शहरं
Join us  
Trending Stories
1
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
2
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
3
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
4
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
5
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
6
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
7
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
8
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
9
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
10
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
11
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
12
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
13
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
14
जबरदस्त कॅमेरा आणि दमदार बॅटरी, किंमत १० हजारांहून कमी; नव्या 5G फोनची सर्वत्र चर्चा!
15
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
16
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
17
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
18
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
19
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
20
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक

काशीत मांस-मच्छी विकायला बंदी करावी; धीरेंद्र शास्त्रींची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2023 16:30 IST

धीरेंद्र शास्त्री यांनीही सनातम धर्माबद्दल अपशब्द वापणाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला आहे. 

वाराणसी - तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांचे चिरंजीव आणि तामिळनाडू राज्य सरकारमधील मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी 'सनातन धर्मा'वर केलेल्या वक्तव्यावरून वाद सुरूच आहे. थेट देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही सनातन धर्माचा अनादर खपवून न घेण्याचं सांगत भाजप नेत्यांना काही सूचनाही केल्या आहेत. तर, उदयनिधी यांच्या विधानानंतर अनेक स्वामी, ऋषी, महाराजांनी पुढे येऊन सनातन धर्माचं महत्त्व विषद केलंय. तसेच, उदयनिधींना फटकारलं आहे. आता, सनातन धर्म प्रचारक बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्री यांनीही सनातम धर्माबद्दल अपशब्द वापणाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला आहे. 

धीरेंद्र शास्त्री यांनी सोमवारी काशी येथील मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यावेळी बोलताना, त्यांनी भारत हे हिंदूराष्ट्र होणारच, असे म्हणत सनातन धर्माविरुद्ध बोलणाऱ्यांचे दिवस भरले आहेत, असेही म्हटले. सनातन धर्माचा विरोध करणाऱ्यांचा दिवा विझणार आहे. म्हणूनच ते सातत्याने सनातन धर्मावर टीका करत आहेत. मात्र, सनातन धर्मीयांनी चिंता करण्याचं कारण नाही, बालाजींवर विश्वास ठेवावा, असेही शास्त्रींनी म्हटले. काशी हे बाबा विश्वनाथ, कालभैरव आणि माँ अन्नपूर्णाची नगरी आहे. येथील गल्लो-गल्लीत पौराणिक धर्मिक स्थळ आहेत. ज्याचे देशातील आणि जगभरातील सनातन धर्मीयांत महात्म्य आहे. 

येथील रस्त्यांवर उघडपणे मांस, मटन विक्री केली जाते. मात्र, हे थांबलं पाहिजे. येथे मांस-मच्छीच्या विक्रीला बंदी घातली पाहिजे, अशी मागणीही बागेश्वरच्या धीरेंद्र शास्त्री यांनी केली. काशीतील दुर्लक्षित मंदिरे व प्राचीन महाविद्यालयांच्या संरक्षणावरही त्यांनी भाष्य केलं. धर्म आणि संस्कृतीच्या शिक्षणास संरक्षण दिले पाहिजे, असे त्यांनी म्हटले. 

काय म्हणाले होते उदयनिधी स्टॅलिन

द्रमुक नेते उदयनिधी स्टॅलिन यांनी २ सप्टेंबरला तामिळनाडूमध्ये आयोजित एका कार्यक्रमात सनातन धर्माला अनेक 'सामाजिक दुष्कृत्यांसाठी' जबाबदार धरलं होतं. सोबत याला समाजातून हद्दपार करायला हवं असंही म्हटलं होतं. "सनातन धर्म हा जाती आणि धर्माच्या नावाखाली लोकांमध्ये फूट पडतो. हा विचार संपवणं म्हणजे मानवता आणि समता वाढवणं.", असेही त्यांनी म्हटलं होतं.  

टॅग्स :bageshwar dhamबागेश्वर धामVaranasiवाराणसीSanatan Sansthaसनातन संस्था