शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली; दोन-दोन टोयोटा फॉर्च्युनर पुरात बुडाल्या...
2
सुनेत्रा अजित पवार यांचे NCP कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाल्या, “अतिवृष्टी हातात नाही, पण...”
3
अभूतपूर्व परिस्थितीत तातडीच्या मदतीसह कायमस्वरुपी मदतीची गरज; अन्यथा शेती मोठ्या समस्येत - शरद पवार
4
PM मेलोनींच्या इटलीमध्ये हजारो आंदोलक रस्त्यावर, बस-रेल्वे गाड्यांची तोडफोड; 60 पोलीस जखमी
5
पेनी स्टॉक बनला मल्टीबॅगर, एका वर्षात केलं मालामाल; १ लाखांचे झाले ६८ लाखांपेक्षा अधिक
6
Accident Video: दोन बाईकचा थरकाप उडवणारा अपघात; हवेत उडाले, नंतर फूट दूर जाऊन पडले
7
फक्त डेटा डिलिट करणं पुरेसं नाही! जुना फोन विकण्यापूर्वी 'या' ५ सीक्रेट गोष्टी करायलाच हव्यात
8
"पाकिस्तानचे तुकडे तुकडे होतील, बॉम्बहल्ला ही तर सुरुवात..."; इस्लामाबादच्या शत्रूचा इशारा
9
Navratri 2025: वडापावची क्रेव्हिंग होतेय? झटपट करा 'हा' उपासाचा कुरकुरीत बटाटेवडा
10
काय सांगता? स्लिम होण्याचा ट्रेंड जीवघेणा; बारीक लोकांमध्ये अकाली मृत्यूचा धोका तिप्पट
11
नाना पाटेकर सरसावले, 'ऑपरेशन सिंदूर'नंतर Pakच्या गोळीबारात बाधित झालेल्या कुटुंबांना ४२ लाखांची मदत
12
जीएसटीने आणखी अवघड केले...! पार्ले-जी बिस्कीट पुडा ५ रुपयांचा आता ४.४५ ला, १ रुपयाचे चॉकलेट ८८ पैशांना...
13
Gold Silver Price Today: आजही सोन्या-चांदीचे भाव नव्या विक्रमी पातळीवर; सोन्याच्या दरात प्रति तोळा ₹१,३४३ तर चांदी ₹१,१८१ ने महागली
14
Mumbai Local: एसी लोकलच्या टपावर चढला तरूण; क्षणात होत्याचं नव्हत झालं; दिवा स्थानकावरील घटना!
15
...म्हणून डोंबिवलीत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याला भाजपाच्या कार्यकर्त्यांनी नेसवली साडी, व्हिडीओ व्हायरल
16
नवरात्री २०२५: वातीभोवती काजळी धरली? १ सोपा उपाय; वात नीट राहील अन् दिवा अजिबात विझणार नाही
17
"निरपराध लोकांची काय चूक होती? आम्ही निषेध करणार"; हवाई हल्ल्यात ३० जणांचा मृत्यू, पाकिस्तानमधील जनता संतापली
18
GST कपातीनंतर सरकारची आणखी एक गुड न्यूज! २५ लाख महिलांना मिळणार मोफत गॅस कनेक्शन
19
ओला दुष्काळ जाहीर करणार का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'त्याकरिता जेवढ्या पद्धतीची..."
20
"...ही चांगली गोष्ट नाही!"; राहुल गांधी यांच्या 'मत चोरी' संदर्भातील आरोपांवरून शरद पवार यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?

रामलल्लाच्या मूर्तीचा ‘कर्मकुटी’त १६ पासून पूजनसोहळा; प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी पार पडणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2024 12:09 IST

अधिवास, जलाधिवास, गंधाधिवास, पुष्प, रत्न अधिवास विधी

त्रिगुण नारायण तिवारी, लोकमत न्यूज नेटवर्क, अयोध्या: रामलल्लाची मूर्ती तयार करण्यात आलेल्या ‘कर्मकुटी’ या ठिकाणी १६ जानेवारीला त्या मूर्तीच्या पूजनास प्रारंभ होणार आहे. त्यानंतर मूर्तीच्या शिल्पकारांचे प्रायश्चित पूजन होईल, अशी  माहिती विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय प्रवक्ता व धर्माचार्य संपर्कप्रमुख अशोक तिवारी यांनी दिली. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी १६ ते २२ जानेवारीदरम्यान चतुर्वेद यज्ञ पार पडणार आहे. २२ जानेवारीला रामलल्लाच्या पुतळ्यावरील पट्टी काढून  आरसा दाखविला जाईल.

१७ जानेवारीला गर्भगृह शुद्धीकरण विधी, १८ जानेवारीला अधिवास, जलाधिवास, गंधाधिवास, १९ रोजी पुष्प व रत्न अधिवास, औषधी व शय्या अधिवास विधी होणार आहे.

मूर्तीची मिरवणूक मंदिर परिसरातच रामलल्लाच्या मूर्तीची संपूर्ण अयोध्यानगरीत व शरयू नदीच्या किनारी मिरवणूक काढली जाईल, असे श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने ठरविले होते. मात्र, सध्या या शहरात भाविक मोठ्या संख्येने येत असल्याने ट्रस्टने आपल्या निर्णयात बदल केला आहे. सुरक्षेच्या दृष्टीने शहरातून मिरवणूक काढणे योग्य नसल्याचे गुप्तचर यंत्रणांनी सांगितले. त्यामुळे आता मिरवणूक मंदिर परिसरातच काढणार आहे.

पंतप्रधानांनी दर्शविली उपवास, व्रताची तयारी

प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी जर उपवास किंवा व्रत राखायचे असेल तर ते करण्यास मी तयार आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मला सांगितल्याचे श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे पदाधिकारी नृपेंद्र मिश्र यांनी स्पष्ट केले.

‘सोहळ्याचे पावित्र्य टिकवा’

अयोध्या : अयोध्येत २२ जानेवारीला भव्य मंदिरामध्ये प्रभू श्री राम यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत असताना देशभर मंगलमय वातावरण ठेवा, कुठेही धांगडधिंगा होता कामा नये, प्रसंगाचे पावित्र्य टिकवा, असे आवाहन श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे महामंत्री चंपतराय यांनी सोमवारी केले. एक्सवर एक व्हिडीओ जारी करत त्यांनी रामभक्तांशी संवाद साधला. २२ जानेवारीला दुपारी १२ वाजून २० मिनिटांनी प्राणप्रतिष्ठा सोहळा अयोध्येतील मंदिरात होणार आहे. त्यावेळी देशभरातील मंदिरांमध्ये सगळ्या समाजबांधवांना आमंत्रित करा. भजन-कीर्तन करा. आनंदोत्सव साजरा करा. प्राणप्रतिष्ठेनंतर आरती होईल तेव्हा देशभरातील रामभक्तांनी आपापल्या ठिकाणी आरती करावी. वेगळ्या आरत्यांची गरज नाही, नियमितपणे मंदिरात एरवी होतात त्याच आरत्या कराव्यात. आरतीनंतर प्रसाद वितरण करा. विशिष्ट प्रकारचाच प्रसाद असावा अशी कोणतीही अट नाही, असे आवाहन त्यांनी केले.

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्या