शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
2
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
3
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
4
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
5
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
6
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
7
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
8
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
9
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
10
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
11
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
12
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
13
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
14
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
15
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
16
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
17
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
18
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
19
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
20
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...

एसटीच्या 157 बसगाड्यांनी अर्ध्या रस्त्यात सोडली साथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 05:00 IST

जिल्ह्यातील दुर्दशीत रस्त्यामुळे एसटीला टायर पंक्चर होणे, सुट्याभागांचे नुकसान होणे आदींचा नेहमीच फटका बसतो. क्लच प्लेट, प्रेशर प्लेट, ट्रान्समिशन सिस्टममध्ये बिघाड निर्माण होणे, इंजिन बंद पडणे याशिवाय  इलेक्ट्रिकल अडचणींमुळे एसटी मध्येच नादुरुस्त होतात. यात बहुतांशवेळी प्रवाशांना धक्का मारावा लागतो. एखाद्या प्रवाशाला नियोजितस्थळी तातडीने जावयाचे असल्यास त्याच्याकडून अशावेळी संताप व्यक्त होतो.

ठळक मुद्देमेंटेनन्सवर कोटींचा खर्च : तोट्यात असलेल्या महामंडळाला परवडेना

सुहास घनोकार लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : एसटी बसच्या देखभालीवर वर्षाकाठी कोटी रुपयाचा खर्च होत असला तरी त्या मध्येच नादुरुस्त होण्याचा अनुभव प्रवाशांना सातत्याने येत असतो. यामुळे प्रवासी परिवहन महामंडळाप्रती वैताग व्यक्त करताना दिसतात.  जिल्ह्यात मागील वर्षभरात बसस्थानकातून बाहेर पडल्यानंतर तब्बल १५७ बसेस पडल्या.  जिल्ह्यातील दुर्दशीत रस्त्यामुळे एसटीला टायर पंक्चर होणे, सुट्याभागांचे नुकसान होणे आदींचा नेहमीच फटका बसतो. क्लच प्लेट, प्रेशर प्लेट, ट्रान्समिशन सिस्टममध्ये बिघाड निर्माण होणे, इंजिन बंद पडणे याशिवाय  इलेक्ट्रिकल अडचणींमुळे एसटी मध्येच नादुरुस्त होतात. यात बहुतांशवेळी प्रवाशांना धक्का मारावा लागतो. एखाद्या प्रवाशाला नियोजितस्थळी तातडीने जावयाचे असल्यास त्याच्याकडून अशावेळी संताप व्यक्त होतो.वर्धा विभागांतर्गत वर्ध्यासह आर्वी, हिंगणघाट, पुलगाव, तळेगाव (श्यामजी पंत) आदी पाच आगार आहेत. हे पाचही आगार मिळून एकूण २२८ बसगाड्या आहेत. संपूर्ण विभागात एकूण १५०० अधिकारी, कर्मचारी कार्यरत आहेत. एसटीच्या दररोज ३४० ते २५० किलोमीटर फेऱ्या होतात. कोरोना विषाणू प्रादुर्भाव काळात तब्बल सात ते आठ महिने एसटीची चाके जागीच रुतली. त्यामुळे एसटीच्या देखभालीवरील खर्चाचे प्रमाण यंदा कमी राहिले. सध्या एसटी पूर्णक्षमतेने जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आणि जिल्हाबाहेर धावत असून, एसटी रस्त्यात मधेच बंद पडण्याचे प्रमाण सध्या तरी आढळून आले नाही.रस्त्यात एसटी बस बंद पडण्याची कारणे एसटी बसच्या देखभालीवर कोटीचा खर्च होत असला तरी गाड्यांमध्ये क्लच प्लेट, प्रेशर प्लेट, ट्रान्समिशन सिस्टममध्ये बिघाड निर्माण होणे, इंजिन बंद पडणे, टायर पंक्चर होणे याशिवाय इलेक्ट्रिकल अडचणी आल्यास रस्त्यात मध्येच एसटी बस बंद पडतात. मात्र हे प्रमाण आता कमी झाले आहे.

दहा वर्षांवरील ९० बसेसवर्धा विभागांतर्गत वर्धा, पुलगाव, हिंगणघाट, तळेगाव (श्यामजी पंत), पुलगाव आदी पाच आगार असून, एकूण २२८ बसगाड्या आहेत.  उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या नियमानुसार १५ वर्षांपर्यंत बस वापरता येते. मात्र, वर्धा विभागांतर्गत साधारणत: ८ ते १० वर्षांपर्यंतच बसगाडीचा वापर केला जातो. १२ वर्षांनंतर बस स्क्रॅपमध्ये काढली जाते अथवा या गाड्यांचे रूपांतर मालवाहतूक गाडीत केले जाते. प्रवाशांची गैरसोय होऊ नये याकरिता वर्धा विभागाकडून सुस्थितीतील बसेस उपयोगात आणल्या जातात. तसेच बस गाड्यांच्या मेन्टेन्स कडेही लक्ष विशेष लक्ष दिले जाते, असे आगारातील सुत्रांकडून सांगण्यात आले. 

एसटीच्या देखभालीसाठी मोठा खर्च होतो. तो महामंडळाला परवडत नसला तरी प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्यासाठी तो करावाच लागतो. सद्यस्थितीत आगारातील बसगाड्यांची स्थिती उत्तम आहे. बसगाड्या रस्त्यात मधेच बंद पडण्याचे प्रमाण कमी झाले आहे.पल्लवी चोकट, आगारप्रमुख, वर्धा. 

 

टॅग्स :state transportएसटी