शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

“सीता माता व्हिसा घेऊन आली होती का, सीमा हैदरला भारताचे नागरिकत्व द्यावे”; वकिलांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2023 20:11 IST

Seema Haider: सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवण्याबाबत विचार सुरू असताना तिच्या वकिलांनी भारताचे नागरिकत्व मिळण्याची मागणी केली आहे.

Seema Haider: पाकिस्तानातून आपला प्रियकर असलेल्या सचिन मीनासोबत नेपाळमार्गे ग्रेटर नोएडातील रबुपुरामध्ये पोहोचलेली सीमा हैदर सध्या देशीतील चर्चेचा विषय बनली आहे. ती खरोखरच प्रेमासाठी भारतात आली, की पाकिस्तानची एजन्ट आहे? यावरही चर्चा सुरू आहेत. यूपी एटीएसनेही तिची चौकशी केली आहे. यातच सीमा हैदरबाबत नवनवीन खुलासे होत असून, तिला पाकिस्तानात परत पाठवण्याबाबत हालचाली सुरू असल्याचे सांगितले जात आहे. यातच आता सीमा हैदरला भारताचे नागरिकत्व द्यावे, अशी मागणी तिच्या वकिलांनी केली आहे. 

सीमा हैदर आणि सचिनचे वकील एपी सिंह यांनी अजब विधान केले आहे. सीता माता नेपाळमधून व्हिसा घेऊन भारतात आल्या होत्या का?, अशी विचारणा एपी सिंह यांनी सीमाचा बचाव करताना केली आहे. सीमा हैदर यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी एपी सिंह रबुपुरा येथे पोहोचले होते. सचिन आणि सीमा हैदर यांच्या वतीने एपी सिंह यांनी राष्ट्रपतींना याचिकाही दिली आहे. सीमा हैदरला भारताचे नागरिकत्व द्यावे. पाकिस्तानात पाठवू नये, असे याचिकेत म्हटले आहे.

सीमा आता भारताची मुलगी आहे  

बरेच लोक आहेत आणि अनेक मुली अशा आहेत, ज्यांच्याकडे अजून भारतीय नागरिकत्व नाही. अजूनही भारतात अभिमानाने राहतात. सीमा आता भारताची मुलगी आहे कारण तिने हिंदू धर्म स्वीकारला आहे. सीमा सिंदूर लावते. चुडा भरते आणि हाताला मेहंदी लावते. करवाचौथचे व्रतही दोनदा ठेवले आहे. सीमा हैदर म्हणण्याऐवजी सचिन मीना या नावाने हाक मारावी. ती आता भारताची मुलगी आहे. सीमाच्या पहिल्या पतीनेही घटस्फोट घेतल्याचे सांगितले आहे. अनेक वर्षे त्याला भेटलीही नाही, असे एपी सिंह यांनी सांगितले.

दरम्यान, सीमा बेकायदेशीरपणे भारतात आलेली नाही. तिच्याकडे नेपाळचा व्हिसा होता. त्यानंतरच सीमा भारतात दाखल झाली. नेपाळशी आमचे संबंध पूर्वीपासूनच चांगले आहेत. सीता माताही नेपाळमधून व्हिसा घेऊन भारतात आली होती का? अशी विचारणा एपी सिंह यांनी केली. सीमा आणि सचिन यांच्यात सच्चे प्रेम आहे. नेपाळमधील एका मंदिरात हिंदू परंपरांनुसार सीमाचे लग्न झाले. संशय असल्यास, लाय डिटेक्टर किंवा पॉलीग्राफी चाचणी घ्यावी. या प्रकरणाची सीबीआय किंवा रॉ मार्फत चौकशी झाली पाहिजे. सीमा निर्दोष आढळल्यास तिला भारतीय नागरिकत्व मिळालेच पाहिजे. यासोबतच त्याची सुरक्षाही सुनिश्चित करायला हवी, असेही एपी सिंह यांनी सांगितले. 

 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेश