शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेवर मनसे नेते नाराज? म्हणाले, “त्यांनी आम्हाला दोनदा फसवलेय”
2
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षीय वैभव सूर्यवंशी पदार्पणासह रचणार इतिहास; जाणून घ्या सविस्तर
3
Big Breaking: तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात अखेर डॉ. सुश्रुत घैसास यांच्यावर गुन्हा दाखल
4
"देशात धार्मिक युद्ध भडकवण्यासाठी सुप्रीम कोर्ट जबाबदार"; मर्यादेबाहेर जाताय म्हणत भाजप खासदाराची टीका
5
IPL 2025 Video: 'सुपरमॅन' कॅच! विपराजला हवा होता चौकार, पण जोस बलटरने हवेत उडत घेतला भन्नाट झेल
6
राज ठाकरेंशी युती झाल्यास उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेर पडणार का?; संजय राऊत म्हणाले...
7
Video - अग्निकल्लोळ! एका ठिणगीमुळे बोटीला भीषण आग; १४८ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
“मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमुळे राज ठाकरेंची उपयुक्तता सर्वांना वाटत आहे”: छगन भुजबळ
9
“राहुल गांधींचा ‘डरो मत’ संदेश अमलात आणू, एकता, अखंडतेची मशाल घेऊन वाटचाल करू”: सपकाळ
10
Maharashtra Politics : राज ठाकरे अन् उद्धव ठाकरे एकत्र येणार का? संजय राऊतांनी सगळंच सांगितलं
11
“इथले मीठ खाता अन् मराठीला विरोध करता? हिंदीची सक्ती होऊ देणार नाही”; उद्धव ठाकरेंनी ठणकावले
12
IPL 2025: चेन्नई सुपर किंग्जमध्ये आला 'बेबी एबी'; अशी आहे टी२० कारकीर्द
13
“कार्यकर्त्यांनी कठोर मेहनत घ्यावी, ५ वर्षांनंतर काँग्रेस पुन्हा सत्तेत येईल”: नाना पटोले
14
"मी ज्या झोपडपट्टीतून आलोय...", दिसण्यावरून ट्रोल करणाऱ्यांना सिद्धार्थ जाधवची सणसणीत चपराक
15
गुजरातविरुद्ध केएल राहुलचा विक्रमी षटकार; रोहित, विराट आणि धोनीच्या पंक्तीत झाला सामील
16
'तो' प्रवास ठरला शेवटचा! गायीला वाचवण्याच्या प्रयत्नात कार कालव्यात पडली, एअर होस्टेसचा मृत्यू
17
'हिंदू आहोत हा आमचा गुन्हा आहे का?', पश्चिम बंगाल हिंसाचार बाधित महिलांचा भावनिक सवाल
18
“आम्ही कुटुंब फोडणारे नाही, राज अन् उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर स्वागतच”: हर्षवर्धन सपकाळ
19
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांना गती; शिंदे गटातील नेत्यांची प्रतिक्रिया म्हणाले...

८०० मीटरच्या रस्त्यावर १४ ‘स्पीड ब्रेकर’, वाहनचालकांच्या पाठीची हाडं खिळखिळी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2022 12:02 IST

आर्वी नगरपालिकेच्या वतीने शहरातील रस्त्यावर अनावश्यक तयार करण्यात आलेल्या गतिरोधकामुळे नागरिक त्रस्त झाले असून, हे गतिरोधक तत्काळ काढण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.

ठळक मुद्देएसडीओं निवेदन : गतिरोधक काढण्याची केली मागणी नागरिक म्हणताहेत हे तर पाठ ब्रेकर

वर्धा : एखाद्या रस्त्यावर अपघात वाढले, की नागरिकांची मागणी म्हणून तेथे गतिरोधक बसविण्याचा उपाय केला जातो. मात्र, ८०० मीटरच्या रस्त्यावर १७ गतिरोधक असतील तर.., त्यांना स्पीड ब्रेकर म्हणावे की पाठ ब्रेकर हा प्रश्न आर्वीकरांपुढे निर्माण झाला आहे. आर्वीतील एका रस्त्यावरील गतिरोधकांमुळे नागरिकांचे हाल होत आहेत.

आर्वी नगरपालिकेच्या वतीने शहरातील रस्त्यावर अनावश्यक तयार करण्यात आलेल्या गतिरोधकामुळे नागरिक त्रस्त झाले असून, हे गतिरोधक तत्काळ काढण्यात यावेत, अशी मागणी तालुका पत्रकार संघटनेच्या वतीने प्रशासक असलेले उपविभागीय महसूल अधिकारी हरीश धार्मिक यांना निवेदनातून केली आहे.

शहरातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरापासून ते गुरुनानक धर्मशाळेपर्यंत ८०० मीटर अंतरावर सुमारे १४ स्पीड ब्रेकर लावले आहेत, तर न्यायालयापासून खुने यांच्या घरापर्यंत एक हजार मीटर अंतरावर १४ स्पीड ब्रेकर आहेत. नवीन स्पीड ब्रेकर लावले असतानाही जुने सिमेंटचे स्पीड ब्रेकर अजूनही कायम आहे.

वाहनांच्या वेगावर नियंत्रण प्राप्त करण्यासाठी गतिरोधक आवश्यक असले तरी लावताना त्यांचा अतिरेक झाला. कमी अंतरावर स्पीड ब्रेकर असल्यामुळे वाहनचालकाला पाठीचे, मणक्याचे व कमरेचे आजार होऊ शकतात, वाहनाचेसुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे अनावश्यक गतिरोधक हटविण्याची मागणी करण्यात आली. यावेळी धार्मिक यांनी संबंधितांना फोन करून सिमेंट काँक्रिटचे स्पीड ब्रेकर हटविण्यात यावे तसेच अनावश्यक गतिरोधकाची पाहणी करण्याचे आदेश दिले.

निवेदन देताना संघटनेचे अध्यक्ष सुशीलसिंग ठाकूर, उदय बाजपेयी, संजय पाटनी, अनिल जोशी, विजय अजमिरे, सूर्यप्रकाश भट्टड, दशरथ जाधव, पुरुषोत्तम नागपुरे, प्रा. अभय दर्भे, विजय जयस्वाल, संदीप जैन, गौरव कुऱ्हेकर, आदींसह संघटनेतील सदस्यांची उपस्थिती होती.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाSocialसामाजिक