शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

४८ तासात तब्बल १५ हजार शेतकऱ्यांनी केली केवायसी; गाव पातळीवरील विशेष शिबिरे ठरली उपयुक्त

By महेश सायखेडे | Updated: September 5, 2022 18:49 IST

सद्यस्थितीत वर्धा जिल्ह्याचा पीएम किसान केवायसीचा टक्का ६२ इतका झाला असल्याचे सांगण्यात आले.

वर्धा : प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना अर्थसहाय्य केले जाते. परंतु, संबंधित लाभार्थ्यांना केंद्राच्या या योजनेचा यापुढेही लाभ घेण्यासाठी वेळीच केवायसी करणे क्रमप्राप्त आहे. मात्र, मागील काही दिवसांपासून पीएम किसान योजनेच्या केवायसीचा टक्का ५२ वर स्थिरावल्याने जिल्हा प्रशासनाच्या अडचणीत भर पडली होती.

जास्तीत जास्त लाभार्थ्यांना वेळीच केवायसी करता यावी, या हेतूने जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनात तसेच निवासी उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे यांच्या नेतृत्त्वात जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीत गेले दोन दिवस विशेष केवायसी शिबिर घेण्यात आले. याच शिबिरांमध्ये अवघ्या ४८ तासांच्या काळात जिल्ह्यातील तब्बल १५ हजार १८६ शेतकऱ्यांनी केवायसी करून घेतली. त्यामुळे हे विशेष शिबिर पीएम किसानच्या केवायसीचा टक्का वाढविण्यासाठी उपयुक्त ठरले आहे. सद्यस्थितीत वर्धा जिल्ह्याचा पीएम किसान केवायसीचा टक्का ६२ इतका झाला असल्याचे सांगण्यात आले.७ सप्टेंबर, केवायसीची डेडलाइन

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या लाभार्थ्यांना केवायसी करता यावी, या हेतूने शासनाने केवायसी करण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. या योजनेच्या लाभार्थ्यांना ७ सप्टेंबरपर्यंत नजीकच्या ई-सेवा केंद्रात जाऊन तसेच घरबसल्या मोबाइलचा वापर करून केवायसी करता येणार आहे.६,००० बंद होण्याची शक्यता

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या लाभार्थ्यांना शासनाकडून सहा हजारांचे अर्थसहाय्य केले जाते. परंतु, वेळीच केवायसी न केलेल्या लाभार्थ्यांना शासनाकडून देण्यात येणाऱ्या या अर्थसहाय्यापासून मुकावे लागण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे प्रत्येक लाभार्थ्याने वेळीच केवायसी करणे गरजेचे आहे.१,४६,३४३ लाभार्थी

जिल्ह्यात प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचे एकूण १ लाख ४६ हजार ३४३ लाभार्थी आहेत. त्यापैकी ९० हजार ८७० लाभार्थ्यांनी केवायसी केली आहे, तर ५५ हजार ४७३ लाभार्थ्यांनी अजूनही केवायसी केली नसल्याचे वास्तव आहे.वर्धा तालुक्याचे काम ढेपाळलेलेच

मागील दोन दिवसात विशेष शिबिरांच्या माध्यमातून तब्बल १५ हजार १८६ शेतकऱ्यांनी पीएम किसानची केवायसी केली असली तरी वर्धा तालुक्यात पाहिजे तसे काम झाले नसल्याचे वास्तव आहे. गेल्या दोन दिवसात वर्धा तालुक्यात केवळ १ हजार ६१३ शेतकऱ्यांनीच केवायसी केली असून, इतर तालुक्यांच्या तुलनेत वर्धा तालुका हा पीएम किसान केवायसीच्या कामात मागेच आहे. वर्धा तालुक्यात आतापर्यंत केवळ ५१ टक्केच काम झाल्याचे वास्तव आहे.केवायसी पूर्णची तालुकानिहाय स्थितीआर्वी : ११,८८२आष्टी : ७,१२८देवळी : १२,७८४हिंगणघाट : १४,२९५कारंजा : १३,५५५समुद्रपूर : ११,८७६सेलू : ९,९६२वर्धा : ९,३८८

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीwardha-acवर्धा