शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

विदर्भातील दिडशेवर विद्यार्थी रशियात लॉकडाऊन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 14:16 IST

शिक्षणाकरिता रशियात गेलेले विदर्भातील जवळपास १५७ विद्यार्थी सध्या मायदेशी येण्याकरिता धडपडत आहे. पण, त्यांना परत आणण्याकरिता कोणतीही सुविधा नाही. शासनाकडून वंदे भारत या मोहिमेअंतर्गत सहा विमाने विदेशात पाठविण्याची तयारी दर्शविली आहे. मात्र, त्यातून रशियात अडकलेल्या विद्यार्थ्यांना वगळण्यात आल्याने विद्यार्थ्यांसह पालकांची चिंता वाढली आहे.

ठळक मुद्देवंदे भारत मोहिमेत समावेश नाहीवाढत्या रुग्णसंख्येमुळे विद्यार्थ्यांसह पालकही चिंतेत

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: शिक्षणाकरिता रशियात गेलेले विदर्भातील जवळपास १५७ विद्यार्थी सध्या मायदेशी येण्याकरिता धडपडत आहे. पण, त्यांना परत आणण्याकरिता कोणतीही सुविधा नाही. शासनाकडून वंदे भारत या मोहिमेअंतर्गत सहा विमाने विदेशात पाठविण्याची तयारी दर्शविली आहे. मात्र, त्यातून रशियात अडकलेल्या विद्यार्थ्यांना वगळण्यात आल्याने विद्यार्थ्यांसह पालकांची चिंता वाढली आहे.रशियातील मॉस्को, कझान या ठिकाणी असलेल्या विविध विद्यापीठात विदर्भातील जवळपास १५७ विद्यार्थी शिक्षण घेत आहे. त्यामध्ये वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्यांची संख्या अधिक असून वध्यार्तील ३५ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. काही पहिल्या वर्षाला तर काही व्दितीय, तृतीय वर्षाचे शिक्षण घेत आहे. सध्या कोरोनाने रशियामध्ये चांगलाच धुमाकूळ घातला आहे. रशियात कोरोना रुग्णाची संख्या ३ लाखांच्या घरात असून देशातील दुसºया क्रमांकाची रुग्णसंख्या या देश आहे. त्यामुळे येथे शिक्षणाकरिता गेलेल्या विदर्भातील १५७ विद्यार्थ्यांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शासनाने वंदे भारत मोहिमेंतर्गत फक्त वयोवृद्ध व आजारी व्यक्तींना प्राधान्य देण्यात आल्याने विद्यार्थी दुर्लक्षित राहिले आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांनाही मायदेशी परत आणण्याकरिता तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी पालकवर्गाकडून केली जात आहे.विदेश मंत्रालयाच्या भूमिकेकडे लक्षरशियामध्ये अडकलेल्या विदर्भातील १५७ विद्यार्थ्यांसह रायपूर येथील ५० विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्याकरिता वर्ध्यातील भाजपाचे जिल्हा महामंत्री अविनाश देव व आमदार डॉ. पंकज भोयर यांनी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्याशी संपर्क साधून प्रयत्न सुरु केले. ना. गडकरी यांनी लगेच पत्रव्यवहार करुन संपूर्ण विद्यार्थ्यांची यादी विदेश मंत्रालयाला पाठविली. या विद्यार्थ्यांकरिता मुंबई ऐवजी मॉस्को ते नागपूर असे विमान उपलब्ध करावे. त्या सर्वांना नागपुरातच विलगीकरणात ठेवण्यात येईल, असेही पत्रात नमूद केले आहे. आता विदेश मंत्रालयाकडून काय भूमिका घेतली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.विमानांच्या तिकिटात तिप्पट वाढमॉस्को ते दिल्लीपर्यंतचे विमानाचे तिकिट १९ ते २० हजार रुपये होते. मात्र, आता आपत्तीकाळात शासनाने वंदे भारत मोहिमे अंतर्गत विशेष विमानाची व्यवस्था केली आहे. त्यामध्ये मॉस्को ते दिल्लीपर्यंतचे तिकीट ५० हजार ४०० रुपये केल्याने शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी इतकी रक्कम देणे अडचणीचे ठरणार आहे. बहूतांश विद्यार्थी सर्वसामान्य परिवारातील असून शिष्यवृत्ती व शिक्षण कर्जाच्या भरवश्यावर विदेशात शिक्षण घेत आहे. या आपत्तीकाळात मॉस्को ते दिल्लीपर्यंतचे विमानाचे तिकीट, त्यानंतर दिल्ली ते नागपूरपर्यंतचे तिकीट आणि १४ दिवस क्वारंटाईनचा खर्च, विद्यार्थ्यांनाच करायचा असल्याने विद्यार्थ्यांसह पालकही आता विवंचनेत आहेत.विदर्भातील दिडशेच्यावर विद्यार्थी रशियात अडकून पडले आहे. त्यांना आणण्याकरिता शासनाकडून अद्यापही उपाययोजना केली नाही. वर्ध्यार्तील जवळपास ३५ विद्यार्थी तेथे वैद्यकीय शिक्षणाकरिता गेले आहे. रशियामध्ये रुग्णाची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यासोबत मॉस्को ते दिल्लीपर्यंतच्या विमानाच्या तिकीट दरामध्ये तिप्पट वाढ करण्यात आली आहे. सर्व विद्यार्थी असल्याने त्यांना तिकीट दरात सवलत देण्यात यावी तसेच त्यांना मायदेशी आणण्याकरिता तत्काळ उपाययोजना करावी. कारण कोरोनाच्या प्रकोपामुळे सर्व पालकवर्ग चिंतेत आहे.- किशोर फाले, पालक, वर्धा.

 

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस