मान निधीमुळे शेतकऱ्यांना हातभार मिळाला आहे. सन्मान निधी पात्र शेतकऱ्यांच्या थेट खात्यात निधी जमा झाल्यामुळे त्यांना अडचणीत कोणापुढे हात पसरवण्याची गरज भासत नाही.

९८ टक्के शेतकऱ्यांची केवायसी झाली पूर्णयोजनेच्या लाभासाठी बँकेत खात्याला आधार, पॅनकार्ड संलग्न करणे आवश्यक आहे. जिल्ह्यात ९८ टक्के शेतकऱ्यांची केवायसी पूर्ण झाली आहे.

अनेक शेतकऱ्यांकडून केले पैसे वसूलपंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेसाठी आयकर भरणारे शेतकरी अपात्र ठरले आहेत. आयकर भरणाऱ्या या शेतकऱ्या कडून शासनाने सुरुवातीपासूनची रक्कम वसूल केली आहे.

जिल्ह्यात लाभार्थ्यांचा आकडा एक लाखांतपीएम किसान योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या जिल्ह्यात एक लाख ३७ हजार ५०७ एवढी आहे. दिवसागणीत यात वाढ होत आहे.

हजारांवर लाभार्थी घटलेपंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेच्या नियम व अटीमध्ये न बसणाऱ्या काही शेतकऱ्यांचे व काही शेतकऱ्यांचा अकाली मृत्यू झाल्याने योजनेचे अर्ज रद्द करण्यात आले आहेत. यामुळे योजनेतून हजारांवर लाभार्थी घटले आहेत. पात्र लाभार्थ्यांची संख्या कमी झाली आहे.

तालुकानिहाय पात्र लाभार्थी संख्यातालुका         १९ वा हप्ताआर्वी                १६,५४३आष्टी                १०,४७४देवळी              १७,७५५हिंगणघाट         २०,५६९कारंजा             १८,३४३समुद्रपूर           १९,३७७सेलू                 १५,३०१वर्धा                 १६,५९७

१९ वा हप्ता मिळालावर्धा जिल्ह्यामध्ये पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेसाठी १ लाख ३४ हजार ७३५ शेतकरी पात्र आहेत. मात्र, अनेक शेतकऱ्यांची केवायसीसह अन्य कागदपत्रांमध्ये त्रुटी आहेत. यामुळे काही शेतकरी लाभापासून वंचित आहेत. 

टॅग्स :wardha-acवर्धाfarmingशेतीFarmerशेतकरी