शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

5,016 करदात्या शेतकऱ्यांकडून वसूल झाली 1 कोटी 36 हजारांची रक्कम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 05:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : गरजू शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी या हेतूने शासनाने पंतप्रधान किसान सन्मान योजना कार्यान्वित केली. ...

ठळक मुद्देपंतप्रधान किसान सन्मान योजनेचा बेकायदा मिळाला होता लाभ

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : गरजू शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी या हेतूने शासनाने पंतप्रधान किसान सन्मान योजना कार्यान्वित केली. या योजनेचा जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना लाभही मिळाला. पण त्यापैकी तब्बल १६ हजार ८८० शेतकरी करदाते असल्याचे पुढे येताच जिल्ह्यात धडक मोहीम राबवून शासकीय निधी परत गोळा करण्याचे काम जिल्हा प्रशासनाने हाती घेतले आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ५ हजार १६ करदात्या शेतकऱ्यांकडून १ कोटी ३६ हजारांची रक्कम वसूल करण्यात आली आहे. तर उर्वरित शेतकऱ्यांकडून शासकीय योजनेची ही रक्कम वसूल करण्याचे काम गाव पातळीवर तहसीलदारांच्या माध्यमातून केले जात आहे.पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा लाभ मिळालेले तसेच करदाते शेतकरी याची शहानिशा जिल्हा प्रशासनाने केली असता तब्बल १६ हजार ८८० शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेची रक्कम वळती झाल्याचे पुढे आले. त्यानंतर शासनाच्या मार्गदर्शक सूचनांना केंद्रस्थानी ठेवून जिल्ह्यात विशेष मोहीम राबविली जात आहे. तालुका स्तरावर या मोहिमेचे नेतृत्व तालुका न्यायदंडाधिकारी तसेच तहसीलदार करीत असून आतापर्यंत ५ हजार १६ करदात्या शेतकऱ्यांकडून १ कोटी ३६ हजारांची रक्कम वसूल करण्यात आली आहे. तर पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा बेकायदा लाभ मिळालेल्या उर्वरित करदात्या शेतकऱ्यांकडून शासकीय निधी कसा परत मिळविता येईल यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न होत आहेत. या मोहिमेत कारंजा तालुका पुढे असून वर्धा तालुक्यात केवळ ३.६२ टक्केच काम झाल्याचे सांगण्यात आले. विशेष म्हणजे वाढता कोविड संसर्गामुळे काही प्रमाणात या मोहिमेला ब्रेक लागला आहे. पण त्यावरही वेळीच मात करून नोटीस बजावण्यात आलेल्या व पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा बेकायदा लाभ घेतलेल्या प्रत्येक शेतकऱ्याकडून वेळीच शासकीय निधी कसा परत मिळेल यासाठी प्रयत्न होणार असल्याचे सांगण्यात आले. 

जूनच्या आत करावे लागणार पैसे परततब्बल दहा हजारांहून अधिक करदात्या शेतकऱ्यांकडून अजूनही शासकीय निधी वसूल करणे शिल्लक आहे. पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा बेकायदा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना नोटीस बजावण्यात आल्या आहे. नोटीसची दखल घेत आतापर्यंत ५ हजार १६ शेतकऱ्यांनी १ कोटी ३६ हजारांची रक्कम परत केली आहे. पण अजूनही अनेक शेतकऱ्यांकडे शासकीय निधी थकला आहे. जून महिन्याच्या अखेरपर्यंत शासकीय निधीची रक्कम परत न केल्यास बेकायदा पंतप्रधान किसान सन्मान याेजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांवर कायदेशीर कार्यवाही होणार असल्याचे सांगण्यात आले.

इतर कारणांनी ९९४ शेतकऱ्यांना ठरविले अपात्रहवालदिल शेतकऱ्यांना दिलासा मिळावा म्हणून शासनाने पंतप्रधान किसान सन्मान योजना कार्यान्वित करून त्यांची अंमलबजावणी करण्यास सुरूवात केली. पण इतर कारणांनी ९९४ शेतकऱ्यांना योजनेच्या लाभासाठी अपात्र ठरविण्यात आले आहे.

माझे घोराड येथे शेत आहे. पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या लाभासाठी कुठलाही अर्ज न करता बँक खात्यात थेट रक्कम जमा करण्यात आली होती. आपण आयकर भरणारे असल्याने सदर रक्कम तलाठ्याकडे दिली आहे. त्याची पावतीही मला देण्यात आली आहे.- सुरज वरडकर, शेतकरी, घोराड.

मी शेतकरी आणि शिक्षक आहे. माझ्या खात्यावर तीन टप्प्यात सहा हजार रुपये जमा झाले. मी आयकर भरतो. त्यामुळे प्रशासनाने पैसे परत करण्यासंदर्भात नोटीस पाठविली होती. आपण तलाठ्याकडे पैसे परत करीत पावती केली. पण आता पुन्हा दोन हजार रुपये बँक खात्यात आले आहे. हा घोळ थांबविण्याची गरज आहे.- प्रशांत येळणे, शेतकरी, सिंदी (रेल्वे). 

आतापर्यंत नियमितपणे प्रत्येक टप्प्याचे दोन हजार रुपये जमा झाले. १४ मे रोजी घोषणा होऊनही बँक खात्यात पैसे जमा झालेले नाही. पीएम किसान योजनेच्या लाभापासून आम्ही वंचित राहिलो आहे. तहसील कार्यालयात चौकशी केली असता कृषी विभागाकडे विचारणा करा असे सांगण्यात आले. तर कृषी विभागाने तहसीलमध्येच विचारणा करा असे सांगितल्याने अडचणीत भर पडली आहे.- वसंत सिरसे, शेतकरी, सिंदी (रेल्वे). 

 

टॅग्स :PM Kisan Schemeप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाFarmerशेतकरी