शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

जानेवारी महिन्यात जिल्ह्यात रस्ता अपघातात गेले १५ बळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 18:26 IST

तब्बल ४० अपघात : मागील वर्षीच्या तुलनेत ११ ने वाढ

चैतन्य जोशी लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पूर्वी रस्ता सुरक्षा सप्ताह राबवला जात होता. नंतर सप्ताहाचा पंधरवडा झाला. आता महिनाभर रस्ता सुरक्षा अभियान राबविले गेले. मात्र, जानेवारी महिन्यात शहर-जिल्ह्यात एक दोन नव्हे, तर तब्बल १५ जणांचा अपघाती बळी गेला आहे.

जानेवारी २०२४ मध्ये एकूण २९ अपघात झाले होते. त्यात १० जणांचा बळी गेला होता. जानेवारी २०२५ मध्ये ४० अपघात झाले असून, १५ जणांचा बळी गेला आहे. यात गतवर्षीपेक्षा यंदाच्या वर्षी अपघात अन् बळींची संख्या वाढल्याचे दिसून येत आहे.

न्यायालयाच्या आदेशानुसार सर्वत्र अपघातस्थळे नष्ट करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. जिल्ह्यातील अपघातस्थळे नष्ट करण्यासाठी प्रयत्न झाले. त्यामुळे सध्या केवळ बोटावर मोजण्याइतपत अपघातस्थळे कायम आहेत. एकीकडे अपघातस्थळे नष्ट केली जात असून, रस्तेही मोठे झाले आहेत. पूर्वी नादुरुस्त रस्ते, खडे, गतिरोधक आदी कारणांमुळे अपघात होत होते. मात्र आता मानवी चुकांमुळे अपघाताच्या घटनांमध्ये वाढ होत चालली असल्याचे दिसून येत आहे.

मानवी चूका कारणीभूत...मानवी चुकांमुळे अपघात वाढले आहे. वाहतुकीच्या नियमांचे पालन न करणे, बेदरकारपणे वाहन चालवणे, नशेत वाहन चालवणे आदी कारणांमुळे अपघात होऊ लागले आहेत. नुकतेच जानेवारी महिन्यात रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात आले. आरटीओ, पोलिस, सार्वजनिक बांधकाम विभाग आदींच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम राबविले गेले. परंतु, याच महिन्यात १५ जणांचा अपघातात बळी गेला. त्यामुळे हे अभियान आता महिन्यापुरते नव्हेतर, वर्षभर सामाजिक चळवळ म्हणून राबविण्याची गरज आहे.

जानेवारीची आकडेवारी एकूण अपघातएकूण अपघात        मृत्यू          किरकोळ        गंभीर४०                        १५              १५                १०

ही आहेत अपघाताची कारणेचुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक करणे, वेगाने वाहन चालविणे, दारू पिऊन वाहन चालविणे, हेल्मेट न वापरणे, सीटबेल्ट न लावणे आदी कारणांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले असल्याचे चित्र दिसून येत आहे.

गतवर्षीपेक्षा वाढजिल्ह्यातील राज्यमार्ग तसेच महामार्गावर झालेल्या अपघातांत यंदाच्या जानेवारीत वाढ झाली आहे. गतवर्षी जानेवारी २०२४ मध्ये २९ अपघात झाले होते. यात १० जणांचा मृत्यू झाला होता. तर १० जण गंभीर आणि दोन जण किरकोळ जखमी झाले होते. जानेवारी २०२५ मध्ये यात ११ अपघातांची वाढ झाली असून, तब्बल ४० अपघातांत १५ जणांचा मृत्यू झाला आहे.

 

टॅग्स :Accidentअपघातwardha-acवर्धा