शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
2
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
3
चालत गेली अन् शाळेच्या चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीतील विद्यार्थिनीचा व्हिडीओ आला समोर
4
"नरेंद्र मोदी मोठी समस्या नाहीत, त्यांच्यात ..."; विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा मोठा हल्ला!
5
मुंबई लोकलमध्ये ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला; किती लोकांना परत मिळाले? 
6
‘५६ लाख घुसखोर आले कसे? तुम्ही राजीनामाच द्या’, महुआ मोईत्रांनी अमित शाहांना सुनावले  
7
Bank Job 2025: बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर, सिनियर मॅनेजर पदांसाठी भरती; संधी सोडू नका!
8
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'
9
फहाद फासिलनं सांगितले त्याचे आवडते '५' चित्रपट, तुम्ही पाहिलेत का?
10
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान
11
एक दोन नाही तर २५००० कर्मचाऱ्यांची कपात होणार, एप्रिलनंतर आता पुन्हा एकदा Intel च्या कर्मचाऱ्यांवर संकट
12
"...हे विरोधी पक्ष ठरवू शकत नाही"; लोकसभेत प्रचंड गोंधळ, कोणत्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री भडकले?
13
'माझ्या मनावर ओझं पण...' ९००० कर्मचाऱ्यांना काढल्यानंतर सत्या नाडेला यांनी अखेर मौन सोडले; म्हणाले...
14
सरकार आता आमची गेलेली मुलं परत आणून देऊ शकतं का? शाळा दुर्घटनेनंतर पालकांचा आक्रोश
15
31 जुलैपासून सुरू होणार 'या' कंपनीचा कार प्लांट, दर वर्षी बाहेर पडणार 1.50 लाख इलेक्ट्रिक कार!
16
'ऑपरेशन सिंदूर' अजून संपले नाही; CDS जनरल अनिल चौहान यांचे मोठे विधान
17
Sex Racket: फाइव्ह स्टार हॉटेल आणि हाय- प्रोफाइल विदेशी महिला; मुंबईतील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश!
18
Shravan 2025: पौराणिक कथांच्या शेवटी 'साठा उत्तराची कहाणी... सुफळ संपूर्ण' असं का म्हणतात?
19
तुमच्या PF खात्यात पैसे नसले तरीही नॉमिनीला आता थेट ५०,००० मिळतील; EPFO ने 'हे' नियम बदलले
20
Walmik Karad : 'धनंजय मुंडेंना संपवून वाल्मिक कराडला पोटनिवडणूक घ्यायची होती'; बाळा बांगरांचा गंभीर आरोप

११५ गावांमधील ते ५०० वर्षांनंतर घालतील पगडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2024 08:13 IST

गेली ५०० वर्षे ते पगडी घालत नव्हते, त्याचे कारणही प्रभू रामांशीच जुळलेले आहे.

अयोध्या : अयोध्येतील भव्यदिव्य मंदिरात प्रभू श्रीराम यांची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर अयोध्या परिसरातील ११५ गावांमधील ठाकूर (क्षत्रिय) समाजातील लोक पगडी घालतील. गेली ५०० वर्षे ते पगडी घालत नव्हते, त्याचे कारणही प्रभू रामांशीच जुळलेले आहे. 

शरयू नदीच्या तीरावरील ही गावे आहेत. हे लोक स्वत:ला प्रभू रामांचे वंशज मानतात. ५०० वर्षांपूर्वीच्या त्यांच्या पूर्वजांनी अशी शपथ घेतली होती की, ते अयोध्येत जन्मभूमीच्या ठिकाणी राम मंदिर बनणार नाही तोवर पगडी आणि चामड्याच्या वहाणा घालणार नाहीत. 

असे म्हणतात की, बाबराचा सरसेनापती मीर बांकी याने राम मंदिर उद्ध्वस्त केले. त्यानंतर ठाकूर गजराज सिंह यांनी ९० हजार क्षत्रियांना जमा केले आणि कुलदेवता सूर्य मंदिरात शपथ घेतली की, जोवर प्रभू रामांचे मंदिर उभे राहणार नाही आणि सन्मानाने ते प्राणप्रतिष्ठित होणार नाहीत तोवर ते चामड्याच्या वहाणा आणि पगडी घालणार नाहीत. त्यांनी युद्धही केले, पण हजारो क्षत्रिय मारले गेले. पुढे मीर बांकीने राम जन्मभूमीच्या ठिकाणी मशीद बांधली.

छटा जग पनाही नहींं, और नही बंधी पाग आता या ११५ गावांमधील क्षत्रिय बांधव २२ जानेवारीला प्राणप्रतिष्ठा होत असताना समारंभपूर्वक पगडी घालतील आणि वहाणाही. त्यावेळी क्षत्रियांनी जी शपथ घेतली ती अशी होती - जन्मभूमी उद्धार होए, जा दिन बैरी भागछटा जग पनाही नहींं, और नही बंधी पाग.

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्या