शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

Namo Shetkari Yojana: शेतकरी सन्मान निधी योजनेचा १९ वा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 18:07 IST

Namo Shetkari Yojana: मिळाले २६ कोटी : २७७२ शेतकऱ्यांची केवायसी पेंडिंग

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा १९ वा हप्ता फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा झाला. वर्धा जिल्ह्यातील १ लाख ३४ हजार ७३५ शेतकऱ्यांना दोन हजार रुपयांचा हप्ता मिळाला आहे. यामुळे शेतकऱ्यांना शेतीपूरक साहित्य खरेदी करण्यासाठी हातभार लागला आहे.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकूण २६ कोटी ९४ लाख ७० हजार रुपये मिळाले आहे. शेतकऱ्यांना मिळणारे उत्पन्न अनिश्चित असते. यामुळे शेतकऱ्यांना शेतीपूरक साहित्य खरेदी करण्यासाठी अडचणी येत असतात. 

बऱ्याच वेळा शेतकऱ्यांकडे पैसे नसल्यामुळे शेतातील किरकोळ खर्च करता येत नाही. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक हाल होत असतात. मात्र, पंतप्रधान शेतकरी सन्मान निधीमुळे शेतकऱ्यांना हातभार मिळाला आहे. सन्मान निधी पात्र शेतकऱ्यांच्या थेट खात्यात निधी जमा झाल्यामुळे त्यांना अडचणीत कोणापुढे हात पसरवण्याची गरज भासत नाही.

९८ टक्के शेतकऱ्यांची केवायसी झाली पूर्णयोजनेच्या लाभासाठी बँकेत खात्याला आधार, पॅनकार्ड संलग्न करणे आवश्यक आहे. जिल्ह्यात ९८ टक्के शेतकऱ्यांची केवायसी पूर्ण झाली आहे.

अनेक शेतकऱ्यांकडून केले पैसे वसूलपंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेसाठी आयकर भरणारे शेतकरी अपात्र ठरले आहेत. आयकर भरणाऱ्या या शेतकऱ्या कडून शासनाने सुरुवातीपासूनची रक्कम वसूल केली आहे.

जिल्ह्यात लाभार्थ्यांचा आकडा एक लाखांतपीएम किसान योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या जिल्ह्यात एक लाख ३७ हजार ५०७ एवढी आहे. दिवसागणीत यात वाढ होत आहे.

हजारांवर लाभार्थी घटलेपंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेच्या नियम व अटीमध्ये न बसणाऱ्या काही शेतकऱ्यांचे व काही शेतकऱ्यांचा अकाली मृत्यू झाल्याने योजनेचे अर्ज रद्द करण्यात आले आहेत. यामुळे योजनेतून हजारांवर लाभार्थी घटले आहेत. पात्र लाभार्थ्यांची संख्या कमी झाली आहे.

तालुकानिहाय पात्र लाभार्थी संख्यातालुका         १९ वा हप्ताआर्वी                १६,५४३आष्टी                १०,४७४देवळी              १७,७५५हिंगणघाट         २०,५६९कारंजा             १८,३४३समुद्रपूर           १९,३७७सेलू                 १५,३०१वर्धा                 १६,५९७

१९ वा हप्ता मिळालावर्धा जिल्ह्यामध्ये पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेसाठी १ लाख ३४ हजार ७३५ शेतकरी पात्र आहेत. मात्र, अनेक शेतकऱ्यांची केवायसीसह अन्य कागदपत्रांमध्ये त्रुटी आहेत. यामुळे काही शेतकरी लाभापासून वंचित आहेत. 

टॅग्स :wardha-acवर्धाfarmingशेतीFarmerशेतकरी