शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
Silver Returns: २५ वर्षांत २६ पट; २००० साली चांदीत ₹१०,००० गुंतवले असते तर आज किती मालामाल असता?
3
मूळच्या गुजराती कुटुंबाने खरेदी केली 'पाकिस्तान एअरलाईन्स'; कोण आहेत कराचीतील उद्योगपती आरिफ हबीब?
4
कोडीन कफ सिरप तस्करीचा मास्टरमाइंड शुभम जायसवालवर ५० हजारांचं इनाम; आता संपत्तीवर चालणार बुलडोझर!
5
PPF Calculator: दर महिन्याला ₹२,०००, ₹३,००० आणि ₹५,००० गुंतवले तर मॅच्युरिटीवर किती रक्कम मिळेल; पैसेही राहतील सुरक्षित
6
पाहुणी म्हणून आली, लाखोंचे दागिने घेऊन पसार झाली; बंगळुरुमध्ये महिलेला अटक
7
बांगलादेश भारताकडून ५०,००० टन तांदूळ खरेदी करणार; दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी युनूस सरकारचे प्रयत्न
8
३० वर्षांचा संसार, क्षणाचा राग अन् होत्याचं नव्हतं झालं; संशयी पतीने पत्नीला क्रूरपणे संपवलं
9
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
11
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
12
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
13
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
14
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
15
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
16
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
17
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
18
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
19
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
20
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

कलियुगातील श्रावणबाळ! मुलांनी आई-वडिलांची इच्छा केली पूर्ण, कावडीतून 150 किमीचा प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2023 11:58 IST

तीन मुलं आहेत जी या कलियुगात आपल्या आईवडिलांसाठी श्रावणबाळ बनली आहेत.

जगात असे काही लोक आहेत जे आपल्या आई-वडिलांना देवाचा दर्जा देतात आणि अशा लोकांवर देवही प्रसन्न असतो. उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये अशी तीन मुलं आहेत जी या कलियुगात आपल्या आईवडिलांसाठी श्रावणबाळ बनली आहेत. तिन्ही मुलांनी आपल्या वृद्ध आई-वडिलांना खांद्यावर उचलून राजघाटावरून सासनी येथे आणले आहे. सोमवारी सासनी येथील विलेश्‍वर धाम मंदिरात वृद्ध दाम्पत्याने भगवान शंकराला गंगेच्या पाण्याने अभिषेक केला. 

तिन्ही मुलं आपल्या आई-वडिलांना खांद्यावर घेऊन रस्त्याने जात असताना त्यांना पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. रस्त्यावर मोठ्या संख्येने लोक जमा झाले. त्याचवेळी मोठ्या संख्येने पोलीस फौजफाटाही त्यांच्यासोबत दिसला. मिळालेल्या माहितीनुसार, 75 वर्षीय बदन सिंह बघेल हे पत्नी अनार देवी आणि तीन मुलांसोबत हाथरसच्या हरी नगर कॉलनीत राहतात. 

बदन सिंह नेत्रहिन आहेत. अशा स्थितीत त्यांनी आपल्या मुलांसोबत गंगेत स्नान करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर त्यांची तीन मुलं रमेश, विपिन आणि योगेश त्यांच्या वडिलांना रामघाटावर गंगेत स्नान करण्यासाठी घेऊन गेले. आई-वडीलांना गंगेत स्नान करून, कावडमध्ये बांधलेल्या खाटेवर बसवून मुले सासनी नगरातील विलेश्‍वर धाम मंदिराकडे रवाना झाली. मुलांसह त्यांच्या पत्नी आणि मुलंही उपस्थित होती.

तिन्ही मुलांनी आई-वडिलांना खांद्यावर घेऊन सुमारे 150 किलोमीटरवर असलेल्या सासनी परिसरात नेले. त्याचवेळी पोलीसही सक्रिय झाली. त्यानंतर पोलीसही त्यांच्यासोबत फिरत असल्याचे दिसून आले. त्यानंतर आज तिन्ही मुलांनी विलेश्वर धाम मंदिरात आपल्या आई-वडिलांकडून अभिषेक केला. या घटनेची सर्वत्र जोरदार चर्चा होत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेश