शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
3
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
4
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
5
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
6
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
7
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
8
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
9
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
10
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
11
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
12
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
13
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
14
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
15
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
16
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
17
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
18
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
19
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
20
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं

१०८ जणांनी मुंडण करून अर्पण केली श्रद्धांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2018 11:55 PM

गेल्या ४० वर्षांपासून साहुर गावातील राजकारण चालविणारे दिवंगत भाजपा नेते रमेश वरकड यांचे ब्रेन हॅमरेजच्या आजाराने निधन झाले. त्यांचा दशक्रिया विधी करताना त्यांच्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या तब्बल १०८ जणांनी मुंडण करून त्यांना आदरांजली अर्पण केली.

ठळक मुद्देसाहूर परिसरात शोककळा : रमेश वरकडे यांचा दशक्रिया विधी

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (शहीद) : गेल्या ४० वर्षांपासून साहुर गावातील राजकारण चालविणारे दिवंगत भाजपा नेते रमेश वरकड यांचे ब्रेन हॅमरेजच्या आजाराने निधन झाले. त्यांचा दशक्रिया विधी करताना त्यांच्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या तब्बल १०८ जणांनी मुंडण करून त्यांना आदरांजली अर्पण केली. यावेळी प्रत्येकाला आपले अश्रू अनावर झाले होते.रमेश वरकड हे मितभाषी व सर्वांना घेऊन चालणारे होते. आंतरजातीय विवाहाला त्यांनी भरपूर प्रोत्साहन दिले. स्वत: जीवनसाथी निवडताना बौद्ध समाजातील मुलीला पसंती दर्शविली. त्यांच्या मुलीचा विवाह ख्रिश्चन धर्माच्या मुलाशी लावून दिला. त्यानंतर त्यांच्या पत्नीने ख्रिश्चन धर्मात प्रवेश केला. एवढ्या मोठ्या मनाचा दिलदार माणून आज सर्वांतून अचानक ५८ व्या वर्षी निघून गेल्याने साहुर गावकरी जणू हवालदिल झाले आहेत. त्यांचे कार्य इतरांसाठी प्रेरणा देणाराच आहे. रमेश वरकड यांचे कुटुंब यवतमाळ येथे वास्तव्यास आहे; पण त्यांनी आपले जीवन साहुर गावाला समर्पित केले होते. १५ वर्ष सरपंच, १० वर्ष जि.प. सदस्य, पं.स. उपसभापती अशा पदांची जबाबदारी सांभाळून त्यांनी राजकीय क्षेत्रात आपला वेगळाच ठसा उमटविला होता. गेल्या ८ वेळा म्हणजे ४० वर्षे त्यांनी ग्रा.पं.वर एकहाती सत्ता मिळविली. सरपंच कोणीही असो; पण काम रमेश वरकड यांची संमती असेलच तरच होणार आणि तेही फक्त लोकाभिमुख असेच चित्र येथे बघावयास मिळत होते. कुणाच्या सांगण्याने व विश्वास ठेवून त्यांनी कधीही राजकारणात डाव मांडला नाही. मध्यंतरी महिला आरक्षण निघाल्याने त्यांच्या सुनेला तिकीट देवून जि.प. सदस्य बनविले. मात्र, राजकारणाची सुत्र रमेश वरकड यांच्याकडे ठेवण्यात यावी असाच कुटुंबाचाही आग्रह त्यांनी पूर्ण केला. साहुर प्राथमिक आरोग्य केंद्राला जागतिक स्तरावर पुरस्कार प्राप्त करून देण्यात रमेश वरकड यांचा मोठा हात भार होता. कारण सुमारे एक कोटी रुपये एवढा मोठा निधी जि.प. मधून क्रमाक्रमाने आणत संबंध विकासकामे पूर्ण केली. मशीनयंत्र सुविधा, आरोग्य सुविधा यामध्ये त्यांनी मोठ्या शिताफीने तत्परता ठेवली होती. ग्रा.पं. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान रमेश वरकडे हे भोवळ येऊन पडले. तेथे २२ दिवस त्यांच्यावर उपचार करण्यात आले. पण त्यांचे प्राण वाचविण्यात डॉक्टरांना यश आले नाही. रुग्णालयात असताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, उर्जामंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांच्यासह भाजपाच्या काही बड्या नेत्यांनी त्यांची भेट घेतली. साहुर येथील मंजुळा नदीच्या पात्रातील उत्तरवाहिनीमध्ये मानव जोडो संगठनचे प्रणेते रमेश सरोदे यांच्यावतीने ग्रामगीता वाचन करण्यात आले. त्यानंतर १०८ जणांनी मुंडण करून दशक्रिया विधी पार पाडला.