शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईहून कसाऱ्याला जाणाऱ्या लोकलवर दरड कोसळली, २ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती 
2
बिहारमधील मतदार यादीतून हटवली जाणार ५१ लाख मतदारांची नावं, या व्यक्तींचा समावेश, निवडणूक आयोगाने दिली माहिती
3
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
4
दिल्ली विमानतळावर लँडिंगदरम्यान Air India च्या विमानाला आग; सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित
5
"किसिंग सीन शूट करताना त्या अभिनेत्याने..."; अभिनेत्री विद्या बालनने सांगितला भयानक किस्सा
6
IND vs ENG : हरमनप्रीत कौरची कडक सेंच्युरी! निर्णायक वनडेत टीम इंडियानं केली विक्रमांची 'बरसात'
7
"अशाने महाराष्ट्राचं नुकसान होईल…’’, भाषावादादरम्यान तामिळनाडूमधील आठवण सांगत राज्यपालांचं मोठं विधान 
8
गिलनं 'टाइमपास' करणाऱ्या इंग्लंडच्या सलामी जोडीच्या 'त्या' कृतीचा केला 'पंचनामा'; म्हणाला...
9
१००% प्रॉफिट...! दुप्पट झाला कंपनीचा नफा; बुधवारी फोकसमध्ये राहणार हा शेअर 
10
"त्या आरोपीला चार तासांत शोधा, अन्यथा…’’ कल्याणमध्ये मराठी तरुणीला झालेल्या मारहाणीवरून मनसे आक्रमक 
11
IND vs ENG : हरमनप्रीत कौरचा मोठा पराक्रम; मिताली राजनंतर अशी कामगिरी करणारी ठरली दुसरी भारतीय
12
डान्स क्लासला नको म्हटल्याने मुलीने तोंडाला लावली विषारी बाटली; तीन महिन्यांची मृत्यूशी झुंज अपयशी
13
VIDEO: लाथ मारली, केस ओढून खाली आपटलं... मराठी तरूणीला परप्रांतीयाकडून बेदम मारहाण
14
एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये दीड लाख पगाराची नोकरी!
15
IND vs ENG : ठरलं! लेट एन्ट्री मारणारा थेट प्लेइंग इलेव्हनध्ये दिसणार; करुण नायरही बाकावर नाही बसणार
16
"डोनाल्ड ट्रम्प यांची हत्या करणारच’’, फतवा काढून इराणमधील मौलवींनी गोळा केले ३५० कोटी, शेजारील देशानेही दिली साथ
17
Chhangur Baba : "छांगुर बाबा बाहेर येतील, सर्वांना धडा शिकवतील"; धर्मांतर सिंडिकेटच्या गुंडांकडून धमक्या
18
बिहारच्या विधानसभेत तुफान राडा, आरजेडीचे आमदार आणि मार्शलमध्ये धक्काबुक्की
19
रजिस्ट्रेशन कधीपासून, घर कधी मिळणार? म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज करणाऱ्यांनी 'या' तारखा ठेवा लक्षात!
20
अहिल्यानगर: कधी कुऱ्हाड, कधी कोयता... कधी लाथाबुक्क्या; पत्नीने शेतात जाऊने साडीनेच संपवले आयुष्य

वृक्षारोपणावरील १३ लाखांचा खर्च व्यर्थ

By admin | Updated: May 27, 2016 01:54 IST

पर्यावरण संतुलनाकरिता व प्रदूषणावर उपाय म्हणून शासनाच्यावतीने शतकोटी वृक्षलागवड योजना अंमलात आणली.

दुर्लक्षामुळे झाडे वाळली : ग्रा.पं. म्हणते झाडे जगलीगौरव देशमुख वायगाव (नि.)पर्यावरण संतुलनाकरिता व प्रदूषणावर उपाय म्हणून शासनाच्यावतीने शतकोटी वृक्षलागवड योजना अंमलात आणली. या योजनेंतर्गत उद्देशानुसार ग्रामपंचायतीने १३ लाख ३ हजार १८२ रुपये खर्च करून २ हजार झाडे लावली. वृक्षारोपण झाले मात्र संगोपणाकडे दुर्लक्ष झाल्याने ती वाळली असताना ग्रामपंचायत प्रशासन त्यातील ७५ टक्के जगल्याची बतावणी करीत आहेत. पर्यावरण संतुलित राहावे. गावे समृद्ध व्हावीत, सर्वत्र हिरवळ निर्माण व्हावी, याकरिता शासनही पुढाकार घेत आहे. शासनामार्फत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमार्फत शतकोटी वृक्षारोपण कार्यक्रम राबविण्यात आला. वायगाव (नि.) येथील रस्त्याच्या दुतर्फा २ हजार रोपटे लावण्यात आली. शासनाचा १३ लाख ३ हजार १८२ रुपयांचा खर्च करण्यात आला; मात्र लावलेल्या रोपातील किती जगली किती वाळली याचा सर्व्हे न करताच ग्रामपंचायत ७५ टक्के झाडे जगल्याचे सांगत आहे. दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्याकरिता शासकीय यंत्रणा कागदोपत्री ते पूर्ण करतात. मात्र वास्तविकतेत किती झाडे लागली त्यातील किती जगली याचा कधी सर्व्हे झाला नसल्याचे दिसून आले आहे. याकडे जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देत चौकशीची मागणी आहे.