शहरं
Join us  
Trending Stories
1
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
2
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
3
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
4
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
5
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
6
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
7
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
8
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
9
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
10
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
11
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
12
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
13
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
14
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
15
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी
16
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
17
सर्वत्र मृतदेह, ओळख पटवणेही अशक्य; गुजरात सरकारकडून डीएनए सॅम्पल देण्याचं आवाहन
18
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
19
Ahmedabad Plane Crash : पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी
20
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा

"पेंडालमधून गुरुजींची कार निघाली, लोक दर्शनासाठी धावले अन्..."; नेमकं काय घडलं? पीडित प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2024 23:22 IST

सत्संगाचा कार्यक्रम संपल्यानंतर, गुरुजींची कार निघाली. यानंतर, त्यांचे दर्शन घेण्यासाठी लोक धावू लागले. यामुळे चेंगराचेंगरी झाली. यावेळी अनेक लोक खाली पडले होते, त्यांच्यावरून लोक धावत होते.

उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यातील रतिभानपूरमधील पुलराई गावात मगळवारी भोले बाबा यांच्या सतसंगाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत जवळपास 100 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये अधिकांश महिला आणि लहान मुलांचा समावेश असल्याचे समजते. या घटनेसंदर्भात प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, एका शेतात सत्संगाचा पेंडाल लागलेला होता. सत्संगाचा कार्यक्रम संपल्यानंतर, गुरुजींची कार निघाली. यानंतर, त्यांचे दर्शन घेण्यासाठी लोक धावू लागले. यामुळे चेंगराचेंगरी झाली. यावेळी अनेक लोक खाली पडले होते, त्यांच्यावरून लोक धावत होते.

दुर्घटनेसंदर्भात आज तकने दिलेल्या वृत्तानुसार, प्रत्यक्षदर्शी रामदास नामक एका व्यक्तीने सांगितले की, "ते त्यांच्या पत्नीला औषध देण्यासाठी अलीगडला गेले होते. तेथून परतल्यानंतर, सत्संगाच्या कार्यक्रमासाठी आले. रामदास बाहेर सेवेकऱ्यांजवळच थांबले होता. या वेळी त्याला चेंगराचेंगरीची माहिती मिळाली. या चेंगराचेंगरीत त्यांची पत्नीही सापडली. नंतर, त्यांना सांगण्यात आले की रुग्णवाहिका लोकांना घेऊन एटा येथे गेली आहे. यामुळे ते एटाला आले. प्रचंड गर्दीमुळे ही घटना घडल्याचेही त्यांनी सांगितले."

ते म्हणाले, "पेंडाल आमच्यापासून लांब होता. मात्र, दीड - दोन लाख लोक होते. 50 ते 60 बीघ्यांवर पेंडाल होता. संपूर्ण रोड जाम होता. त्यांनी सांगितले की, त्यांच्या पत्नीची भोले बाबांवर श्रद्धा होती. दुर्घटनेत बचाव कर्यासाठी पीएसीच्या तीन कंपन्या आणि SDRF ची एक कंपनी घटनास्थळी आहे.

हेल्पलाइन नंबर -या दुर्घटनेनंतर, हाथरस जिल्हा प्रशासनाने सर्वसामान्य लोकांच्या मदतीसाठी हेल्पलाइन नंबरही जारी केले आहेत. ते 05722227041 तथा 05722227042  असे आहेत.

मुख्यमंत्री बुधवारी घटनास्थळी पोहोचणार -हाथरस दुर्घटनेसंदर्भात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दु:ख व्यक्त केले असून, घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. अधिकाऱ्यांना तातडीने घटनास्थळी पोहोचून मदत कार्याला वेग आणण्याची सूचना देण्यात आली आहे. याच बरोबर, जखमींवर योग्य उपचार करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत. याशिवाय, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ बुधवारी घटनास्थळी जाऊन घटनेचा आढावा घेतील. ते येथे पीडित कुटुंबांची भेट घेतील. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत मुख्यसचिवही उपस्थित राहतील.

मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २ लाख रुपयांची मदत -तसेच मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २ लाख आणि जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, कार्यक्रमाच्या आयोजकांविरोधाक एफआयआर दाखल करून कारवाई करण्याची तयारी शासनाकडून करण्यात येत आहे. तसेच या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी एका समितीची स्थापना करण्यात आली आहे.

टॅग्स :Deathमृत्यूhospitalहॉस्पिटलUttar Pradeshउत्तर प्रदेश