शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
3
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
4
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
5
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
6
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
7
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
8
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
9
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
10
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
11
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
12
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
13
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
14
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
15
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
16
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
17
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
18
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
19
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
20
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत

“सीता माता व्हिसा घेऊन आली होती का, सीमा हैदरला भारताचे नागरिकत्व द्यावे”; वकिलांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2023 20:11 IST

Seema Haider: सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवण्याबाबत विचार सुरू असताना तिच्या वकिलांनी भारताचे नागरिकत्व मिळण्याची मागणी केली आहे.

Seema Haider: पाकिस्तानातून आपला प्रियकर असलेल्या सचिन मीनासोबत नेपाळमार्गे ग्रेटर नोएडातील रबुपुरामध्ये पोहोचलेली सीमा हैदर सध्या देशीतील चर्चेचा विषय बनली आहे. ती खरोखरच प्रेमासाठी भारतात आली, की पाकिस्तानची एजन्ट आहे? यावरही चर्चा सुरू आहेत. यूपी एटीएसनेही तिची चौकशी केली आहे. यातच सीमा हैदरबाबत नवनवीन खुलासे होत असून, तिला पाकिस्तानात परत पाठवण्याबाबत हालचाली सुरू असल्याचे सांगितले जात आहे. यातच आता सीमा हैदरला भारताचे नागरिकत्व द्यावे, अशी मागणी तिच्या वकिलांनी केली आहे. 

सीमा हैदर आणि सचिनचे वकील एपी सिंह यांनी अजब विधान केले आहे. सीता माता नेपाळमधून व्हिसा घेऊन भारतात आल्या होत्या का?, अशी विचारणा एपी सिंह यांनी सीमाचा बचाव करताना केली आहे. सीमा हैदर यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी एपी सिंह रबुपुरा येथे पोहोचले होते. सचिन आणि सीमा हैदर यांच्या वतीने एपी सिंह यांनी राष्ट्रपतींना याचिकाही दिली आहे. सीमा हैदरला भारताचे नागरिकत्व द्यावे. पाकिस्तानात पाठवू नये, असे याचिकेत म्हटले आहे.

सीमा आता भारताची मुलगी आहे  

बरेच लोक आहेत आणि अनेक मुली अशा आहेत, ज्यांच्याकडे अजून भारतीय नागरिकत्व नाही. अजूनही भारतात अभिमानाने राहतात. सीमा आता भारताची मुलगी आहे कारण तिने हिंदू धर्म स्वीकारला आहे. सीमा सिंदूर लावते. चुडा भरते आणि हाताला मेहंदी लावते. करवाचौथचे व्रतही दोनदा ठेवले आहे. सीमा हैदर म्हणण्याऐवजी सचिन मीना या नावाने हाक मारावी. ती आता भारताची मुलगी आहे. सीमाच्या पहिल्या पतीनेही घटस्फोट घेतल्याचे सांगितले आहे. अनेक वर्षे त्याला भेटलीही नाही, असे एपी सिंह यांनी सांगितले.

दरम्यान, सीमा बेकायदेशीरपणे भारतात आलेली नाही. तिच्याकडे नेपाळचा व्हिसा होता. त्यानंतरच सीमा भारतात दाखल झाली. नेपाळशी आमचे संबंध पूर्वीपासूनच चांगले आहेत. सीता माताही नेपाळमधून व्हिसा घेऊन भारतात आली होती का? अशी विचारणा एपी सिंह यांनी केली. सीमा आणि सचिन यांच्यात सच्चे प्रेम आहे. नेपाळमधील एका मंदिरात हिंदू परंपरांनुसार सीमाचे लग्न झाले. संशय असल्यास, लाय डिटेक्टर किंवा पॉलीग्राफी चाचणी घ्यावी. या प्रकरणाची सीबीआय किंवा रॉ मार्फत चौकशी झाली पाहिजे. सीमा निर्दोष आढळल्यास तिला भारतीय नागरिकत्व मिळालेच पाहिजे. यासोबतच त्याची सुरक्षाही सुनिश्चित करायला हवी, असेही एपी सिंह यांनी सांगितले. 

 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेश