शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
4
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
5
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
6
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
7
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
8
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
9
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
10
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
11
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
12
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
13
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
14
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
15
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
16
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
17
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
18
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
19
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
20
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला

जिल्ह्यात सिकलसेलचे तब्बल 13 हजार 703 वाहक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2022 05:00 IST

महाराष्ट्र राज्यात सिकलसेल आजार नियंत्रण कार्यक्रम २००८ पासून सुरू झाला. त्यानंतर वर्धा जिल्ह्याच्या आरोग्य विभागानेही वरिष्ठांच्या सूचनांना केंद्रस्थानी ठेवून या उपक्रमाला शहरी व ग्रामीण भागात वेळोवेळी गती दिली. याचाच परिणाम म्हणून जिल्ह्यातील १ हजार ९१ सिकलसेल बाधितांना शोधण्यात यश आले आहे. इतकेच नव्हे तर सिकलसेलचे तब्बल १३ हजार ७०३ वाहक शोधण्यात आले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : राष्ट्रपिता महात्मा गांधी व आचार्य विनोबा भावे यांची कर्मभूमी राहिलेल्या वर्धा जिल्ह्याची लोकसंख्या १४ लाखांच्या घरात असली तरी छोट्याशा वर्धा जिल्ह्यात सिकलसेलचे तब्बल १३ हजार ७०३ वाहक असल्याची नोंद आरोग्य विभागाने घेतली आहे. याच रुग्णांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने आता विशेष उपक्रम हाती घेतला आहे. महाराष्ट्र राज्यात सिकलसेल आजार नियंत्रण कार्यक्रम २००८ पासून सुरू झाला. त्यानंतर वर्धा जिल्ह्याच्या आरोग्य विभागानेही वरिष्ठांच्या सूचनांना केंद्रस्थानी ठेवून या उपक्रमाला शहरी व ग्रामीण भागात वेळोवेळी गती दिली. याचाच परिणाम म्हणून जिल्ह्यातील १ हजार ९१ सिकलसेल बाधितांना शोधण्यात यश आले आहे. इतकेच नव्हे तर सिकलसेलचे तब्बल १३ हजार ७०३ वाहक शोधण्यात आले आहेत. याच रुग्णांना त्यांनी पुढील जीवन कसे जगावे याबाबत आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांकडून मार्गदर्शन केले जात आहे.

तीन प्रकारच्या टेस्टने केले जाऊ शकते निदान- सोल्युबिलीटी चाचणी : सिलक हिमोग्लोबीनचे अस्तित्व आहे किंवा नाही ही चाचणी सर्व शासकीय आरोग्य संस्था स्तरावर करण्यात येते.- इलेक्ट्रोफोरेसीस चाचणी : सोल्युबिलीटी चाचणी पॉझिटिव्ह आल्यावर इलेक्ट्रोफोरेसीस चाचणी करून सिकलसेल वाहक वा सिकलसेल रुग्ण यांचे निदान केले जाते. ही चाचणी जिल्हा सामान्य रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय येथे केली जाते.- एचपीएलसी चाचणी : या चाचणीमुळे संपूर्ण रक्तातील पेशींची मोजणी करून रक्तपेशींची संख्या, आकार व हिमोग्लोबिनची पातळी याचा बोनमॅरो योग्य प्रकारे काम करीत आहे किंवा नाही याचा शोध घेतला जातो.

सिकलसेलची लक्षणे- रक्तक्षय कमतरता, प्लिहेचा आकार वाढणे, हात-पाय सुजणे, चेहरा निस्तेज होणे, सांधे दुखणे, वारंवार सर्दी-खोकला होणे, ताप राहणे, थकवा येणे, जंतुसंसर्ग आदी सिकलसेलची लक्षणे आहे. ही लक्षणे दिसल्यास तातडीने रुग्णालयात जात डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेणे गरजेचे आहे. 

सिकलसेल बाधितांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ दिला जातो. योग्य वेळी योग्य औषधोपचार व रक्त पुरवठा करण्यात आला तर सिकलसेल रुग्णदेखील चांगले आयुष्य जगू शकतो. शिवाय रुग्णाला मानसिक आधार देणे गरजेचेच आहे.- डॉ. रा. ज. पराडकर,  जिल्हा आरोग्य अधिकारी, वर्धा.

 

टॅग्स :Healthआरोग्य