शहरं
Join us  
Trending Stories
1
लूथरा बंधूंच्या मागे आता ईडी देखील हात धुवून लागणार; दिल्लीतील एकाच पत्त्यावर ४२ बनावट कंपन्या...
2
११ वर्षांच्या यशस्वी मोहिमेनंतर NASA च्या 'MAVEN' मार्स ऑर्बिटरशी अचानक संपर्क तुटला; वैज्ञानिक चिंतेत
3
बँक खाते, पेन्शन, टॅक्स स्लॅब ते GST बदल... २०२५ मध्ये पैशांसंबंधी झाले ७ मोठे बदल; तुम्हाला किती फायदा?
4
Shashi Tharoor: "पत्नीच्या संमतीशिवाय संबंध ठेवणे वैवाहिक बलात्कारच, पतीला सूट का द्यावी?"- शशी थरूर
5
"शिवराज पाटील यांची अलीकडेच भेट झाली होती, ते..." PM नरेंद्र मोदींनी दिला आठवणींना उजाळा
6
Nashik Leopard: बिबट्याची नाशिक पोलीस महानिरीक्षकांच्या कार्यालय आवारातच एन्ट्री, सीसीटीव्हीमध्ये दिसला
7
"२ लाख घरे, ३५० स्क्वेअर फूटचं घर, १ कोटींची किंमत..."; धारावी प्रकल्पानं मुंबईचा चेहरा बदलणार
8
आता परत सलमानवर जोक करणार का? पापाराझीच्या प्रश्नावर प्रणित मोरेने हातच जोडले; म्हणाला...
9
...हे ५६ हजार लोक जगातील संपत्तीवर ठेवतात नियंत्रण; श्रीमंतीच्या नव्या आकडेवारीनं सर्वच हैराण
10
पाकिस्तान हेरगिरी नेटवर्क: गुरुग्राम कोर्टातील वकील नय्यूमला अटक, हवाला कनेक्शनचा संशय!
11
U19 Asia Cup 2025 : वैभव सूर्यवंशीचा धमाका! सिक्सर मारत स्टाईलमध्ये साजरी केली फिफ्टी
12
खळबळजनक! ३ वर्षे इंजिनिअरने केले रुग्णांवर उपचार; भावोजींची डिग्री, पण औषधं द्यायचा मेहुणा
13
‘शेतात जाणाऱ्या महिलाही सुरक्षित नाहीत’, पूर्वांचल एक्स्प्रेस वेवर हजारो जोडप्यांचे व्हिडीओ बनल्याने ग्रामस्थांमध्ये घबराट
14
नगराध्यक्ष ते राज्यपाल! कसा होता शिवराज पाटील चाकूरकरांचा प्रवास; तब्बल ७ वेळा बनले खासदार
15
उत्तर प्रदेशातील दुसरी सीमा हैदर! लग्नानंतर बांगलादेशी महिला रीना बेगम नेपाळमार्गे थेट भारतात
16
Flipperachi Net Worth: धुरंदरचं व्हायरल गाणं FA9LA गाणाऱ्या फ्लिपरॅचीची संपत्ती किती? दरवर्षी किती करतो कमाई, जाणून घ्या
17
Ghodbunder Road Update: घोडबंदर मार्गावर पुन्हा ३ दिवस अवजड वाहनांना बंदी,  पर्यायी मार्ग कोणते?
18
"मनोरंजनाच्या नावाखाली फक्त हिंसाच...", सध्याच्या कंटेंटवर राधिका आपटेने व्यक्त केली चिंता
19
मेक्सिकोच्या ५०% टॅक्समागे अमेरिकेचा हात? भारतातील 'या' क्षेत्राला बसणार सर्वाधिक झळ
20
IND vs SA: द.आफ्रिकेचा मोठा पराक्रम, भारताविरुद्ध सर्वाधिक टी-२० सामने जिंकणारा पहिलाच संघ
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भातील दिडशेवर विद्यार्थी रशियात लॉकडाऊन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 14:16 IST

शिक्षणाकरिता रशियात गेलेले विदर्भातील जवळपास १५७ विद्यार्थी सध्या मायदेशी येण्याकरिता धडपडत आहे. पण, त्यांना परत आणण्याकरिता कोणतीही सुविधा नाही. शासनाकडून वंदे भारत या मोहिमेअंतर्गत सहा विमाने विदेशात पाठविण्याची तयारी दर्शविली आहे. मात्र, त्यातून रशियात अडकलेल्या विद्यार्थ्यांना वगळण्यात आल्याने विद्यार्थ्यांसह पालकांची चिंता वाढली आहे.

ठळक मुद्देवंदे भारत मोहिमेत समावेश नाहीवाढत्या रुग्णसंख्येमुळे विद्यार्थ्यांसह पालकही चिंतेत

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: शिक्षणाकरिता रशियात गेलेले विदर्भातील जवळपास १५७ विद्यार्थी सध्या मायदेशी येण्याकरिता धडपडत आहे. पण, त्यांना परत आणण्याकरिता कोणतीही सुविधा नाही. शासनाकडून वंदे भारत या मोहिमेअंतर्गत सहा विमाने विदेशात पाठविण्याची तयारी दर्शविली आहे. मात्र, त्यातून रशियात अडकलेल्या विद्यार्थ्यांना वगळण्यात आल्याने विद्यार्थ्यांसह पालकांची चिंता वाढली आहे.रशियातील मॉस्को, कझान या ठिकाणी असलेल्या विविध विद्यापीठात विदर्भातील जवळपास १५७ विद्यार्थी शिक्षण घेत आहे. त्यामध्ये वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्यांची संख्या अधिक असून वध्यार्तील ३५ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. काही पहिल्या वर्षाला तर काही व्दितीय, तृतीय वर्षाचे शिक्षण घेत आहे. सध्या कोरोनाने रशियामध्ये चांगलाच धुमाकूळ घातला आहे. रशियात कोरोना रुग्णाची संख्या ३ लाखांच्या घरात असून देशातील दुसºया क्रमांकाची रुग्णसंख्या या देश आहे. त्यामुळे येथे शिक्षणाकरिता गेलेल्या विदर्भातील १५७ विद्यार्थ्यांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शासनाने वंदे भारत मोहिमेंतर्गत फक्त वयोवृद्ध व आजारी व्यक्तींना प्राधान्य देण्यात आल्याने विद्यार्थी दुर्लक्षित राहिले आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांनाही मायदेशी परत आणण्याकरिता तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी पालकवर्गाकडून केली जात आहे.विदेश मंत्रालयाच्या भूमिकेकडे लक्षरशियामध्ये अडकलेल्या विदर्भातील १५७ विद्यार्थ्यांसह रायपूर येथील ५० विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्याकरिता वर्ध्यातील भाजपाचे जिल्हा महामंत्री अविनाश देव व आमदार डॉ. पंकज भोयर यांनी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्याशी संपर्क साधून प्रयत्न सुरु केले. ना. गडकरी यांनी लगेच पत्रव्यवहार करुन संपूर्ण विद्यार्थ्यांची यादी विदेश मंत्रालयाला पाठविली. या विद्यार्थ्यांकरिता मुंबई ऐवजी मॉस्को ते नागपूर असे विमान उपलब्ध करावे. त्या सर्वांना नागपुरातच विलगीकरणात ठेवण्यात येईल, असेही पत्रात नमूद केले आहे. आता विदेश मंत्रालयाकडून काय भूमिका घेतली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.विमानांच्या तिकिटात तिप्पट वाढमॉस्को ते दिल्लीपर्यंतचे विमानाचे तिकिट १९ ते २० हजार रुपये होते. मात्र, आता आपत्तीकाळात शासनाने वंदे भारत मोहिमे अंतर्गत विशेष विमानाची व्यवस्था केली आहे. त्यामध्ये मॉस्को ते दिल्लीपर्यंतचे तिकीट ५० हजार ४०० रुपये केल्याने शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी इतकी रक्कम देणे अडचणीचे ठरणार आहे. बहूतांश विद्यार्थी सर्वसामान्य परिवारातील असून शिष्यवृत्ती व शिक्षण कर्जाच्या भरवश्यावर विदेशात शिक्षण घेत आहे. या आपत्तीकाळात मॉस्को ते दिल्लीपर्यंतचे विमानाचे तिकीट, त्यानंतर दिल्ली ते नागपूरपर्यंतचे तिकीट आणि १४ दिवस क्वारंटाईनचा खर्च, विद्यार्थ्यांनाच करायचा असल्याने विद्यार्थ्यांसह पालकही आता विवंचनेत आहेत.विदर्भातील दिडशेच्यावर विद्यार्थी रशियात अडकून पडले आहे. त्यांना आणण्याकरिता शासनाकडून अद्यापही उपाययोजना केली नाही. वर्ध्यार्तील जवळपास ३५ विद्यार्थी तेथे वैद्यकीय शिक्षणाकरिता गेले आहे. रशियामध्ये रुग्णाची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यासोबत मॉस्को ते दिल्लीपर्यंतच्या विमानाच्या तिकीट दरामध्ये तिप्पट वाढ करण्यात आली आहे. सर्व विद्यार्थी असल्याने त्यांना तिकीट दरात सवलत देण्यात यावी तसेच त्यांना मायदेशी आणण्याकरिता तत्काळ उपाययोजना करावी. कारण कोरोनाच्या प्रकोपामुळे सर्व पालकवर्ग चिंतेत आहे.- किशोर फाले, पालक, वर्धा.

 

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस