शहरं
Join us  
Trending Stories
1
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
2
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
3
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
4
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
6
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
7
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
8
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
9
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
10
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
11
कोकोने पटकावले पहिले फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम
12
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
13
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
14
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
15
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
16
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
17
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
18
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
19
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
20
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा

२४ तासात जिल्ह्यात १२२ मिमी पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2020 05:00 IST

मागील काही दिवसांपासून दमदार पावसाची प्रतीक्षा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह नागरिकांना होती. अशातच शनिवारी रात्री जिल्ह्यातील आठही तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे अंकुरलेल्या सोयाबीन, कपाशी, तूर आदी पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे.

ठळक मुद्देसरासरी १५.३१ मिमी पाऊस : वर्ध्यात सर्वाधिक बरसला, उभ्या पिकांना नवसंजीवनी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मागील २४ तासांत वर्धा जिल्ह्यात १२२ मिमी पाऊस झाल्याची नोंद जिल्हा प्रशासनाने घेतली आहे. सर्वाधित पाऊस वर्धा तालुक्यात झाला असून जिल्ह्याच्या पर्जन्यमानाची सरासरी १५.३१ इतकी आहे.मागील काही दिवसांपासून दमदार पावसाची प्रतीक्षा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह नागरिकांना होती. अशातच शनिवारी रात्री जिल्ह्यातील आठही तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे अंकुरलेल्या सोयाबीन, कपाशी, तूर आदी पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. वर्धा तालुक्यात ३४.३५ मिमी, सेलू ३०.२० मिमी, देवळी ११.१६ मिमी, आर्वी ५.३३ मिमी, आष्टी (शहीद) ६.०० मिमी, कारंजा (घा.) १३.२५ मिमी, हिंगणघाट १५.१० मिमी तर समुद्रपूर तालुक्यात ७.१५ मिमी पाऊस झाल्याची नोंद घेण्यात आली आहे. मुसळधार पावसादरम्यान पावसाचे पाणी वर्धा शहरासह सिंदी (मेघे) येथील काही नागरिकांच्या घरात शिरले.मुसळधार पावसामुळे घर कोसळलेवर्धा : शहरातील सानेगुरूजी आर्वी नाका येथील मयुर चंद्रकांत सलामे यांचे घर शनिवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे जमिनदोस्त झाले. घरातील जीवनावश्यक वस्तूंची यात नासाडी झाल्याने त्यांचे ८० हजारांचे नुकसान झाले आहे. सर्वेक्षण करून तातडीने शासकीय मदत देण्यात यावी, अशी मागणी त्यांना तालुका प्रशासनाकडे केली आहे.शनिवारी रात्रीच्या सुमारास जिल्ह्यातील विविध भागात मुसळधार पाऊस झाला. याच पावसादरम्यान रोजमजुरी करून कुटुंबाचा गाढा ओढणाºया मयुर सलामे यांचे टिनाचे घर जमिनदोस्त झाले. शिवाय पावसाच्या पाण्याने घरातील फ्रिज, टिव्ही, कुलर, सिलिंग फॅन, टेबल फॅन, मिक्सर, टेलरिंगची मशीन, प्रेस, ट्युब लाईट, सेटॉपबॉक्स हे विद्युत उपकरणे भिजल्याने ते निकामी झाले. शिवाय घरातील धान्य व इतर जीवनावश्यक साहित्याची नासाडी झाल्याने त्यांचे सुमारे ८० हजाराचे नुकसान झाले आहे. पावसामुळे झोलेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करून तातडीने शासकीय मदत द्यावी, अशी मागणी तहसीलदारांना दिलेल्या तक्रारीतून मयुर सलामे यांनी केली आहे.

टॅग्स :Rainपाऊस