शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

विदर्भातील दिडशेवर विद्यार्थी रशियात लॉकडाऊन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 14:16 IST

शिक्षणाकरिता रशियात गेलेले विदर्भातील जवळपास १५७ विद्यार्थी सध्या मायदेशी येण्याकरिता धडपडत आहे. पण, त्यांना परत आणण्याकरिता कोणतीही सुविधा नाही. शासनाकडून वंदे भारत या मोहिमेअंतर्गत सहा विमाने विदेशात पाठविण्याची तयारी दर्शविली आहे. मात्र, त्यातून रशियात अडकलेल्या विद्यार्थ्यांना वगळण्यात आल्याने विद्यार्थ्यांसह पालकांची चिंता वाढली आहे.

ठळक मुद्देवंदे भारत मोहिमेत समावेश नाहीवाढत्या रुग्णसंख्येमुळे विद्यार्थ्यांसह पालकही चिंतेत

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: शिक्षणाकरिता रशियात गेलेले विदर्भातील जवळपास १५७ विद्यार्थी सध्या मायदेशी येण्याकरिता धडपडत आहे. पण, त्यांना परत आणण्याकरिता कोणतीही सुविधा नाही. शासनाकडून वंदे भारत या मोहिमेअंतर्गत सहा विमाने विदेशात पाठविण्याची तयारी दर्शविली आहे. मात्र, त्यातून रशियात अडकलेल्या विद्यार्थ्यांना वगळण्यात आल्याने विद्यार्थ्यांसह पालकांची चिंता वाढली आहे.रशियातील मॉस्को, कझान या ठिकाणी असलेल्या विविध विद्यापीठात विदर्भातील जवळपास १५७ विद्यार्थी शिक्षण घेत आहे. त्यामध्ये वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्यांची संख्या अधिक असून वध्यार्तील ३५ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. काही पहिल्या वर्षाला तर काही व्दितीय, तृतीय वर्षाचे शिक्षण घेत आहे. सध्या कोरोनाने रशियामध्ये चांगलाच धुमाकूळ घातला आहे. रशियात कोरोना रुग्णाची संख्या ३ लाखांच्या घरात असून देशातील दुसºया क्रमांकाची रुग्णसंख्या या देश आहे. त्यामुळे येथे शिक्षणाकरिता गेलेल्या विदर्भातील १५७ विद्यार्थ्यांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शासनाने वंदे भारत मोहिमेंतर्गत फक्त वयोवृद्ध व आजारी व्यक्तींना प्राधान्य देण्यात आल्याने विद्यार्थी दुर्लक्षित राहिले आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांनाही मायदेशी परत आणण्याकरिता तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी पालकवर्गाकडून केली जात आहे.विदेश मंत्रालयाच्या भूमिकेकडे लक्षरशियामध्ये अडकलेल्या विदर्भातील १५७ विद्यार्थ्यांसह रायपूर येथील ५० विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्याकरिता वर्ध्यातील भाजपाचे जिल्हा महामंत्री अविनाश देव व आमदार डॉ. पंकज भोयर यांनी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्याशी संपर्क साधून प्रयत्न सुरु केले. ना. गडकरी यांनी लगेच पत्रव्यवहार करुन संपूर्ण विद्यार्थ्यांची यादी विदेश मंत्रालयाला पाठविली. या विद्यार्थ्यांकरिता मुंबई ऐवजी मॉस्को ते नागपूर असे विमान उपलब्ध करावे. त्या सर्वांना नागपुरातच विलगीकरणात ठेवण्यात येईल, असेही पत्रात नमूद केले आहे. आता विदेश मंत्रालयाकडून काय भूमिका घेतली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.विमानांच्या तिकिटात तिप्पट वाढमॉस्को ते दिल्लीपर्यंतचे विमानाचे तिकिट १९ ते २० हजार रुपये होते. मात्र, आता आपत्तीकाळात शासनाने वंदे भारत मोहिमे अंतर्गत विशेष विमानाची व्यवस्था केली आहे. त्यामध्ये मॉस्को ते दिल्लीपर्यंतचे तिकीट ५० हजार ४०० रुपये केल्याने शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी इतकी रक्कम देणे अडचणीचे ठरणार आहे. बहूतांश विद्यार्थी सर्वसामान्य परिवारातील असून शिष्यवृत्ती व शिक्षण कर्जाच्या भरवश्यावर विदेशात शिक्षण घेत आहे. या आपत्तीकाळात मॉस्को ते दिल्लीपर्यंतचे विमानाचे तिकीट, त्यानंतर दिल्ली ते नागपूरपर्यंतचे तिकीट आणि १४ दिवस क्वारंटाईनचा खर्च, विद्यार्थ्यांनाच करायचा असल्याने विद्यार्थ्यांसह पालकही आता विवंचनेत आहेत.विदर्भातील दिडशेच्यावर विद्यार्थी रशियात अडकून पडले आहे. त्यांना आणण्याकरिता शासनाकडून अद्यापही उपाययोजना केली नाही. वर्ध्यार्तील जवळपास ३५ विद्यार्थी तेथे वैद्यकीय शिक्षणाकरिता गेले आहे. रशियामध्ये रुग्णाची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यासोबत मॉस्को ते दिल्लीपर्यंतच्या विमानाच्या तिकीट दरामध्ये तिप्पट वाढ करण्यात आली आहे. सर्व विद्यार्थी असल्याने त्यांना तिकीट दरात सवलत देण्यात यावी तसेच त्यांना मायदेशी आणण्याकरिता तत्काळ उपाययोजना करावी. कारण कोरोनाच्या प्रकोपामुळे सर्व पालकवर्ग चिंतेत आहे.- किशोर फाले, पालक, वर्धा.

 

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस