शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
2
Independence Day 2025: काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी...
3
इन्स्टाग्रामवर १.२ मिलियन फॉलोअर्स, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं केली अटक; कोण आहे 'ही' मॉडेल?
4
२० वर्षे पगार दिला, पण नोकरीवर काही काम करू दिले नाही! नाराज महिला कंपनीविरोधात गेली कोर्टात, म्हणाली...
5
नीरज चोप्राची पत्नी हिमानी मोरचा मोठा निर्णय! टेनिसला कायमचा रामराम, 'या' व्यवसायात घेतली उडी
6
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...
7
प्राध्यापकानेच रचला विभागप्रमुखाच्या हत्येचा कट, माजी विद्यार्थ्यांना दिली सुपारी, विमानाने बोलावले शूटर, अखेर...  
8
Gulabjamun Recipe: ना मावा, ना मिल्कपावडर; घरच्या साहित्यात १५ मिनिटांत करा फर्स्ट क्लास गुलाबजाम 
9
आसिफ अली झरदारींनी काश्मीरबाबत ओकली गरळ; पाकिस्तानी स्वातंत्र्यदिनी भारताला तोडण्याची भाषा
10
“नाल्यांमुळे RSS गंगा प्रदुषित झाली”; भाजपात आयाराम संस्कृतीवर स्वामी गोविंददेवगिरींची टीका
11
नवऱ्यापासून सुटका झाली, पण घटस्फोटानंतर थायरॉइड कॅन्सरने जखडलं; अभिनेत्रीने सांगितला कठीण काळ
12
पाकिस्तानने चीनसारखीच रॉकेट फोर्स उभारली; स्वातंत्र्यदिनी घोषणाही करून टाकली, पण...
13
मध्यरात्री प्रियकरासोबत गुपचूप पळून चालली होती पत्नी, आवाज झाला अन् पती उठला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण... 
14
शिवसेना कुणाची? अखेर तारीख ठरली; सुप्रीम कोर्टात 'या' दिवशी होणार अंतिम सुनावणी
15
जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा मिळणार? सरन्यायाधीश म्हणाले- पहलगामकडे दुर्लक्ष करू शकत नाही
16
अर्जुन तेंडुलकरची होणारी पत्नी चालवते आलिशान पेट सलून, कुत्र्यांना आंघोळ घालण्यासाठी घेते एवढे पैसे 
17
रॉकेट बनले Muthoot Finance कंपनीचे शेअर्स, १० टक्क्यांपेक्षा अधिक तेजी; टार्गेट प्राईजही वाढवली
18
छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाणला अजित पवारांनी दिली मोठी जबाबदारी
19
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
20
कर भरण्याचे टेन्शन सोडा! आता फक्त २४ रुपयांमध्ये भरा इन्कम टॅक्स, कोणी आणली खास ऑफर?

१३३३ शेतकऱ्यांनी केली चाराटंचाईवर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2019 22:10 IST

जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीत जनावरांच्या वैरणाचा प्रश्न भेडसावू लागला आहे. मात्र, वैरण विकास प्रकल्पाच्या माध्यमातून जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांनी शेतात वैरणाचे उत्पादन करून चारा आणि पाण्याचा प्रश्न यशस्वीरीत्या सोडविला आहे.

ठळक मुद्देवैरण विकासाला लागला हातभार : पशुसंवर्धन विभागाचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीत जनावरांच्या वैरणाचा प्रश्न भेडसावू लागला आहे. मात्र, वैरण विकास प्रकल्पाच्या माध्यमातून जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांनी शेतात वैरणाचे उत्पादन करून चारा आणि पाण्याचा प्रश्न यशस्वीरीत्या सोडविला आहे. जिल्हा पशुसंवर्धन विभागाने विविध योजनेतून कड्याळू, मका, चारा, ठोंबे बियाणे शेतकऱ्यांना पुरविल्याने मोठा हातभार लागला आहे. वैरण विकास योजनेचा जिल्ह्यातील तब्बल १ हजार ३३३ शेतकऱ्यांनी लाभ घेत चारालागवड करीत टंचाईवर मात केली आहे.जिल्ह्यात दुष्काळ जाहीर होताच प्रशासनाने चाराटंचाई व्यवस्थापनाविषयी संबंधित विभागाला शेतकºयांमध्ये जनजागृती करीत वैरण बियाणे वाटप करण्याबाबत निर्देश दिले. याकरिता जिल्हा वार्षिक योजनेतून दुभत्या जनावरांना वैरण उपलब्ध करण्यासाठी सुधारणा कार्यक्रमांतर्गत जिल्हा परिषदेला २० लाखांचा निधी प्राप्त झाला. या अंतर्गत पशुसंवर्धन विभागाने मोफत बियाणे वितरण कार्यक्रम राबवत उद्दिष्टपूर्ती साधली आहे.गतवर्षी झालेल्या अत्यल्प पर्जन्यमानामुळे जलाशयांमध्ये अल्पसा जलसाठा आहे. वाढत्या उष्णतामानामुळे नदी-नाल्यांना कधीचीच कोरड पडली आहे. उन्हाचा तडाखा, दुष्काळी परिस्थितीत निर्माण झालेली पाणीटंचाई, पशुखाद्य आणि चाºयाचे वाढलेले भाव अशा वेळी गोपालकांपुढे आव्हान उभे ठाकले होते.जिल्ह्यातील गावखेड्यात गाय, म्हैस, बैल, शेळयांसह इतर पाळीव जनावरे शेतीला पूरक व्यवसाय म्हणून अनेकांनी पाळली. चाकरमानी मंडळीही हौसेखातर गाई-म्हशी पाळताना दिसतात. पशुपालक आणि दुग्धव्यवसायावर अनेकांनी बेरोजगारीवर मात करीत समृद्ध झाले. मात्र, यंदा पाणीटंचाईचा प्रश्न पेटला असतानाच चाराटंचाईमुळे गोपालकांचे हाल होऊ लागले. यामुळे अनेकांनी जनावरे विक्रीचा सपाटा सुरू केल्याने पशुधनाची संख्या दिवसेंदिवस घटतच आहे.अशाही परिस्थितीत दुष्काळाशी दोन हात करण्याचा निर्धार करीत जिल्ह्यातील १ हजार ३३३ होतकरू शेतकºयांनी वैरण बियाणे, ठोंबे लागवड करून चाराटंचाईवर यशस्वीरीत्या मात केली. चाºयाचे नियोजन नसल्याने चिंताग्रस्त हजारो पशुपालकांनी पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून पुरवठा करण्यात आलेल्या बियाण्यांची लागवड केल्याने उन्हाळ्याच्या दिवसातदेखील मुबलक चारा उपलब्ध झाला. यामुळे दुग्धव्यवसाय सुरळीत आहे.टंचाईची ओरड, बैठकीकडे फिरविली पाठ!आर्वी, आष्टी, कारंजा हे तीन तालुके शासनातर्फे दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आले आहेत. येथे भीषण पाणी आणि चाराटंचाई आहे. यामुळे जनावरांचे हाल आहेत. अशा स्थितीत संबंधित पंचायत समितीस्तरावरून चारा छावणीसंदर्भात मागणी अपेक्षित आहे. मात्र, संबंधित एकाही तालुक्यातून प्रस्ताव आला नाही. याकरिता गुरुवारी कारंजा येथे पशुसंवर्धन विभागाच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र अनेक अधिकारी, पदाधिकाºयांनी या बैठकीकडे पाठ फिरविल्याने चाराप्रश्नी दुष्काळग्रस्त तालुक्यातील प्रशासन, लोकप्रतिनिधी किती गंभीर आहे, याचा प्रत्यय येतो.चारा डेपोविषयी प्रस्ताव नाहीचजिल्ह्यातील ग्रामीण भागात चाराटंचाई उग्र झाली आहे. यामुळे पशुपालकांचे होत आहे. टंचाईविषयी सातत्याने ओरड होत असली तरी जिल्ह्यातून आठही पंचायत समितीस्तरावरून जिल्हा पशुसंवर्धन विभागाकडे चारा डेपो सुरू करण्याबाबत एकही प्रस्ताव, मागणी प्राप्त झाली नसल्याचेही पशुसंवर्धन विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.अनेकांनी केली रोजगारनिर्मितीदिवसेंदिवस निसर्गाचा समतोल ढासळत चाललेला आहे. याचाच परिणाम म्हणून पावसाचे प्रमाण कमी झाले अन् नैसर्गिकरीत्या उगवणाºया वैरणाची टंचाई निर्माण झाली. यातच पशुखाद्याचे भावही कडाडले. यामुळे पशुपालकांसमोर जनावरांचे पालन-पोषण कसे करायचे, असा पेच पडला होता. ही परिस्थिती लक्षात घेत जिल्ह्यात दुर्लक्षित वैरण खरेदी-विक्रीच्या व्यवसायातून अनेकांनी रोजगारनिर्मिती केली आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी