शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

युपीत 'हर्ट'संबंधित पेशंट्सना वाटले जातात ग्रंथ 'रामायण अन् भगवत गीता'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2023 13:05 IST

ह्रदयरोगाशी संबंधित रुग्णांच्या संख्येत सातत्याने लक्षणीय वाढ होताना दिसत आहे.

कानपूर - उत्तर प्रदेशातील सर्वात मोठी कार्डिओलॉजी संस्था कानपूर येथे कार्यरत आहे. येथे उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णांना डॉक्टरांकडून भगवत गीता, रामायण यांसारखे ग्रंथ देतात. विशेष म्हणजे डॉक्टर्स आणि रुग्णांकडूनही याचे फायदे सांगितले जात आहेत. विज्ञान आणि अध्यात्माची सांगड घालून येथील रुग्णालयात रुग्णांवर केलेले उपचार रुग्णांच्या प्रकृती सुधारणेसाठी फायदेशीर ठरत असल्याचं डॉ. नीरजकुमार यांनी म्हटलं. 

ह्रदयरोगाशी संबंधित रुग्णांच्या संख्येत सातत्याने लक्षणीय वाढ होताना दिसत आहे. अनेकदा ह्रदयरोगाशी संबंधित समस्या जीवघेणी ठरत असल्याचेही दिसून आले आहे. कारण, ह्रदयाशी संबंधित रोगावर उपचार करण्यासाठी रुग्णांना कार्डिओलॉगी रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांच्या मनात एक भीती निर्माण होते, अनेक प्रश्न उपस्थित होतात. ही भीती आणि गोंधळेली परिस्थिती दूर करण्यासाठी उत्तर प्रदेशातील सर्वात मोठ्या सरकारी रुग्णालयाने असा पुढाकार घेतला आहे. 

कानपूर येथील कार्डिओलॉजीशी संबंधित ह्रदयरोगाच्या रुग्णांना धार्मिक व अध्यात्मिक उपचाराचा डोस दिला जात आहे. येथील रुग्णांना औषधोपचारासह भगवत गीता, सुंदरकांड, रामायण, हनुमान चालिसा यांची पुस्तक मोफत वाटण्यात येत आहेत. रुग्णालयात एखादा रुग्ण दाखल होताच, त्यांना ही पुस्तके दिली जातात. त्यानंतर, या पुस्तकांचे वाचन करण्याचा सल्लाही दिला जातो. आयुष्यातील ताणतणाव दूर होऊन जीवनाचा सार समजण्यासाठी हे ग्रंथ उपयुक्त आहेत, असं सांगण्यात येतं. 

वरिष्ठ ह्रदयरोग तज्ज्ञ नीरज कुमार यांच्याकडून ही सर्व प्रक्रिया राबविण्यात येत आहे. डॉ. नीरज कुमार म्हणतात, ह्रदयरोगाशी संबंधित रुग्णाला मानसिक व शारिरीकदृष्ट्या स्थीर ठेवणे गरजेचे असते. रुग्णाची प्रकृती आणखी खराब होऊ नये याची काळजी घेणे आवश्यक असते. त्यांचा बीपी, शुगर आणि पल्सरेट स्थीर ठेवणे गरजेचे असते. कारण, यापैकी काहीही वाढल्यास शस्त्रक्रिया करताना अडचणी निर्माण होतात. त्यावेळेस धार्मिक ग्रंथांचा मोठा आधार होतो, असे नीरजकुमार यांनी म्हटलं.

गेल्या १ वर्षांपासून हे काम सुरू असून या वर्षभरात जवळपास ६०० रुग्णांना धार्मिक ग्रंथांचं वाटप करण्यात आलं आहे. या पुस्तकांच्या वाचनामुळे रुग्णाच्या मनातील भीती दूर होऊन ते नॉर्मल वर्तणूक करतात. तसेच, शस्त्रक्रियेबाबत त्यांच्या मनातील भीतीही दूर होऊन जाते. दरम्यान, येथील रुग्ण सरोजिनी मिश्रा यांनीही धार्मिक ग्रंथांच्या वाचनाचे फायदे सांगितले आहेत. भगवतगीता वाचन केल्यामुळे ताकद आणि मन:शांती मिळत असल्याचं रुग्ण हरी यांनी म्हटलं. 

टॅग्स :doctorडॉक्टरhospitalहॉस्पिटलUttar Pradeshउत्तर प्रदेशramayanरामायणHeart Attackहृदयविकाराचा झटका