शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
5
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
6
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
7
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
8
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
9
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
10
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
11
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
12
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
13
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
14
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
15
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
16
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
17
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
18
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
19
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
20
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध

Namo Shetkari Yojana: शेतकरी सन्मान निधी योजनेचा १९ वा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 18:07 IST

Namo Shetkari Yojana: मिळाले २६ कोटी : २७७२ शेतकऱ्यांची केवायसी पेंडिंग

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा १९ वा हप्ता फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा झाला. वर्धा जिल्ह्यातील १ लाख ३४ हजार ७३५ शेतकऱ्यांना दोन हजार रुपयांचा हप्ता मिळाला आहे. यामुळे शेतकऱ्यांना शेतीपूरक साहित्य खरेदी करण्यासाठी हातभार लागला आहे.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकूण २६ कोटी ९४ लाख ७० हजार रुपये मिळाले आहे. शेतकऱ्यांना मिळणारे उत्पन्न अनिश्चित असते. यामुळे शेतकऱ्यांना शेतीपूरक साहित्य खरेदी करण्यासाठी अडचणी येत असतात. 

बऱ्याच वेळा शेतकऱ्यांकडे पैसे नसल्यामुळे शेतातील किरकोळ खर्च करता येत नाही. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक हाल होत असतात. मात्र, पंतप्रधान शेतकरी सन्मान निधीमुळे शेतकऱ्यांना हातभार मिळाला आहे. सन्मान निधी पात्र शेतकऱ्यांच्या थेट खात्यात निधी जमा झाल्यामुळे त्यांना अडचणीत कोणापुढे हात पसरवण्याची गरज भासत नाही.

९८ टक्के शेतकऱ्यांची केवायसी झाली पूर्णयोजनेच्या लाभासाठी बँकेत खात्याला आधार, पॅनकार्ड संलग्न करणे आवश्यक आहे. जिल्ह्यात ९८ टक्के शेतकऱ्यांची केवायसी पूर्ण झाली आहे.

अनेक शेतकऱ्यांकडून केले पैसे वसूलपंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेसाठी आयकर भरणारे शेतकरी अपात्र ठरले आहेत. आयकर भरणाऱ्या या शेतकऱ्या कडून शासनाने सुरुवातीपासूनची रक्कम वसूल केली आहे.

जिल्ह्यात लाभार्थ्यांचा आकडा एक लाखांतपीएम किसान योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या जिल्ह्यात एक लाख ३७ हजार ५०७ एवढी आहे. दिवसागणीत यात वाढ होत आहे.

हजारांवर लाभार्थी घटलेपंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेच्या नियम व अटीमध्ये न बसणाऱ्या काही शेतकऱ्यांचे व काही शेतकऱ्यांचा अकाली मृत्यू झाल्याने योजनेचे अर्ज रद्द करण्यात आले आहेत. यामुळे योजनेतून हजारांवर लाभार्थी घटले आहेत. पात्र लाभार्थ्यांची संख्या कमी झाली आहे.

तालुकानिहाय पात्र लाभार्थी संख्यातालुका         १९ वा हप्ताआर्वी                १६,५४३आष्टी                १०,४७४देवळी              १७,७५५हिंगणघाट         २०,५६९कारंजा             १८,३४३समुद्रपूर           १९,३७७सेलू                 १५,३०१वर्धा                 १६,५९७

१९ वा हप्ता मिळालावर्धा जिल्ह्यामध्ये पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेसाठी १ लाख ३४ हजार ७३५ शेतकरी पात्र आहेत. मात्र, अनेक शेतकऱ्यांची केवायसीसह अन्य कागदपत्रांमध्ये त्रुटी आहेत. यामुळे काही शेतकरी लाभापासून वंचित आहेत. 

टॅग्स :wardha-acवर्धाfarmingशेतीFarmerशेतकरी