शहरं
Join us  
Trending Stories
1
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
2
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
3
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
4
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
5
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
6
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
7
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
8
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
9
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
10
मोठी बातमी! सीएसएमटी स्थानकाबाहेर संशयित बॅग; पोलिस अलर्टवर
11
बिहार निवडणूक निकाल: एनडीएला प्रचंड बहुमत! तरीही 'राजद'ला अजूनही विजयाची आशा, नेमकी कशामुळे?
12
"ते आता कुठे टूर करताहेत?", पॉलिटिकल टूरिस्ट म्हणत रविशंकर प्रसाद यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
13
निकाल बिहारचा लागला आणि वाद महाविकास आघाडीत पेटला; ठाकरेंच्या नेत्याने सुनावले, काँग्रेसचा नेता भडकला
14
बिहार निकालाचा करिश्मा! बाजारात अखेरच्या तासात 'बुल्स रन'; 'या' क्षेत्रात मोठी वाढ, आयटीत मात्र विक्रीचा दबाव
15
पाकिस्तानातून भारतीय महिला अचानक झाली गायब! शोध घेताच समोर आलं धक्कादायक सत्य
16
IND vs SA 1st Test Day 1 Stumps: पहिला दिवस बुमराहनं गाजवला! आता तिसऱ्या क्रमांकावरील प्रयोगावर नजरा
17
बिहारमध्ये भाजपा नितीश कुमार यांचीच 'विकेट' काढणार? स्वत:चा CM बसवायला JDU गरजच नाही...
18
नीतीश कुमारांचं M अन् मोदींच्या Y समोर, तेजस्वींचं 'MY' समीकरण फेल; NDA साठी हे 2 फॅक्टर ठरले 'टर्निंग पॉइंट'!
19
2026 Prediction: २०२६ मध्ये 'या' ५ राशींवर शनीची वक्रदृष्टी; आर्थिक, मानसिक चिंता वाढणार
Daily Top 2Weekly Top 5

४८ तासात तब्बल १५ हजार शेतकऱ्यांनी केली केवायसी; गाव पातळीवरील विशेष शिबिरे ठरली उपयुक्त

By महेश सायखेडे | Updated: September 5, 2022 18:49 IST

सद्यस्थितीत वर्धा जिल्ह्याचा पीएम किसान केवायसीचा टक्का ६२ इतका झाला असल्याचे सांगण्यात आले.

वर्धा : प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना अर्थसहाय्य केले जाते. परंतु, संबंधित लाभार्थ्यांना केंद्राच्या या योजनेचा यापुढेही लाभ घेण्यासाठी वेळीच केवायसी करणे क्रमप्राप्त आहे. मात्र, मागील काही दिवसांपासून पीएम किसान योजनेच्या केवायसीचा टक्का ५२ वर स्थिरावल्याने जिल्हा प्रशासनाच्या अडचणीत भर पडली होती.

जास्तीत जास्त लाभार्थ्यांना वेळीच केवायसी करता यावी, या हेतूने जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनात तसेच निवासी उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे यांच्या नेतृत्त्वात जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीत गेले दोन दिवस विशेष केवायसी शिबिर घेण्यात आले. याच शिबिरांमध्ये अवघ्या ४८ तासांच्या काळात जिल्ह्यातील तब्बल १५ हजार १८६ शेतकऱ्यांनी केवायसी करून घेतली. त्यामुळे हे विशेष शिबिर पीएम किसानच्या केवायसीचा टक्का वाढविण्यासाठी उपयुक्त ठरले आहे. सद्यस्थितीत वर्धा जिल्ह्याचा पीएम किसान केवायसीचा टक्का ६२ इतका झाला असल्याचे सांगण्यात आले.७ सप्टेंबर, केवायसीची डेडलाइन

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या लाभार्थ्यांना केवायसी करता यावी, या हेतूने शासनाने केवायसी करण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. या योजनेच्या लाभार्थ्यांना ७ सप्टेंबरपर्यंत नजीकच्या ई-सेवा केंद्रात जाऊन तसेच घरबसल्या मोबाइलचा वापर करून केवायसी करता येणार आहे.६,००० बंद होण्याची शक्यता

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या लाभार्थ्यांना शासनाकडून सहा हजारांचे अर्थसहाय्य केले जाते. परंतु, वेळीच केवायसी न केलेल्या लाभार्थ्यांना शासनाकडून देण्यात येणाऱ्या या अर्थसहाय्यापासून मुकावे लागण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे प्रत्येक लाभार्थ्याने वेळीच केवायसी करणे गरजेचे आहे.१,४६,३४३ लाभार्थी

जिल्ह्यात प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचे एकूण १ लाख ४६ हजार ३४३ लाभार्थी आहेत. त्यापैकी ९० हजार ८७० लाभार्थ्यांनी केवायसी केली आहे, तर ५५ हजार ४७३ लाभार्थ्यांनी अजूनही केवायसी केली नसल्याचे वास्तव आहे.वर्धा तालुक्याचे काम ढेपाळलेलेच

मागील दोन दिवसात विशेष शिबिरांच्या माध्यमातून तब्बल १५ हजार १८६ शेतकऱ्यांनी पीएम किसानची केवायसी केली असली तरी वर्धा तालुक्यात पाहिजे तसे काम झाले नसल्याचे वास्तव आहे. गेल्या दोन दिवसात वर्धा तालुक्यात केवळ १ हजार ६१३ शेतकऱ्यांनीच केवायसी केली असून, इतर तालुक्यांच्या तुलनेत वर्धा तालुका हा पीएम किसान केवायसीच्या कामात मागेच आहे. वर्धा तालुक्यात आतापर्यंत केवळ ५१ टक्केच काम झाल्याचे वास्तव आहे.केवायसी पूर्णची तालुकानिहाय स्थितीआर्वी : ११,८८२आष्टी : ७,१२८देवळी : १२,७८४हिंगणघाट : १४,२९५कारंजा : १३,५५५समुद्रपूर : ११,८७६सेलू : ९,९६२वर्धा : ९,३८८

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीwardha-acवर्धा