शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

अयोध्येतील पराभवाचा वचपा काढण्यासाठी योगींनी कसली कंबर, आखली खास रणनीती  

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2024 17:44 IST

Uttar Pradesh Assembly By Election 2024: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही मिल्कीपूरमध्ये होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी कंबर कसली असून, येथे विजय मिळवण्यासाठी खास रणनीती आखली आहे. 

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपालाउत्तर प्रदेशमध्ये दारुण पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यात रामजन्मभूमी असलेल्या अयोध्येचा समावेश असलेल्या फैजाबाद लोकसभा मतदारसंघामध्येही भाजपाला पराभूत व्हावे लागले होते. अयोध्येत भाजपाच्या झालेल्या या पराभवामुळे विरोधकांच्या हाती मोठा मुद्दा लागला आहे. तर हा पराभव  राम मंदिर आंलोदनात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या भाजपाच्या जिव्हारी लागला होता. त्यामुळे आता या पराभवाचा वचपा काढण्याची संधी भाजपा शोधत असून, फैजाबाद लोकसभा मतदारसंघातील मिल्कीपूर विधानसभा मतदारसंघात होणाऱ्या पोटनिवडणुकीत विजय मिळवून अयोध्येतील पराभवाची भरपाई करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही मिल्कीपूरमध्ये होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी कंबर कसली असून, येथे विजय मिळवण्यासाठी खास रणनीती आखली आहे. 

लोकसभा निवडणुकीत फैजाबाद लोकसभा मतदारसंघात झालेल्या निवडणुकीत भाजपाच्या ललन सिंह यांचा पराभव करून समाजवादी पार्टीचे अवधेश प्रसाद हे विजयी झाले होते. तत्पूर्वी अवधेश प्रसाद हे मिल्कीपूर विधानसभा मतदारसंघातील आमदार होते. लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर त्यांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे रिक्त झालेल्या मिल्कीपूर विधानसभा मतदारसंघातील जागेवर लवकरच पोटनिवडणूक होणार आहे.  

उत्तर प्रदेश विधानसभेच्या दहा जागांसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीच्या तयारीसाठी भाजपाकडून बैठकांवर बैठका घेण्यास सुरुवात केली आहे. त्यात मिल्कीपूर विधानसभा मतदारसंघावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आलं आहे. राज्य सरकारमधील चार मंत्री अयोध्येत दाखल झाले आहेत. कृषिमंत्री सूर्य प्रताप शाही, संसदीय कार्यमंत्री मयंकेश्वर शरण सिंह, अन्न आणि पुरवठा मंत्री सतीष शर्मा आणि क्रीडामंत्री गिरीश यादव अयोध्येत दाखल झाले आहेत. माजी खासदार लल्लू सिंह यांच्याशी चारही मंत्र्यांनी चर्चा केली आहे.

दरम्यान, कृषिमंत्री सूर्यप्रताप शाही यांनी सांगितलं की, अयोध्येमध्ये झालेला पराभव दु:खद आहे. तसेच त्यामुळे भाजपाला धक्का बसला आहे. आमच्यामध्ये ज्या त्रुटी राहिल्या होत्या, त्या दुरुस्त करण्याचा प्रयत्न करत आहोत. विरोधी पक्षांनी जनतेची दिशाभूल केली. घटना बदलली जाईल, अशी अफवा पसरवली. मात्र खरंतर काँग्रेसने १९७५ मध्ये आणीबाणी लावली होती. आमच्या कुटुंबातील तीन सदस्य तुरुंगात गेले होते. हा देश काँग्रेसला कधी माफ करणार नाही, असा टोलाही सूर्य प्रताप शाही यांनी लगावला.  

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशyogi adityanathयोगी आदित्यनाथElectionनिवडणूक 2024BJPभाजपाINDIA Opposition Allianceइंडिया आघाडी