शहरं
Join us  
Trending Stories
1
PHOTO: संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच व्यासपीठावर एकत्र... खास पोज देत काढला 'फॅमिली फोटो'
2
"हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही, आम्ही मराठी बोलणारे तुमच्यापेक्षा…’’, उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावले
3
राज ठाकरेंजवळ आदित्य, उद्धव ठाकरेंजवळ अमित, सुप्रिया सुळेंनी एकत्र आणलं; पाहा Video
4
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
5
"निवडणुकीत हरणार म्हणून कुटुंब "तहात" जिंकण्याचा प्रयत्न"; भाजपाचा पलटवार
6
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली
7
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
8
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ...तर आहोत आम्ही गुंड; उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान
9
Raj Thackeray : "तुमच्याकडे सत्ता विधान भवनात असेल, आमच्याकडे रस्त्यावर...",हिंदी सक्तीवरुन राज ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा
10
Uddhav Thackeray : "आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला"; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
11
Raj Thackeray : ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली, या आरोपावर राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
12
मराठी कलाकारांसमोर राज ठाकरेंकडून बॉलिवूडच्या ए.आर.रहमानचं कौतुक, सांगितला 'तो' प्रसंग
13
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
14
"एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं," उद्धव ठाकरेंचं सूचक विधान
15
Raj Thackeray : जास्त नाटकं केली, तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे; पण...; राज ठाकरेंचा 'सैनिकां'ना आदेश
16
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
17
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
18
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
19
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
20
"इथेच येऊन बिजनेस करता आणि...", सुशील केडियांवर संतापले भरत जाधव, म्हणाले- "मराठी माणसाने जागं व्हायला हवं..."

Uttar Pradesh: चालकाचे नियंत्रण सुटलं अन् कार उलटून थेट भिंतीवर आदळली, आठ जण ठार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2025 10:46 IST

Uttar Pradesh News: उत्तर प्रदेशातील संभल जिल्ह्यात एक भीषण अपघात घडला आहे.

उत्तर प्रदेशातील संभल जिल्ह्यात एक भीषण अपघात घडला आहे. वऱ्हाड्यांना घेऊन जाणारी गाडी एका भितींला धडकली. या अपघातात नवरदेवासह आठ जणांचा मृत्यू झाला. जुनावरी येथील मेरठ-बदायूं रस्त्यावर हा अपघात घडला. मृतांमध्ये दोन मुलांचाही समावेश आहे.मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी संध्याकाळी ७:३० वाजताच्या सुमारास हा अपघात घडला. 

संभलच्या जुनावरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हरगोविंदपूर गावातील रहिवासी सुखराम यांनी बदायूं जिल्ह्यातील सिरसौल गावातील तरुणीशी आपल्या मुलाचे लग्न ठरवले. शुक्रवारी संध्याकाळी नवरदेवाकडील मंडळी सिरसौल गावाला जात होते, ज्यात नवरदेवासह एकूण १० जण होती. परंतु, वाटेतच गाडी जुनावई येथील जनता इंटर कॉलेजच्या भिंतीवर आदळली. हा अपघात इतका भीषण होता की, गाडीमधील सर्वजण गंभीर जखमी झाले. स्थानिक लोकांनी कसेबसे जखमींना बाहेर काढून जवळच्या रुग्णालयात नेले. मात्र, तिथे डॉक्टरांनी नवदेवासह आठ जणांना मृत घोषित केले. तर, दोन जणांची प्रकृती चिंताजनक आहे.

सूरज पाल (वय, २०) असे मृत्यू झालेल्या नवरदेवाचे नाव आहे. तर, त्याचे वडील देवा, बहीण कोमल (वय, १५), चुलती आशा (वय, २६), चुलत बहीण ऐश्वर्या (वय, ३) चुलत भाऊ सचिन (वय, २२), सचिनची पत्नी मधू (वय, २०) चुलत भाऊ गणेश (वय, २) आणि गाडीचालक रवी (वय, २८) अशी मृतांची ओळख आहे.

अपघाताची माहिती मिळताच लग्नाच्या घरात गोंधळ उडाला. कुटुंबातील सदस्य आणि नातेवाईकही अपघातस्थळी पोहोचले. संभलचे एसपी कृष्ण कुमार बिश्नोई यांनी सांगितले की, चालक वेगान गाडी चालवत होता. त्यामुळे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि हा अपघात घडला.

टॅग्स :AccidentअपघातUttar Pradeshउत्तर प्रदेश