शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

जिल्ह्यात सिकलसेलचे तब्बल 13 हजार 703 वाहक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2022 05:00 IST

महाराष्ट्र राज्यात सिकलसेल आजार नियंत्रण कार्यक्रम २००८ पासून सुरू झाला. त्यानंतर वर्धा जिल्ह्याच्या आरोग्य विभागानेही वरिष्ठांच्या सूचनांना केंद्रस्थानी ठेवून या उपक्रमाला शहरी व ग्रामीण भागात वेळोवेळी गती दिली. याचाच परिणाम म्हणून जिल्ह्यातील १ हजार ९१ सिकलसेल बाधितांना शोधण्यात यश आले आहे. इतकेच नव्हे तर सिकलसेलचे तब्बल १३ हजार ७०३ वाहक शोधण्यात आले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : राष्ट्रपिता महात्मा गांधी व आचार्य विनोबा भावे यांची कर्मभूमी राहिलेल्या वर्धा जिल्ह्याची लोकसंख्या १४ लाखांच्या घरात असली तरी छोट्याशा वर्धा जिल्ह्यात सिकलसेलचे तब्बल १३ हजार ७०३ वाहक असल्याची नोंद आरोग्य विभागाने घेतली आहे. याच रुग्णांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने आता विशेष उपक्रम हाती घेतला आहे. महाराष्ट्र राज्यात सिकलसेल आजार नियंत्रण कार्यक्रम २००८ पासून सुरू झाला. त्यानंतर वर्धा जिल्ह्याच्या आरोग्य विभागानेही वरिष्ठांच्या सूचनांना केंद्रस्थानी ठेवून या उपक्रमाला शहरी व ग्रामीण भागात वेळोवेळी गती दिली. याचाच परिणाम म्हणून जिल्ह्यातील १ हजार ९१ सिकलसेल बाधितांना शोधण्यात यश आले आहे. इतकेच नव्हे तर सिकलसेलचे तब्बल १३ हजार ७०३ वाहक शोधण्यात आले आहेत. याच रुग्णांना त्यांनी पुढील जीवन कसे जगावे याबाबत आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांकडून मार्गदर्शन केले जात आहे.

तीन प्रकारच्या टेस्टने केले जाऊ शकते निदान- सोल्युबिलीटी चाचणी : सिलक हिमोग्लोबीनचे अस्तित्व आहे किंवा नाही ही चाचणी सर्व शासकीय आरोग्य संस्था स्तरावर करण्यात येते.- इलेक्ट्रोफोरेसीस चाचणी : सोल्युबिलीटी चाचणी पॉझिटिव्ह आल्यावर इलेक्ट्रोफोरेसीस चाचणी करून सिकलसेल वाहक वा सिकलसेल रुग्ण यांचे निदान केले जाते. ही चाचणी जिल्हा सामान्य रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय येथे केली जाते.- एचपीएलसी चाचणी : या चाचणीमुळे संपूर्ण रक्तातील पेशींची मोजणी करून रक्तपेशींची संख्या, आकार व हिमोग्लोबिनची पातळी याचा बोनमॅरो योग्य प्रकारे काम करीत आहे किंवा नाही याचा शोध घेतला जातो.

सिकलसेलची लक्षणे- रक्तक्षय कमतरता, प्लिहेचा आकार वाढणे, हात-पाय सुजणे, चेहरा निस्तेज होणे, सांधे दुखणे, वारंवार सर्दी-खोकला होणे, ताप राहणे, थकवा येणे, जंतुसंसर्ग आदी सिकलसेलची लक्षणे आहे. ही लक्षणे दिसल्यास तातडीने रुग्णालयात जात डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेणे गरजेचे आहे. 

सिकलसेल बाधितांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ दिला जातो. योग्य वेळी योग्य औषधोपचार व रक्त पुरवठा करण्यात आला तर सिकलसेल रुग्णदेखील चांगले आयुष्य जगू शकतो. शिवाय रुग्णाला मानसिक आधार देणे गरजेचेच आहे.- डॉ. रा. ज. पराडकर,  जिल्हा आरोग्य अधिकारी, वर्धा.

 

टॅग्स :Healthआरोग्य