शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

जिल्ह्यात सिकलसेलचे तब्बल 13 हजार 703 वाहक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2022 05:00 IST

महाराष्ट्र राज्यात सिकलसेल आजार नियंत्रण कार्यक्रम २००८ पासून सुरू झाला. त्यानंतर वर्धा जिल्ह्याच्या आरोग्य विभागानेही वरिष्ठांच्या सूचनांना केंद्रस्थानी ठेवून या उपक्रमाला शहरी व ग्रामीण भागात वेळोवेळी गती दिली. याचाच परिणाम म्हणून जिल्ह्यातील १ हजार ९१ सिकलसेल बाधितांना शोधण्यात यश आले आहे. इतकेच नव्हे तर सिकलसेलचे तब्बल १३ हजार ७०३ वाहक शोधण्यात आले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : राष्ट्रपिता महात्मा गांधी व आचार्य विनोबा भावे यांची कर्मभूमी राहिलेल्या वर्धा जिल्ह्याची लोकसंख्या १४ लाखांच्या घरात असली तरी छोट्याशा वर्धा जिल्ह्यात सिकलसेलचे तब्बल १३ हजार ७०३ वाहक असल्याची नोंद आरोग्य विभागाने घेतली आहे. याच रुग्णांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने आता विशेष उपक्रम हाती घेतला आहे. महाराष्ट्र राज्यात सिकलसेल आजार नियंत्रण कार्यक्रम २००८ पासून सुरू झाला. त्यानंतर वर्धा जिल्ह्याच्या आरोग्य विभागानेही वरिष्ठांच्या सूचनांना केंद्रस्थानी ठेवून या उपक्रमाला शहरी व ग्रामीण भागात वेळोवेळी गती दिली. याचाच परिणाम म्हणून जिल्ह्यातील १ हजार ९१ सिकलसेल बाधितांना शोधण्यात यश आले आहे. इतकेच नव्हे तर सिकलसेलचे तब्बल १३ हजार ७०३ वाहक शोधण्यात आले आहेत. याच रुग्णांना त्यांनी पुढील जीवन कसे जगावे याबाबत आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांकडून मार्गदर्शन केले जात आहे.

तीन प्रकारच्या टेस्टने केले जाऊ शकते निदान- सोल्युबिलीटी चाचणी : सिलक हिमोग्लोबीनचे अस्तित्व आहे किंवा नाही ही चाचणी सर्व शासकीय आरोग्य संस्था स्तरावर करण्यात येते.- इलेक्ट्रोफोरेसीस चाचणी : सोल्युबिलीटी चाचणी पॉझिटिव्ह आल्यावर इलेक्ट्रोफोरेसीस चाचणी करून सिकलसेल वाहक वा सिकलसेल रुग्ण यांचे निदान केले जाते. ही चाचणी जिल्हा सामान्य रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय येथे केली जाते.- एचपीएलसी चाचणी : या चाचणीमुळे संपूर्ण रक्तातील पेशींची मोजणी करून रक्तपेशींची संख्या, आकार व हिमोग्लोबिनची पातळी याचा बोनमॅरो योग्य प्रकारे काम करीत आहे किंवा नाही याचा शोध घेतला जातो.

सिकलसेलची लक्षणे- रक्तक्षय कमतरता, प्लिहेचा आकार वाढणे, हात-पाय सुजणे, चेहरा निस्तेज होणे, सांधे दुखणे, वारंवार सर्दी-खोकला होणे, ताप राहणे, थकवा येणे, जंतुसंसर्ग आदी सिकलसेलची लक्षणे आहे. ही लक्षणे दिसल्यास तातडीने रुग्णालयात जात डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेणे गरजेचे आहे. 

सिकलसेल बाधितांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ दिला जातो. योग्य वेळी योग्य औषधोपचार व रक्त पुरवठा करण्यात आला तर सिकलसेल रुग्णदेखील चांगले आयुष्य जगू शकतो. शिवाय रुग्णाला मानसिक आधार देणे गरजेचेच आहे.- डॉ. रा. ज. पराडकर,  जिल्हा आरोग्य अधिकारी, वर्धा.

 

टॅग्स :Healthआरोग्य