शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

अयोध्येतील पराभवाचा वचपा काढण्यासाठी योगींनी कसली कंबर, आखली खास रणनीती  

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2024 17:44 IST

Uttar Pradesh Assembly By Election 2024: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही मिल्कीपूरमध्ये होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी कंबर कसली असून, येथे विजय मिळवण्यासाठी खास रणनीती आखली आहे. 

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपालाउत्तर प्रदेशमध्ये दारुण पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यात रामजन्मभूमी असलेल्या अयोध्येचा समावेश असलेल्या फैजाबाद लोकसभा मतदारसंघामध्येही भाजपाला पराभूत व्हावे लागले होते. अयोध्येत भाजपाच्या झालेल्या या पराभवामुळे विरोधकांच्या हाती मोठा मुद्दा लागला आहे. तर हा पराभव  राम मंदिर आंलोदनात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या भाजपाच्या जिव्हारी लागला होता. त्यामुळे आता या पराभवाचा वचपा काढण्याची संधी भाजपा शोधत असून, फैजाबाद लोकसभा मतदारसंघातील मिल्कीपूर विधानसभा मतदारसंघात होणाऱ्या पोटनिवडणुकीत विजय मिळवून अयोध्येतील पराभवाची भरपाई करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही मिल्कीपूरमध्ये होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी कंबर कसली असून, येथे विजय मिळवण्यासाठी खास रणनीती आखली आहे. 

लोकसभा निवडणुकीत फैजाबाद लोकसभा मतदारसंघात झालेल्या निवडणुकीत भाजपाच्या ललन सिंह यांचा पराभव करून समाजवादी पार्टीचे अवधेश प्रसाद हे विजयी झाले होते. तत्पूर्वी अवधेश प्रसाद हे मिल्कीपूर विधानसभा मतदारसंघातील आमदार होते. लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर त्यांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे रिक्त झालेल्या मिल्कीपूर विधानसभा मतदारसंघातील जागेवर लवकरच पोटनिवडणूक होणार आहे.  

उत्तर प्रदेश विधानसभेच्या दहा जागांसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीच्या तयारीसाठी भाजपाकडून बैठकांवर बैठका घेण्यास सुरुवात केली आहे. त्यात मिल्कीपूर विधानसभा मतदारसंघावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आलं आहे. राज्य सरकारमधील चार मंत्री अयोध्येत दाखल झाले आहेत. कृषिमंत्री सूर्य प्रताप शाही, संसदीय कार्यमंत्री मयंकेश्वर शरण सिंह, अन्न आणि पुरवठा मंत्री सतीष शर्मा आणि क्रीडामंत्री गिरीश यादव अयोध्येत दाखल झाले आहेत. माजी खासदार लल्लू सिंह यांच्याशी चारही मंत्र्यांनी चर्चा केली आहे.

दरम्यान, कृषिमंत्री सूर्यप्रताप शाही यांनी सांगितलं की, अयोध्येमध्ये झालेला पराभव दु:खद आहे. तसेच त्यामुळे भाजपाला धक्का बसला आहे. आमच्यामध्ये ज्या त्रुटी राहिल्या होत्या, त्या दुरुस्त करण्याचा प्रयत्न करत आहोत. विरोधी पक्षांनी जनतेची दिशाभूल केली. घटना बदलली जाईल, अशी अफवा पसरवली. मात्र खरंतर काँग्रेसने १९७५ मध्ये आणीबाणी लावली होती. आमच्या कुटुंबातील तीन सदस्य तुरुंगात गेले होते. हा देश काँग्रेसला कधी माफ करणार नाही, असा टोलाही सूर्य प्रताप शाही यांनी लगावला.  

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशyogi adityanathयोगी आदित्यनाथElectionनिवडणूक 2024BJPभाजपाINDIA Opposition Allianceइंडिया आघाडी