शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
2
Ahmedabad Plane Crash Live Updates : भीषण! अहमदाबादमध्ये मोठी दुर्घटना, Air India चं विमान कोसळलं, होते २४२ प्रवासी
3
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
4
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
5
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
6
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?
7
एअर इंडिया विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे ट्विट; आपत्कालीन सेंटर, मदत पथकाची स्थापना
8
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
9
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
10
Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..."
11
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?
12
Ahmedabad Plane Crash: "ज्यांनी जीव गमावला, त्यांना.."; अहमदाबाद विमान दुर्घटनेमुळे कलाकारांनी व्यक्त केली हळहळ
13
"सगळं तिनेच केलं, मी नकार दिलेला अन्..."; पोलिसांनी मुसक्या आवळताच सोनमच्या बॉयफ्रेंडची पलटी! 
14
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीला उपासाबरोबरच 'ही' उपासना कराल, तर होईल अधिक लाभ!
15
चांदीचा दर १ लाख ९ हजारांवर, सोनंही लाखांच्या पार; पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
16
Ahmedabad Plane Crash: विमानाची राखरांगोळी, इमारतीचा भाग कोसळला, वाहनांचे सांगाडे; अहमदाबाद दुर्घटनेची भयावह दृश्यं...
17
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
18
Ahmedabad Plane Crash : 242 प्रवासी, 1:17 ला टेकऑफ अन् 1:20 ला क्रॅश...विमान अपघाताचे ताजे अपडेट
19
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
20
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीवितहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?

अयोध्येतील पराभवाचा वचपा काढण्यासाठी योगींनी कसली कंबर, आखली खास रणनीती  

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2024 17:44 IST

Uttar Pradesh Assembly By Election 2024: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही मिल्कीपूरमध्ये होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी कंबर कसली असून, येथे विजय मिळवण्यासाठी खास रणनीती आखली आहे. 

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपालाउत्तर प्रदेशमध्ये दारुण पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यात रामजन्मभूमी असलेल्या अयोध्येचा समावेश असलेल्या फैजाबाद लोकसभा मतदारसंघामध्येही भाजपाला पराभूत व्हावे लागले होते. अयोध्येत भाजपाच्या झालेल्या या पराभवामुळे विरोधकांच्या हाती मोठा मुद्दा लागला आहे. तर हा पराभव  राम मंदिर आंलोदनात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या भाजपाच्या जिव्हारी लागला होता. त्यामुळे आता या पराभवाचा वचपा काढण्याची संधी भाजपा शोधत असून, फैजाबाद लोकसभा मतदारसंघातील मिल्कीपूर विधानसभा मतदारसंघात होणाऱ्या पोटनिवडणुकीत विजय मिळवून अयोध्येतील पराभवाची भरपाई करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही मिल्कीपूरमध्ये होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी कंबर कसली असून, येथे विजय मिळवण्यासाठी खास रणनीती आखली आहे. 

लोकसभा निवडणुकीत फैजाबाद लोकसभा मतदारसंघात झालेल्या निवडणुकीत भाजपाच्या ललन सिंह यांचा पराभव करून समाजवादी पार्टीचे अवधेश प्रसाद हे विजयी झाले होते. तत्पूर्वी अवधेश प्रसाद हे मिल्कीपूर विधानसभा मतदारसंघातील आमदार होते. लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर त्यांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे रिक्त झालेल्या मिल्कीपूर विधानसभा मतदारसंघातील जागेवर लवकरच पोटनिवडणूक होणार आहे.  

उत्तर प्रदेश विधानसभेच्या दहा जागांसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीच्या तयारीसाठी भाजपाकडून बैठकांवर बैठका घेण्यास सुरुवात केली आहे. त्यात मिल्कीपूर विधानसभा मतदारसंघावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आलं आहे. राज्य सरकारमधील चार मंत्री अयोध्येत दाखल झाले आहेत. कृषिमंत्री सूर्य प्रताप शाही, संसदीय कार्यमंत्री मयंकेश्वर शरण सिंह, अन्न आणि पुरवठा मंत्री सतीष शर्मा आणि क्रीडामंत्री गिरीश यादव अयोध्येत दाखल झाले आहेत. माजी खासदार लल्लू सिंह यांच्याशी चारही मंत्र्यांनी चर्चा केली आहे.

दरम्यान, कृषिमंत्री सूर्यप्रताप शाही यांनी सांगितलं की, अयोध्येमध्ये झालेला पराभव दु:खद आहे. तसेच त्यामुळे भाजपाला धक्का बसला आहे. आमच्यामध्ये ज्या त्रुटी राहिल्या होत्या, त्या दुरुस्त करण्याचा प्रयत्न करत आहोत. विरोधी पक्षांनी जनतेची दिशाभूल केली. घटना बदलली जाईल, अशी अफवा पसरवली. मात्र खरंतर काँग्रेसने १९७५ मध्ये आणीबाणी लावली होती. आमच्या कुटुंबातील तीन सदस्य तुरुंगात गेले होते. हा देश काँग्रेसला कधी माफ करणार नाही, असा टोलाही सूर्य प्रताप शाही यांनी लगावला.  

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशyogi adityanathयोगी आदित्यनाथElectionनिवडणूक 2024BJPभाजपाINDIA Opposition Allianceइंडिया आघाडी