शहरं
Join us  
Trending Stories
1
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
4
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
5
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
6
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
7
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
8
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
9
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
10
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
11
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
12
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
13
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
14
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
15
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
16
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
17
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
18
"अजित पवारांनी सांभाळून राहावं, त्यांना बळ देऊ नये"; मनोज जरांगे भडकले, धनंजय मुंडेंबद्दल काय बोलले?
19
दिल्ली ब्लास्ट : 'अल-फलाह'चा नेमका अर्थ काय? युनिव्हर्सिटीचा फाउंडर कोण? सुनावली गेलीये तीन वर्षांची शिक्षा!
20
दिल्ली स्फोट प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; उत्तर प्रदेशातील हापुडमधून डॉ. फारुक ताब्यात...
Daily Top 2Weekly Top 5

वर्धा जिल्ह्यात १४ महिन्यांत १०८ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2019 13:34 IST

नापिकी, कर्जाचे ओझे, परतीच्या पावसाचा तडाखा आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करताना होणारी दमछाक शेतकऱ्यांच्या जिवावर उठली आहे. मागील १४ महिन्यांत जिल्ह्यातील १०८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे प्रशासकीय आकडेवारीच सांगते.

ठळक मुद्देकेवळ ७१ कुटुंबांना मिळेल शासनाकडून तोकडी आर्थिक मदत

सुहास घनोकार।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : नापिकी, कर्जाचे ओझे, परतीच्या पावसाचा तडाखा आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करताना होणारी दमछाक शेतकऱ्यांच्या जिवावर उठली आहे. मागील १४ महिन्यांत जिल्ह्यातील १०८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे प्रशासकीय आकडेवारीच सांगते. निसर्ग आणि सरकारच्या उदासीनतेमुळे शेतकऱ्यांनी आत्महत्येचा निवडलेला मार्ग संवेदनशील मनांना हादरवून सोडणारा आहे.जानेवारी २०१८ ते फेब्रुवारी २०१९ या १४ महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यातील १०८ शेतकऱ्यांनी सर्व दारे बंद झाल्याने खचून जात मृत्यूला कवटाळले. यापैकी केवळ ७१ शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना शासनाची मदत मिळणार आहे. शासनाच्या तोकड्या मदतीमध्ये आत्महत्याग्रस्त कुटुंब उभे राहू शकत नाही; पण शासनाच्या मदतीचे, उपाययोजनांचे आणि पॅकेजचे निकष हे शेतकऱ्याच्या जिवंतपणी लागू होत नसल्याची दारुण अवस्थाच या क्षेत्रातील जाणत्यांना अधिक वेदना देऊन जाते. शेतकरी आत्महत्यांची ३१ प्रकरणे प्रशासनाच्या सहभागासह गठित करण्यात आलेल्या समितीने अपात्र ठरविली आहेत. सहा प्रकरणे पुन्हा चौकशीकरिता विचाराधीन ठेवण्यात आली आहेत.जानेवारी २०१८ मध्ये १२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. फेब्रुवारी महिन्यात ८, मार्च महिन्यात ८, एप्रिल १५, मे १०, जून ५, जुलै ६, आॅगस्ट ७, सप्टेंबर ८, आॅक्टोबर ९, नोव्हेंबर १३, डिसेंबर ४ तर यावर्षीच्या जानेवारी महिन्यांत २ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. फेब्रुवारीत एका शेतकऱ्याने मृत्यूला कवटाळले.आत्महत्येच्या या आकडेवारीकडे बारकाईने पाहिले असता शेतकऱ्यांनी हंगामाच्या प्रारंभी आणि हंगामाच्या अखेरीस अधिक आत्महत्या केल्याचे स्पष्ट होते. अनेक तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांना दुबार-तिबार पेरणीला सामोरे जावे लागले. तरीही पेरणी न साधण्याचे संकट ओढवले. कपाशीवर बोंडअळीने हल्ला चढविला. अशा अनेक संकटांचा शेतकऱ्यांना सामना करावा लागला आहे.

मागील १८ वर्षांत १,६६१ शेतकरी आत्महत्या२००१ ते २०१८ या १८ वर्षांत तब्बल १,६६१ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले. मात्र, आत्महत्येची निम्मीच ८८२ प्रकरणे पात्र ठरली. ७७३ प्रकरणे शासनाच्या समितीने अपात्र ठरविलीत.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्या