शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

युपीत 'हर्ट'संबंधित पेशंट्सना वाटले जातात ग्रंथ 'रामायण अन् भगवत गीता'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2023 13:05 IST

ह्रदयरोगाशी संबंधित रुग्णांच्या संख्येत सातत्याने लक्षणीय वाढ होताना दिसत आहे.

कानपूर - उत्तर प्रदेशातील सर्वात मोठी कार्डिओलॉजी संस्था कानपूर येथे कार्यरत आहे. येथे उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णांना डॉक्टरांकडून भगवत गीता, रामायण यांसारखे ग्रंथ देतात. विशेष म्हणजे डॉक्टर्स आणि रुग्णांकडूनही याचे फायदे सांगितले जात आहेत. विज्ञान आणि अध्यात्माची सांगड घालून येथील रुग्णालयात रुग्णांवर केलेले उपचार रुग्णांच्या प्रकृती सुधारणेसाठी फायदेशीर ठरत असल्याचं डॉ. नीरजकुमार यांनी म्हटलं. 

ह्रदयरोगाशी संबंधित रुग्णांच्या संख्येत सातत्याने लक्षणीय वाढ होताना दिसत आहे. अनेकदा ह्रदयरोगाशी संबंधित समस्या जीवघेणी ठरत असल्याचेही दिसून आले आहे. कारण, ह्रदयाशी संबंधित रोगावर उपचार करण्यासाठी रुग्णांना कार्डिओलॉगी रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांच्या मनात एक भीती निर्माण होते, अनेक प्रश्न उपस्थित होतात. ही भीती आणि गोंधळेली परिस्थिती दूर करण्यासाठी उत्तर प्रदेशातील सर्वात मोठ्या सरकारी रुग्णालयाने असा पुढाकार घेतला आहे. 

कानपूर येथील कार्डिओलॉजीशी संबंधित ह्रदयरोगाच्या रुग्णांना धार्मिक व अध्यात्मिक उपचाराचा डोस दिला जात आहे. येथील रुग्णांना औषधोपचारासह भगवत गीता, सुंदरकांड, रामायण, हनुमान चालिसा यांची पुस्तक मोफत वाटण्यात येत आहेत. रुग्णालयात एखादा रुग्ण दाखल होताच, त्यांना ही पुस्तके दिली जातात. त्यानंतर, या पुस्तकांचे वाचन करण्याचा सल्लाही दिला जातो. आयुष्यातील ताणतणाव दूर होऊन जीवनाचा सार समजण्यासाठी हे ग्रंथ उपयुक्त आहेत, असं सांगण्यात येतं. 

वरिष्ठ ह्रदयरोग तज्ज्ञ नीरज कुमार यांच्याकडून ही सर्व प्रक्रिया राबविण्यात येत आहे. डॉ. नीरज कुमार म्हणतात, ह्रदयरोगाशी संबंधित रुग्णाला मानसिक व शारिरीकदृष्ट्या स्थीर ठेवणे गरजेचे असते. रुग्णाची प्रकृती आणखी खराब होऊ नये याची काळजी घेणे आवश्यक असते. त्यांचा बीपी, शुगर आणि पल्सरेट स्थीर ठेवणे गरजेचे असते. कारण, यापैकी काहीही वाढल्यास शस्त्रक्रिया करताना अडचणी निर्माण होतात. त्यावेळेस धार्मिक ग्रंथांचा मोठा आधार होतो, असे नीरजकुमार यांनी म्हटलं.

गेल्या १ वर्षांपासून हे काम सुरू असून या वर्षभरात जवळपास ६०० रुग्णांना धार्मिक ग्रंथांचं वाटप करण्यात आलं आहे. या पुस्तकांच्या वाचनामुळे रुग्णाच्या मनातील भीती दूर होऊन ते नॉर्मल वर्तणूक करतात. तसेच, शस्त्रक्रियेबाबत त्यांच्या मनातील भीतीही दूर होऊन जाते. दरम्यान, येथील रुग्ण सरोजिनी मिश्रा यांनीही धार्मिक ग्रंथांच्या वाचनाचे फायदे सांगितले आहेत. भगवतगीता वाचन केल्यामुळे ताकद आणि मन:शांती मिळत असल्याचं रुग्ण हरी यांनी म्हटलं. 

टॅग्स :doctorडॉक्टरhospitalहॉस्पिटलUttar Pradeshउत्तर प्रदेशramayanरामायणHeart Attackहृदयविकाराचा झटका