शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
4
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
5
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
6
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
7
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
8
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
9
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
10
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
11
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
12
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
13
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
14
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
15
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
16
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
17
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
18
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
19
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
20
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले

प्रतिपूर्तीच्या १.२० कोटींचे वाटप

By admin | Updated: June 13, 2017 01:10 IST

‘राईट टू एज्यूकेशन’ कायद्यांतर्गत प्रत्येक प्राथमिक शाळेत २५ प्रवेश आरक्षित केले आहेत.

आरटीई अंतर्गत प्रवेश : तीन वर्षांतील थकबाकी मिळणार एकाच वेळीलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : ‘राईट टू एज्यूकेशन’ कायद्यांतर्गत प्रत्येक प्राथमिक शाळेत २५ प्रवेश आरक्षित केले आहेत. यापोटी शासनाकडून सदर शाळांना प्रतिपूर्ती केली जाते. २०१२ ते २०१५ पर्यंतची यातील काही रक्कम थकित होती. त्या रकमेचा मार्ग आता मोकळा झाला आहे. शिक्षण विभागाला यातील १ कोटी २० लाख ८४ हजार रुपये प्राप्त झाले आहेत. यात तीनही वर्षांची शिल्लक १ कोटी २० लाख २५ हजार ९९० रुपयांचे वाटप लवकरच इपीएसद्वारे करण्यात येणार आहे.शिक्षण विभागाने यापूर्वी २०१२-१३ व २०१३-१४ या दोन सत्रातील १४२ शाळांना २ हजार ५४ विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचे ७५ लाख २ हजार २३९ रुपये वितरित करण्यात आले होते. यातील उर्वरित रक्कम आता वितरित होणार ओह. शिवाय २०१४-१५ आणि २०१५-१६ च्या प्रतिपूर्तीची रक्कम शिल्लक होती. आता शिक्षण विभागाला यापोटी निधी मिळाल्याने थकित प्रतिपूर्तीच्या वाटपाचा मार्ग मोकळा झाला आहे. २०१४-१५ या सत्रात ९२ शाळांमध्ये २ हजार ६६५ विद्यार्थी प्रवेशित होते. २०१५-१६ मध्ये १०० शाळांमध्ये ३ हजार ६४४ विद्यार्थी तर २०१६-१७ मध्ये १२० शाळांमध्ये आरटीई २५ टक्के अंतर्गत ४ हजार १८२ विद्यार्थी प्रवेशित आहेत. २०१५-१६ या सत्रासाठी शिक्षण विभागाने शासनाकडे २ कोटी १८ लाख २८ हजार ५९६ रुपयांची मागणी केली होती. २०१६-१७ या सत्रासाठी ही मागणी २ कोटी ८५ लाख ५० हजार ९८४ रुपये एवढी आहे. शिक्षण विभागाला २०१६-१७ या सत्रासाठी तुर्तास ७० लाख ६३ हजार रुपये प्राप्त झाले आहेत. तीन वर्षांची थकित रक्कम वितरित केल्यानंतर ५८ हजार १०० रुपये शिल्लक राहणार आहे. या शिल्लक व प्राप्त रकमेतून २०१५-१६ सत्रातील प्रत्येक शाळेला १०.७४ टक्के रकमेचे वाटप केले जाणार आहे. प्रतिपूर्तीची रक्कम शासनाकडून मिळत नसल्याने जिल्ह्यातील अनेक शाळा आरटीई अंतर्गत राखीव प्रवेश देण्यास टाळाटाळ करीत होती. यामुळे उपशिक्षणाधिकारी हजारे यांनी पाठपुरावा करीत ही रक्कम प्राप्त करून घेतली आहे. आता थकित रकमेचे वाटप होणार असल्याने शाळांनाही दिलासा मिळणार आहे. यंदा १३६८ विद्यार्थ्यांचे प्रवेशआरटीई कायद्यांतर्गत २०१७-१८ या सत्रासाठी जिल्ह्यातील पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळांमध्ये २५ टक्के राखीव जागांवर १३६८ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. यासाठी आलेल्या अर्जांतून २३४७ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. शिक्षण विभागाकडे २५ टक्के प्रमाणे १५६८ जागा आहेत. प्रवेशाच्या सात फेऱ्या आटोपल्या असून आणखी १९९ जागा शिक्षण विभागाकडे शिल्लक आहेत. या जागांवरही प्रवेश प्रक्रिया सुरू असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे.