शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

“सीता माता व्हिसा घेऊन आली होती का, सीमा हैदरला भारताचे नागरिकत्व द्यावे”; वकिलांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2023 20:11 IST

Seema Haider: सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवण्याबाबत विचार सुरू असताना तिच्या वकिलांनी भारताचे नागरिकत्व मिळण्याची मागणी केली आहे.

Seema Haider: पाकिस्तानातून आपला प्रियकर असलेल्या सचिन मीनासोबत नेपाळमार्गे ग्रेटर नोएडातील रबुपुरामध्ये पोहोचलेली सीमा हैदर सध्या देशीतील चर्चेचा विषय बनली आहे. ती खरोखरच प्रेमासाठी भारतात आली, की पाकिस्तानची एजन्ट आहे? यावरही चर्चा सुरू आहेत. यूपी एटीएसनेही तिची चौकशी केली आहे. यातच सीमा हैदरबाबत नवनवीन खुलासे होत असून, तिला पाकिस्तानात परत पाठवण्याबाबत हालचाली सुरू असल्याचे सांगितले जात आहे. यातच आता सीमा हैदरला भारताचे नागरिकत्व द्यावे, अशी मागणी तिच्या वकिलांनी केली आहे. 

सीमा हैदर आणि सचिनचे वकील एपी सिंह यांनी अजब विधान केले आहे. सीता माता नेपाळमधून व्हिसा घेऊन भारतात आल्या होत्या का?, अशी विचारणा एपी सिंह यांनी सीमाचा बचाव करताना केली आहे. सीमा हैदर यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी एपी सिंह रबुपुरा येथे पोहोचले होते. सचिन आणि सीमा हैदर यांच्या वतीने एपी सिंह यांनी राष्ट्रपतींना याचिकाही दिली आहे. सीमा हैदरला भारताचे नागरिकत्व द्यावे. पाकिस्तानात पाठवू नये, असे याचिकेत म्हटले आहे.

सीमा आता भारताची मुलगी आहे  

बरेच लोक आहेत आणि अनेक मुली अशा आहेत, ज्यांच्याकडे अजून भारतीय नागरिकत्व नाही. अजूनही भारतात अभिमानाने राहतात. सीमा आता भारताची मुलगी आहे कारण तिने हिंदू धर्म स्वीकारला आहे. सीमा सिंदूर लावते. चुडा भरते आणि हाताला मेहंदी लावते. करवाचौथचे व्रतही दोनदा ठेवले आहे. सीमा हैदर म्हणण्याऐवजी सचिन मीना या नावाने हाक मारावी. ती आता भारताची मुलगी आहे. सीमाच्या पहिल्या पतीनेही घटस्फोट घेतल्याचे सांगितले आहे. अनेक वर्षे त्याला भेटलीही नाही, असे एपी सिंह यांनी सांगितले.

दरम्यान, सीमा बेकायदेशीरपणे भारतात आलेली नाही. तिच्याकडे नेपाळचा व्हिसा होता. त्यानंतरच सीमा भारतात दाखल झाली. नेपाळशी आमचे संबंध पूर्वीपासूनच चांगले आहेत. सीता माताही नेपाळमधून व्हिसा घेऊन भारतात आली होती का? अशी विचारणा एपी सिंह यांनी केली. सीमा आणि सचिन यांच्यात सच्चे प्रेम आहे. नेपाळमधील एका मंदिरात हिंदू परंपरांनुसार सीमाचे लग्न झाले. संशय असल्यास, लाय डिटेक्टर किंवा पॉलीग्राफी चाचणी घ्यावी. या प्रकरणाची सीबीआय किंवा रॉ मार्फत चौकशी झाली पाहिजे. सीमा निर्दोष आढळल्यास तिला भारतीय नागरिकत्व मिळालेच पाहिजे. यासोबतच त्याची सुरक्षाही सुनिश्चित करायला हवी, असेही एपी सिंह यांनी सांगितले. 

 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेश