शहरं
Join us  
Trending Stories
1
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
2
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
3
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
4
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
5
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
6
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
7
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
8
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
9
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
10
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
11
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
12
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
13
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
14
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
15
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
16
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
17
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
18
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
19
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  

२३ एकरातील कपाशीच्या एका झाडाला १२५ बोंडे

By admin | Updated: November 4, 2014 22:45 IST

म़ गांधींची ‘खेड्याकडे चला’ ही संकल्पना साकारण्यासाठी हभप रामराम महाराज यांनी सहा महिन्यांपासून शेतात मुक्काम ठोकला़ स्वत:च्या मार्गदर्शनात त्यांनी आपल्या २३ एकर शेतात कपाशीची लागवड केली.

आदर्श शेतीकडे वाटचाल : कृषी विभागानेही केली पाहणीआष्टी (श़) : म़ गांधींची ‘खेड्याकडे चला’ ही संकल्पना साकारण्यासाठी हभप रामराम महाराज यांनी सहा महिन्यांपासून शेतात मुक्काम ठोकला़ स्वत:च्या मार्गदर्शनात त्यांनी आपल्या २३ एकर शेतात कपाशीची लागवड केली. नियोजन केल्याने कपाशीची झाडे ७ ते ८ फुट वाढली असून एका झाडाला १२५ च्या वर बोंडे आहेत़ या आदर्श शेताला कृषी अधीक्षक बऱ्हाटे यांच्यासह कृषी अधिकाऱ्यांनी भेट दिली़ शेतकऱ्यांसाठी कार्यशाळा घेण्याचे निर्देशही संबंधित तालुका कृषी अधिकाऱ्यांना दिले़बेलोरा (खुर्द) येथील प्रगतशील शेतकरी हरिकिसन चांडक ऊर्फ रामराम महाराज यांनी आध्यात्मिक मार्गाने समाज प्रबोधनाचे नि:शुल्क काम सुरू केले. अनेक गावांत भागवत सप्ताह घेऊन लोकांना दारूच्या व्यसनातून मुक्त केले. सोबतच शेतीला चांगले दिवस यावे, तरूणांनी खेड्याकडे वळावे म्हणून रामराम महाराजांनी शेती करण्याचे ठरविले़ उन्हाळ्यापासूनच शेतात थांबून नियोजन केले. सेंद्रीय शेतीचा मार्ग निवडला. पाणी, खत, बियाणे स्वत:च ठरविल्या. प्रत्येक एकरात पाच बाय पाच फुट अंतराने एकरी ७ हजार २५० झाडे लावली. वाढीसाठी जागा मिळाल्याने व खत, पाणी भरपूर मिळाल्याने कपाशी वाढली़ निंदणाऐवजी तण नाशकाचा वापर केला़ कपाशीची झाडे १० फुट वाढावी म्हणून बांबुचा मांडव टाकणे सुरू आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे जिल्ह्यात कपाशी पिकांची पाहणी करीत आहे़ यात रामराम महाराजांची आदर्श शेती जिल्ह्यात प्रथम क्रमांकाची असल्याचे त्यांनी सांगितले. अंबोडा येथील प्रगतशील शेतकरी अमृत देशमुख यांनी प्रती क्विंटल ४८ क्विंटल कपाशीचे उत्पन्न घेतले. यावरून महाराजांनी आदर्श शेतीचा संकल्प केला होता, असे रामराम महाराज सांगतात़ प्रती एकर ५० क्विंटल उत्पन्न घेण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी अरुण बलसाने, तालुका कृषी अधिकारी विजय मेंढजोगे आष्टी, प्रमोद खेडकर आर्वी, व्ही.बी. महंत कारंजा यांच्यासह सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.(प्रतिनिधी)