शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

१३ वर्षांनी आनंदाश्रू; मजुरी करणाऱ्या आईची लहानपणी हरवलेली दोन्ही मुलं परत आली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2023 16:25 IST

सन २०१० साली जगदीशपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील परिसरातून राखी आणि बबलू गायब झाले होते.

उत्तर प्रदेशच्या आग्रा येथे राहणारे एक भाऊ-बहिण लहानपणीच आपल्या आई-वडिलांपासून हरवले होते. आता, तब्बल १३ वर्षांनी ते आपल्या कुटुंबाकडे परत आले आहेत. यासाठी एका स्वयंसेवी संस्थेने त्यांना मदत केली. लहानपणीच आपल्यापासून दूर गेलेल्या मुलीला पाहताच आईच्या अश्रूंचा बांध फुटला. आईने लेकीचा मिठी मारत आनंदाश्रू ढाळले, तर मुलीचेही डोळे पाणावले. चित्रपटाला साजेल असे हे दृश्य पाहून उपस्थितही भावूक झाले होते. 

सन २०१० साली जगदीशपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील परिसरातून राखी आणि बबलू गायब झाले होते. जेव्हा हे दोघे कुटुंबापासून दूर गेले, तेव्हा राखीचे वय ९ वर्षे तर बबलूचे वय ६ वर्षे होते. ज्यादिवशी ही घटना घडली, त्यादिवशी राखीची आई नितू कामावर गेली होती. कामाहून घरी आल्यानंतर काहीतरी विषयावरुन मुलांसोबत तिचे भांडण झाले, तिने मुलांना मारहाणही केली. त्यानंतर, आई बाहेर निघून गेली. मात्र, ती घरी आल्यानंतर तिचे दोन्ही मुले घरात नव्हते. त्यामुळे, तिने परिसरात शोधा-शोध केली, इकडे तिकडे पाहिले. पण, त्यांचा शोध लागला नाही. 

नीतू दोन दिवस उपाशी राहिल्या, देवाची प्रार्थना केली, सगळीकडे पाहिले. मात्र, त्यांची दोन्ही मुले परत आली नाहीत. पोलिसांकडे मुले हरवल्याची तक्रार दिली. पण, पोलिसांनाही ही मुले शोधण्यात अपयश आलं. या घटनेने नीतू आणि तिच्या पतीला मोठा मानसिक धक्का बसला होता. दिल्ली, नोएडासह इतरही ठिकाणी त्यांनी आपलं काम सोडून मुलांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. या शोधमोहिमेत तब्बल १३ वर्षे गेली. 

दुसरीकडे मुलेही मोठी होत होती अन् आई-वडिलांचा शोध घेत होते. घरातून दूर गेल्यानंतर ते एका अनाथालयात राहिले. येथूनच त्यांनी शिक्षण घेतले, आणि खासगी नोकरीही सुरू केली. सध्या राखी गुरुग्राममध्ये शॉपर्स स्टाफ म्हणून काम करते. तर, बबलू बंगळुरूच्या एका कंपनीत पॅकिंगचं काम करतो. दोघेही भाऊ-बहिण पहिल्यापासूनच एकमेकांच्या संपर्कात आहेत. दरम्यान, बललूची भेट एका बाल सुरक्षा अधिकारी कार्यकर्त्यासोबत झाली. त्या नरेश पारस यांनी दोघांची भेट त्यांच्या आई-वडिलांसोबत करुन देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. 

दोन महिन्यांपूर्वी राखी व बबलू यांनी एका एनजीओच्या माध्यमातून पारस यांच्याकडे मदत मागितली होती. ज्या स्टेशनपासून ते गायब झाले होते, त्या स्टेशनच्याबाहेर डमी रेल्वेचं इंजिन ठेवण्यात आलं होतं, एवढीच काय ती १३ वर्षांपूर्वीची आठवण होती. त्यावरुन, हे दोघेही आग्रा येथील असल्याच निश्चित झाले. कारण, आग्रा रेल्वे स्टेशन बाहेरच डमी इंजिन ठेवण्यात आले आहे. त्यानुसार, आग्र्यातून शोधमोहिम सुरू झाली होती. एका बालकल्याण समितीला ट्रेनमधून हे दोघेही सापडले होते. त्यावरुन, त्यांची माहिती घेत, अनेक पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पारस यांनी मिसिंग तक्रारीची माहिती घेतली. त्यावेळी, जगदीशपुरा पोलीस ठाण्यात १३ वर्षांपूर्वी बहिण-भाऊ हरवल्याची तक्रार दाखल झाल्याचं त्यांनी सांगितलं.

पारस यांच्यासह राखी आणि बबलूने आई नीतूचा शोध सुरू केला. मात्र, नितूनेही तेथील भाड्याचं घर सोडून शहरात बस्तान मांडलं होतं. जगदीशपुरा येथील स्थानिकांकडून नीतूचा शाहगंज येथील पत्ता मिळाला. त्यानुसार, एनजीओचे लोक नीतूच्या घरी पोहोचले आणि राखी व बबलूसोबत व्हिडिओ कॉलवरुन संवाद झाला. सर्वांनाच अत्यानंद  झाला होता. राखीने आग्र्यात येऊन आईची भेट घेतली, आईनेही आरती ओवाळून लेकीचं स्वागत केलं. तब्बल १३ वर्षांनी आईला तिची दोन्ही चिमुकले परत भेटले, जे आता मोठे झाले होते. 

टॅग्स :agra-pcआग्राPoliceपोलिसdelhiदिल्लीMissingबेपत्ता होणं