शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
2
...म्हणून अजित पवारांनी त्या गोष्टीचा फायदा उचलला; गृहराज्यमंत्री योगेश कदम : आदित्यला मंत्रिपद ही चूक
3
महायुतीत संघर्ष पेटला! गणेश नाईकांचे 'ते' व्हिडिओ महाराष्ट्रात प्रदर्शित करू; शिंदेसेनेचा इशारा
4
पुढच्या वर्षी मेगा सरकारी नोकरभरती, एमपीएससी भरतीही रेंगाळणार नाही; फडणवीस यांची घोषणा
5
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
6
फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...
7
आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल
8
शेतकऱ्यांना पावसाचा, नाेकरदारांना महागाईचा फटका; दिवाळीपूर्वी काय काय होऊ शकते...
9
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
10
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
11
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
12
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
13
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम
14
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
15
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश
16
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन, शरीफ नरमले; आंदोलन मागेही घेतले
17
५० हजारांना मुलीची खरेदी; जबरीने लग्न
18
ईएमआय की एसआयपी? तुम्हाला कोण करेल श्रीमंत?
19
परीक्षेचा अटॅक: ताण, चिंता इतकी वाढते की ज्यामुळे अभ्यासात लक्ष लागत नाही
20
भाई, बाळासाहेबांबद्दल नेमके काय झाले होते, सांगता का..?

लग्नाची पहिली रात्रच बनली शेवटची रात्र; सकाळी बेडरुममध्ये नवरा-नवरी निपचित अवस्थेत सापडले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2023 13:25 IST

बंद खोलीमध्ये पहिल्याच रात्री असे काय झाले याचा तपास केला जात आहे. पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी देखील घटनास्थळी पोहोचले आहेत.

उत्तर प्रदेशमध्ये लग्नघरात दुसऱ्याच दिवशी खळबळजनक घटना घडली आहे. आनंदात असलेले कुटुंबीय एकाएकी ओक्साबोक्शी रडत आहेत. घटनाच अशी घडलीय की कोणालाही विश्वासच बसत नाहीय. नवविवाहित दाम्पत्याचे मृतदेह सुहागरात्रीच्या दुसऱ्या दिवशीच सकाळी बेडरुममध्ये सापडले आहेत. 

कैसरगंज पोलीस ठाणे हद्दीतील ही घटना आहे. गुल्लनपुरवा गावचा रहिवासी असलेल्या परशुराम यादव यांचा आठ वर्षांपूर्वी मृत्यू झाला आहे. त्यांची दोन नंबरची मुलगी पुष्पा हिचे बुधवारी लग्न झाले. गोडड़हिया गावातील प्रताप यादव सोबत तिचा मोठ्या धुमधाममध्ये विवाह झाला. पुष्पा प्रतापच्या घरी गेली. पहिली रात्र असल्याने कुटुंबीयांनीही तिकडे लक्ष दिले नाही. परंतू, सकाळी जेव्हा बेडरूममधून कोणीच बाहेर येत नाही हे पाहून दरवाजा वाजविण्यात आला. 

तरीही काही प्रतिसाद दिला नाही म्हणून खिडकी उघडून आतमध्ये गेले. आत जाऊन पाहतात तोच दोघेही निपचित पडलेले होते. हे पाहून कुटुंबीयांमध्ये हाहाकार उडाला. लगेचच या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी देखील घटनास्थळी पोहोचले आहेत. एसएचओ राजनाथ सिंह यांनी चौकशी सुरु असल्याचे म्हटले आहे. 

बंद खोलीमध्ये पहिल्याच रात्री असे काय झाले याचा तपास केला जात आहे. दोघांनी विष पिऊन आत्महत्या केली की विषारी वायूमुळे त्यांचा गुदमरून मृत्यू झाला याचा शोध घेतला जात आहे. 

टॅग्स :marriageलग्न