शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
2
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?
3
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
4
Lamborghini Accident: भरधाव लॅम्बोर्गिनी दुभाजकावर धडकली; कोस्टल रोडवरील अपघातात, कोण चालवत होतं कार?
5
हुंड्यासाठी जावयाची क्रूरता! जमिनीसाठी पत्नीची केली हत्या, सासऱ्यालाही दिला विजेचा झटका
6
चिमुकली आई... आई... करत राहिली, लिव्ह इन पार्टनरने गर्लफ्रेंडच्या मुलीची हत्या केली  
7
Navratri 2025: नवरात्र हा शक्ती उपासनेचा काळ, दुर्गा सप्तशती ग्रंथ वाचनाने कोणते लाभ होतात?
8
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
9
ऐकावं ते नवलच! शोधून शोधून थकली पण सापडलाच नाही नवरा; मग स्वत:शीच केलं लग्न अन्...
10
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तानचे संघ पुन्हा एकदा भिडणार? समजून घ्या IND vs PAKचे गणित
11
मनसे-शिवसेना युतीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; कोण किती जागा लढवणार? समोर आली माहिती
12
VIRAL VIDEO: चीनमधली खूप रील्स पाहिली असतील, पण भारतातील एअरपोर्टवर फूड डिलिव्हरी करणारा रोबो पाहिलात का?
13
Mumbai: सचिन तेंडुलकरच्या हस्ते दादरच्या शिवाजी पार्क जिमखान्याचे लोकार्पण!
14
Navratri 2025: नवरात्रीच्या पहिल्या दिवशी करूया स्मरण आणि मानसपूजन देवी शैलपुत्रीचे!
15
दुर्दैवी अंत! ज्याच्या इशाऱ्यावर 'वाघ' उठबस करायचा, त्याच मालकाला वाघाने टेन्शनमध्ये शिकार बनवलं
16
पाकिस्तानी सैन्याने त्यांच्याच देशात हवाई हल्ला केला, महिला मुलांसह ३० नागरिकांचा मृत्यू
17
ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची गाडी अज्ञात व्यक्तीने पेटवली; जालन्यातील घटना
18
"हो आम्ही पालक झालो आहोत", अखेर भूषणने उलगडलं केतकीसोबतच्या 'त्या' फोटोचं गुपित
19
पराभव दिसू लागताच पाकिस्तानी प्रेक्षक पळू लागले, भारतीय तरुणीने भर स्टेडियममध्ये डिवचले, म्हणाली...  

'स्मार्टफोनपासून दूर राहा आणि पुस्तके वाचा' मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा मुलांना सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2025 12:15 IST

Yogi Adityanath: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लखनौ विद्यापीठात आयोजित चौथ्या गोमती पुस्तक महोत्सवाचे उद्घाटन केले.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लखनौ विद्यापीठात आयोजित चौथ्या गोमती पुस्तक महोत्सवाचे उद्घाटन केले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी लहान मुलांशी संवाद साधला आणि त्यांना पुस्तकांचे महत्त्व पटवून दिले. शिवाय, त्यांनी शालेय विद्यार्थिनी आणि अंगणवाडी सेविकांना पुस्तके भेट दिली. चांगली पुस्तके नेहमीच योग्य मार्गदर्शक म्हणून काम करतात आणि आपल्याला भविष्यात पुढे जाण्यासाठी मदत करतात, असे योगी आदित्य नाथ म्हणाले.

भारतीय ऋषी आणि संतांचे उदाहरण देत मुख्यमंत्री म्हणाले की, याज्ञवल्क्यसारख्या ऋषींनी समाजाला ज्ञानाचा मार्ग दाखवला. त्यांनी ऋषी याज्ञवल्क्य आणि त्यांच्या पत्नी कात्यायनी आणि मैत्रेयी यांची कहाणी सांगितली आणि ज्ञानाचा शोध घेणे हे जीवनाचे ध्येय असले पाहिजे यावर भर दिला.त्यांनी राष्ट्रीय पुस्तक न्यासाचे कौतुक केले आणि सांगितले की त्यांनी गोमती पुस्तक महोत्सवाची परंपरा सातत्याने पुढे नेली आहे. या वर्षीच्या महोत्सवात अडीचशेहून अधिक स्टॉल आहेत, जिथे बाललेखक आणि विविध भाषांमधील प्रसिद्ध लेखकांची पुस्तके प्रदर्शित केली जातात आणि विकली जातात.

मुलांना 'एग्जाम वारियर्स पुस्तक भेट

योगी आदित्यनाथ यांनी मुलांना पंतप्रधानांनी लिहिलेले 'एग्जाम वारियर्स हे पुस्तक भेट दिले. ते म्हणाले की, मुलांनी पुस्तकातील सर्व मुद्यांचा अभ्यास केला तर कोणत्याही परीक्षेत किंवा स्पर्धेत त्यांना यश मिळवले सोपे होईल. 

व्हेन सिटिजन रीड्स, कन्ट्री लीड्स

मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात तक्षशिला विद्यापीठ, पाणिनी, सुश्रुत आणि ब्रह्मवेतांच्या कामगिरीचा उल्लेख करत भारतीय ज्ञान परंपरेवर प्रकाश टाकला. त्यांनी स्पष्ट केले की, तक्षशिला हे नाव भगवान रामाचा भाऊ भरताचा मुलगा तक्ष यांच्या नावावरून ठेवण्यात आले . ते म्हणाले की, वाचन आणि प्रगती ही भारतात एक परंपरा आहे.

अभ्यासासोबतच चांगली पुस्तकेही वाचावीत

मुख्यमंत्र्यांनी महर्षी वाल्मिकी आणि तुलसीदास यांच्या मूळ ग्रंथांचा उल्लेख करून सांगितले की, मौलिक ग्रंथ केवळ अमर होत नाहीत तर लेखकालाही अमर करतात. त्यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासासोबतच चांगली पुस्तके अभ्यासण्याचे आवाहन केले.

मुलांना किमान एक पुस्तक खरेदी करण्याचे आवाहन

महिला निरोगी असतील तर समाज आणि राष्ट्र सक्षम होईल. त्यांनी लखनौमधील सर्व शाळांमधील मुलांना पुस्तक महोत्सवात उपस्थित राहण्याचे आणि प्रत्येक विद्यार्थ्याने किमान एक पुस्तक खरेदी करावे याची खात्री करण्याचे आवाहन केले.

गोमती पुस्तक महोत्सव २० ते २८ सप्टेंबर दरम्यान आयोजित करण्यात आला. कार्यक्रमादरम्यान, मुख्यमंत्र्यांनी सुनीता शुक्ला, दीपमाला, कुसुम, पूनम पाल, विनीता पाठक, ज्ञानवती, तारावती यासारख्या अंगणवाडी सेविकांना विशेषतः पुस्तके वाटली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी पुस्तक प्रदर्शनात लावलेल्या विविध स्टॉल्सना भेट दिली. यावेळी मंत्री योगेंद्र उपाध्याय, सरकारी सल्लागार अवनीश अवस्थी, राष्ट्रीय पुस्तक न्यासाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद सुधाकर मराठे, लखनौ विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. मनुका खन्ना, प्रसिद्ध लेखक, चित्रपट निर्माते आणि इतिहासकार चंद्र प्रकाश द्विवेदी, राष्ट्रीय पुस्तक न्यासाचे संचालक युवराज मलिक आणि साहित्यप्रेमी उपस्थित होते.

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradeshउत्तर प्रदेश