शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

जानेवारी महिन्यात जिल्ह्यात रस्ता अपघातात गेले १५ बळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 18:26 IST

तब्बल ४० अपघात : मागील वर्षीच्या तुलनेत ११ ने वाढ

चैतन्य जोशी लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पूर्वी रस्ता सुरक्षा सप्ताह राबवला जात होता. नंतर सप्ताहाचा पंधरवडा झाला. आता महिनाभर रस्ता सुरक्षा अभियान राबविले गेले. मात्र, जानेवारी महिन्यात शहर-जिल्ह्यात एक दोन नव्हे, तर तब्बल १५ जणांचा अपघाती बळी गेला आहे.

जानेवारी २०२४ मध्ये एकूण २९ अपघात झाले होते. त्यात १० जणांचा बळी गेला होता. जानेवारी २०२५ मध्ये ४० अपघात झाले असून, १५ जणांचा बळी गेला आहे. यात गतवर्षीपेक्षा यंदाच्या वर्षी अपघात अन् बळींची संख्या वाढल्याचे दिसून येत आहे.

न्यायालयाच्या आदेशानुसार सर्वत्र अपघातस्थळे नष्ट करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. जिल्ह्यातील अपघातस्थळे नष्ट करण्यासाठी प्रयत्न झाले. त्यामुळे सध्या केवळ बोटावर मोजण्याइतपत अपघातस्थळे कायम आहेत. एकीकडे अपघातस्थळे नष्ट केली जात असून, रस्तेही मोठे झाले आहेत. पूर्वी नादुरुस्त रस्ते, खडे, गतिरोधक आदी कारणांमुळे अपघात होत होते. मात्र आता मानवी चुकांमुळे अपघाताच्या घटनांमध्ये वाढ होत चालली असल्याचे दिसून येत आहे.

मानवी चूका कारणीभूत...मानवी चुकांमुळे अपघात वाढले आहे. वाहतुकीच्या नियमांचे पालन न करणे, बेदरकारपणे वाहन चालवणे, नशेत वाहन चालवणे आदी कारणांमुळे अपघात होऊ लागले आहेत. नुकतेच जानेवारी महिन्यात रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात आले. आरटीओ, पोलिस, सार्वजनिक बांधकाम विभाग आदींच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम राबविले गेले. परंतु, याच महिन्यात १५ जणांचा अपघातात बळी गेला. त्यामुळे हे अभियान आता महिन्यापुरते नव्हेतर, वर्षभर सामाजिक चळवळ म्हणून राबविण्याची गरज आहे.

जानेवारीची आकडेवारी एकूण अपघातएकूण अपघात        मृत्यू          किरकोळ        गंभीर४०                        १५              १५                १०

ही आहेत अपघाताची कारणेचुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक करणे, वेगाने वाहन चालविणे, दारू पिऊन वाहन चालविणे, हेल्मेट न वापरणे, सीटबेल्ट न लावणे आदी कारणांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले असल्याचे चित्र दिसून येत आहे.

गतवर्षीपेक्षा वाढजिल्ह्यातील राज्यमार्ग तसेच महामार्गावर झालेल्या अपघातांत यंदाच्या जानेवारीत वाढ झाली आहे. गतवर्षी जानेवारी २०२४ मध्ये २९ अपघात झाले होते. यात १० जणांचा मृत्यू झाला होता. तर १० जण गंभीर आणि दोन जण किरकोळ जखमी झाले होते. जानेवारी २०२५ मध्ये यात ११ अपघातांची वाढ झाली असून, तब्बल ४० अपघातांत १५ जणांचा मृत्यू झाला आहे.

 

टॅग्स :Accidentअपघातwardha-acवर्धा