शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
2
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
3
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
4
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
5
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
6
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
7
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
8
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
9
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
10
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
11
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
12
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
13
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
14
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"
15
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
16
२५ वर्षीय CA तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; 'हेलियम गॅस' शरीरात घेत आयुष्याचा शेवट केला, कारण...
17
Stock Market Today: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, Sensex २७१ अंकांनी घसरला; IT-मेटल स्टॉक्स कमकुवत
18
"सलमानने चाकू माझ्या गळ्यावर धरला आणि जोरात...", अशोक सराफ यांनी सांगितला भाईजानचा तो प्रसंग
19
भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात
20
FD-RD झाली जुनी, आता ‘या’ ५ स्कीम्सची चर्चा; वर्षभरात तगडा नफा हवा असेल तर ही डिटेल्स तपासा

"पेंडालमधून गुरुजींची कार निघाली, लोक दर्शनासाठी धावले अन्..."; नेमकं काय घडलं? पीडित प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2024 23:22 IST

सत्संगाचा कार्यक्रम संपल्यानंतर, गुरुजींची कार निघाली. यानंतर, त्यांचे दर्शन घेण्यासाठी लोक धावू लागले. यामुळे चेंगराचेंगरी झाली. यावेळी अनेक लोक खाली पडले होते, त्यांच्यावरून लोक धावत होते.

उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यातील रतिभानपूरमधील पुलराई गावात मगळवारी भोले बाबा यांच्या सतसंगाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत जवळपास 100 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये अधिकांश महिला आणि लहान मुलांचा समावेश असल्याचे समजते. या घटनेसंदर्भात प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, एका शेतात सत्संगाचा पेंडाल लागलेला होता. सत्संगाचा कार्यक्रम संपल्यानंतर, गुरुजींची कार निघाली. यानंतर, त्यांचे दर्शन घेण्यासाठी लोक धावू लागले. यामुळे चेंगराचेंगरी झाली. यावेळी अनेक लोक खाली पडले होते, त्यांच्यावरून लोक धावत होते.

दुर्घटनेसंदर्भात आज तकने दिलेल्या वृत्तानुसार, प्रत्यक्षदर्शी रामदास नामक एका व्यक्तीने सांगितले की, "ते त्यांच्या पत्नीला औषध देण्यासाठी अलीगडला गेले होते. तेथून परतल्यानंतर, सत्संगाच्या कार्यक्रमासाठी आले. रामदास बाहेर सेवेकऱ्यांजवळच थांबले होता. या वेळी त्याला चेंगराचेंगरीची माहिती मिळाली. या चेंगराचेंगरीत त्यांची पत्नीही सापडली. नंतर, त्यांना सांगण्यात आले की रुग्णवाहिका लोकांना घेऊन एटा येथे गेली आहे. यामुळे ते एटाला आले. प्रचंड गर्दीमुळे ही घटना घडल्याचेही त्यांनी सांगितले."

ते म्हणाले, "पेंडाल आमच्यापासून लांब होता. मात्र, दीड - दोन लाख लोक होते. 50 ते 60 बीघ्यांवर पेंडाल होता. संपूर्ण रोड जाम होता. त्यांनी सांगितले की, त्यांच्या पत्नीची भोले बाबांवर श्रद्धा होती. दुर्घटनेत बचाव कर्यासाठी पीएसीच्या तीन कंपन्या आणि SDRF ची एक कंपनी घटनास्थळी आहे.

हेल्पलाइन नंबर -या दुर्घटनेनंतर, हाथरस जिल्हा प्रशासनाने सर्वसामान्य लोकांच्या मदतीसाठी हेल्पलाइन नंबरही जारी केले आहेत. ते 05722227041 तथा 05722227042  असे आहेत.

मुख्यमंत्री बुधवारी घटनास्थळी पोहोचणार -हाथरस दुर्घटनेसंदर्भात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दु:ख व्यक्त केले असून, घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. अधिकाऱ्यांना तातडीने घटनास्थळी पोहोचून मदत कार्याला वेग आणण्याची सूचना देण्यात आली आहे. याच बरोबर, जखमींवर योग्य उपचार करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत. याशिवाय, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ बुधवारी घटनास्थळी जाऊन घटनेचा आढावा घेतील. ते येथे पीडित कुटुंबांची भेट घेतील. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत मुख्यसचिवही उपस्थित राहतील.

मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २ लाख रुपयांची मदत -तसेच मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २ लाख आणि जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, कार्यक्रमाच्या आयोजकांविरोधाक एफआयआर दाखल करून कारवाई करण्याची तयारी शासनाकडून करण्यात येत आहे. तसेच या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी एका समितीची स्थापना करण्यात आली आहे.

टॅग्स :Deathमृत्यूhospitalहॉस्पिटलUttar Pradeshउत्तर प्रदेश