शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

प्रतिपूर्तीच्या १.२० कोटींचे वाटप

By admin | Updated: June 13, 2017 01:10 IST

‘राईट टू एज्यूकेशन’ कायद्यांतर्गत प्रत्येक प्राथमिक शाळेत २५ प्रवेश आरक्षित केले आहेत.

आरटीई अंतर्गत प्रवेश : तीन वर्षांतील थकबाकी मिळणार एकाच वेळीलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : ‘राईट टू एज्यूकेशन’ कायद्यांतर्गत प्रत्येक प्राथमिक शाळेत २५ प्रवेश आरक्षित केले आहेत. यापोटी शासनाकडून सदर शाळांना प्रतिपूर्ती केली जाते. २०१२ ते २०१५ पर्यंतची यातील काही रक्कम थकित होती. त्या रकमेचा मार्ग आता मोकळा झाला आहे. शिक्षण विभागाला यातील १ कोटी २० लाख ८४ हजार रुपये प्राप्त झाले आहेत. यात तीनही वर्षांची शिल्लक १ कोटी २० लाख २५ हजार ९९० रुपयांचे वाटप लवकरच इपीएसद्वारे करण्यात येणार आहे.शिक्षण विभागाने यापूर्वी २०१२-१३ व २०१३-१४ या दोन सत्रातील १४२ शाळांना २ हजार ५४ विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचे ७५ लाख २ हजार २३९ रुपये वितरित करण्यात आले होते. यातील उर्वरित रक्कम आता वितरित होणार ओह. शिवाय २०१४-१५ आणि २०१५-१६ च्या प्रतिपूर्तीची रक्कम शिल्लक होती. आता शिक्षण विभागाला यापोटी निधी मिळाल्याने थकित प्रतिपूर्तीच्या वाटपाचा मार्ग मोकळा झाला आहे. २०१४-१५ या सत्रात ९२ शाळांमध्ये २ हजार ६६५ विद्यार्थी प्रवेशित होते. २०१५-१६ मध्ये १०० शाळांमध्ये ३ हजार ६४४ विद्यार्थी तर २०१६-१७ मध्ये १२० शाळांमध्ये आरटीई २५ टक्के अंतर्गत ४ हजार १८२ विद्यार्थी प्रवेशित आहेत. २०१५-१६ या सत्रासाठी शिक्षण विभागाने शासनाकडे २ कोटी १८ लाख २८ हजार ५९६ रुपयांची मागणी केली होती. २०१६-१७ या सत्रासाठी ही मागणी २ कोटी ८५ लाख ५० हजार ९८४ रुपये एवढी आहे. शिक्षण विभागाला २०१६-१७ या सत्रासाठी तुर्तास ७० लाख ६३ हजार रुपये प्राप्त झाले आहेत. तीन वर्षांची थकित रक्कम वितरित केल्यानंतर ५८ हजार १०० रुपये शिल्लक राहणार आहे. या शिल्लक व प्राप्त रकमेतून २०१५-१६ सत्रातील प्रत्येक शाळेला १०.७४ टक्के रकमेचे वाटप केले जाणार आहे. प्रतिपूर्तीची रक्कम शासनाकडून मिळत नसल्याने जिल्ह्यातील अनेक शाळा आरटीई अंतर्गत राखीव प्रवेश देण्यास टाळाटाळ करीत होती. यामुळे उपशिक्षणाधिकारी हजारे यांनी पाठपुरावा करीत ही रक्कम प्राप्त करून घेतली आहे. आता थकित रकमेचे वाटप होणार असल्याने शाळांनाही दिलासा मिळणार आहे. यंदा १३६८ विद्यार्थ्यांचे प्रवेशआरटीई कायद्यांतर्गत २०१७-१८ या सत्रासाठी जिल्ह्यातील पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळांमध्ये २५ टक्के राखीव जागांवर १३६८ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. यासाठी आलेल्या अर्जांतून २३४७ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. शिक्षण विभागाकडे २५ टक्के प्रमाणे १५६८ जागा आहेत. प्रवेशाच्या सात फेऱ्या आटोपल्या असून आणखी १९९ जागा शिक्षण विभागाकडे शिल्लक आहेत. या जागांवरही प्रवेश प्रक्रिया सुरू असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे.