शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
2
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
3
इराणच्या अणुकेंद्रांवर अमेरिकेने टाकलेले बंकर बस्टर बॉम्ब एवढे आहेत विध्वंसक, अशी आहेत त्यांची वैशिष्ट्ये
4
तीन भाषा शिकण्यासाठी खेळाच्या तासात कपात; हिंदी शिकवण्यावरुन सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
5
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
6
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
7
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
8
अलिबाग: खांदेरीवर ‘मंकला’, ‘वाघबकरी’ खेळांचे अवशेष; शोधमोहिमेत सापडले मंकलाचे १० पट
9
बुलेट ट्रेनसाठी ४० मीटरचा बॉक्स गर्डर; महाराष्ट्रात प्रथमच बसवला पूर्ण लांबीचा गर्डर 
10
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
11
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
12
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
13
मुंबई, चेन्नईत सीबीआयचे छापे; ८०० कोटींच्या भ्रष्टाचार, जेएनपीएच्या माजी मुख्य व्यवस्थापकासह चौघांवर गुन्हा
14
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
15
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
16
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
17
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
18
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
19
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
20
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही

१३३३ शेतकऱ्यांनी केली चाराटंचाईवर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2019 22:10 IST

जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीत जनावरांच्या वैरणाचा प्रश्न भेडसावू लागला आहे. मात्र, वैरण विकास प्रकल्पाच्या माध्यमातून जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांनी शेतात वैरणाचे उत्पादन करून चारा आणि पाण्याचा प्रश्न यशस्वीरीत्या सोडविला आहे.

ठळक मुद्देवैरण विकासाला लागला हातभार : पशुसंवर्धन विभागाचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीत जनावरांच्या वैरणाचा प्रश्न भेडसावू लागला आहे. मात्र, वैरण विकास प्रकल्पाच्या माध्यमातून जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांनी शेतात वैरणाचे उत्पादन करून चारा आणि पाण्याचा प्रश्न यशस्वीरीत्या सोडविला आहे. जिल्हा पशुसंवर्धन विभागाने विविध योजनेतून कड्याळू, मका, चारा, ठोंबे बियाणे शेतकऱ्यांना पुरविल्याने मोठा हातभार लागला आहे. वैरण विकास योजनेचा जिल्ह्यातील तब्बल १ हजार ३३३ शेतकऱ्यांनी लाभ घेत चारालागवड करीत टंचाईवर मात केली आहे.जिल्ह्यात दुष्काळ जाहीर होताच प्रशासनाने चाराटंचाई व्यवस्थापनाविषयी संबंधित विभागाला शेतकºयांमध्ये जनजागृती करीत वैरण बियाणे वाटप करण्याबाबत निर्देश दिले. याकरिता जिल्हा वार्षिक योजनेतून दुभत्या जनावरांना वैरण उपलब्ध करण्यासाठी सुधारणा कार्यक्रमांतर्गत जिल्हा परिषदेला २० लाखांचा निधी प्राप्त झाला. या अंतर्गत पशुसंवर्धन विभागाने मोफत बियाणे वितरण कार्यक्रम राबवत उद्दिष्टपूर्ती साधली आहे.गतवर्षी झालेल्या अत्यल्प पर्जन्यमानामुळे जलाशयांमध्ये अल्पसा जलसाठा आहे. वाढत्या उष्णतामानामुळे नदी-नाल्यांना कधीचीच कोरड पडली आहे. उन्हाचा तडाखा, दुष्काळी परिस्थितीत निर्माण झालेली पाणीटंचाई, पशुखाद्य आणि चाºयाचे वाढलेले भाव अशा वेळी गोपालकांपुढे आव्हान उभे ठाकले होते.जिल्ह्यातील गावखेड्यात गाय, म्हैस, बैल, शेळयांसह इतर पाळीव जनावरे शेतीला पूरक व्यवसाय म्हणून अनेकांनी पाळली. चाकरमानी मंडळीही हौसेखातर गाई-म्हशी पाळताना दिसतात. पशुपालक आणि दुग्धव्यवसायावर अनेकांनी बेरोजगारीवर मात करीत समृद्ध झाले. मात्र, यंदा पाणीटंचाईचा प्रश्न पेटला असतानाच चाराटंचाईमुळे गोपालकांचे हाल होऊ लागले. यामुळे अनेकांनी जनावरे विक्रीचा सपाटा सुरू केल्याने पशुधनाची संख्या दिवसेंदिवस घटतच आहे.अशाही परिस्थितीत दुष्काळाशी दोन हात करण्याचा निर्धार करीत जिल्ह्यातील १ हजार ३३३ होतकरू शेतकºयांनी वैरण बियाणे, ठोंबे लागवड करून चाराटंचाईवर यशस्वीरीत्या मात केली. चाºयाचे नियोजन नसल्याने चिंताग्रस्त हजारो पशुपालकांनी पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून पुरवठा करण्यात आलेल्या बियाण्यांची लागवड केल्याने उन्हाळ्याच्या दिवसातदेखील मुबलक चारा उपलब्ध झाला. यामुळे दुग्धव्यवसाय सुरळीत आहे.टंचाईची ओरड, बैठकीकडे फिरविली पाठ!आर्वी, आष्टी, कारंजा हे तीन तालुके शासनातर्फे दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आले आहेत. येथे भीषण पाणी आणि चाराटंचाई आहे. यामुळे जनावरांचे हाल आहेत. अशा स्थितीत संबंधित पंचायत समितीस्तरावरून चारा छावणीसंदर्भात मागणी अपेक्षित आहे. मात्र, संबंधित एकाही तालुक्यातून प्रस्ताव आला नाही. याकरिता गुरुवारी कारंजा येथे पशुसंवर्धन विभागाच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र अनेक अधिकारी, पदाधिकाºयांनी या बैठकीकडे पाठ फिरविल्याने चाराप्रश्नी दुष्काळग्रस्त तालुक्यातील प्रशासन, लोकप्रतिनिधी किती गंभीर आहे, याचा प्रत्यय येतो.चारा डेपोविषयी प्रस्ताव नाहीचजिल्ह्यातील ग्रामीण भागात चाराटंचाई उग्र झाली आहे. यामुळे पशुपालकांचे होत आहे. टंचाईविषयी सातत्याने ओरड होत असली तरी जिल्ह्यातून आठही पंचायत समितीस्तरावरून जिल्हा पशुसंवर्धन विभागाकडे चारा डेपो सुरू करण्याबाबत एकही प्रस्ताव, मागणी प्राप्त झाली नसल्याचेही पशुसंवर्धन विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.अनेकांनी केली रोजगारनिर्मितीदिवसेंदिवस निसर्गाचा समतोल ढासळत चाललेला आहे. याचाच परिणाम म्हणून पावसाचे प्रमाण कमी झाले अन् नैसर्गिकरीत्या उगवणाºया वैरणाची टंचाई निर्माण झाली. यातच पशुखाद्याचे भावही कडाडले. यामुळे पशुपालकांसमोर जनावरांचे पालन-पोषण कसे करायचे, असा पेच पडला होता. ही परिस्थिती लक्षात घेत जिल्ह्यात दुर्लक्षित वैरण खरेदी-विक्रीच्या व्यवसायातून अनेकांनी रोजगारनिर्मिती केली आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी