शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

यूपीमध्ये 'गेम पलटी'? उद्या राज्यसभेसाठी मतदान, आज अखिलेश यांचे ८ आमदार बैठकीला गैरहजर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2024 22:11 IST

भाजपाच्या आठव्या उमेदवाराला क्रॉस वोटिंग होण्याची शक्यता वर्तवली जात आहे

UP Politics Akhilesh Yadav Rajya Sabha Elections: उत्तर प्रदेशातील राज्यसभेच्या १० जागांसाठी मंगळवारी होणाऱ्या निवडणुकांपूर्वी सपा-भाजपा आपापल्या आमदारांना एकत्रित ठेवण्यात व्यस्त आहे. सोमवारी रात्री भाजपा-सपाने आपापल्या आमदारांना डिनरसाठी बोलावले. त्यात सपाचे आठ आमदार डिनरला गेले नाहीत. त्यामुळे मंगळवारी होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीत बाजी पलटणार आणि 'क्रॉस व्होटिंग' होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सपा आमदारांच्या बैठकीला उपस्थित न राहणाऱ्यांमध्ये राकेश पांडे, राकेश सिंह, विनोद चतुर्वेदी, महाराजी प्रजापती, पूजा पाल आणि पल्लवी पटेल यांचा समावेश आहे. अभय सिंह आणि मनोज पांडे येणार नसल्याचेही बोलले जात आहे. अशा परिस्थितीत राज्यसभेच्या निवडणुकीत सपाच्या आमदारांनी क्रॉस व्होट केले तर अखिलेश यादव यांच्यासाठी अडचणी वाढू शकतील. कारण राजा भैय्या यांनी राज्यसभा निवडणुकीत भाजपच्याच उमेदवाराला पाठिंबा देणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

राज्यसभेसाठी सपाकडून तीन उमेदवार घोषित करण्यात आले असून त्यात जया बच्चन, आलोक रंजन आणि रामजी लाल सुमन यांचा समावेश आहे. सपाचे दोन उमेदवार सहज विजयी होतील, मात्र तिसऱ्या उमेदवारासाठी ते अवघड जाणार आहे. अशा परिस्थितीत सपाचे आमदार डिनरसाठी न येणे हा अखिलेश यादव यांच्यासाठी चिंतेचा विषय बनला आहे.

राज्यसभेच्या १० जागांसाठी ११ उमेदवार, भाजपाने आठवा उमेदवार उभा केल्याने खेळ बिघडला...

उत्तर प्रदेशमध्ये राज्यसभेच्या १० जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात आहेत. भाजपने आठ उमेदवार उभे केले आहेत. त्याचवेळी सपाकडून तीन उमेदवार उभे करण्यात आले आहेत. एक जागा जिंकण्यासाठी ३७ आमदारांचा पाठिंबा आवश्यक आहे. भाजपच्या सात उमेदवारांचा विजय निश्चित मानला जात आहे. दुसरीकडे, सपाचे दोन उमेदवार सहज विजयी होतील, परंतु भाजपने आपला आठवा उमेदवार उभे केल्यामुळे सपाची तिसरी जागा अडचणीत आली आहे.

कोणाकडे किती आमदार?

उमेदवाराला विजयासाठी ३७ मतांची आवश्यकता आहे. अशा परिस्थितीत सपाला आपल्या तीन उमेदवारांना विजयी करण्यासाठी १११ मतांची गरज आहे. सपाच्या १०८ आमदारांमध्ये पल्लवी पटेल यांचाही समावेश आहे, ज्या सध्या नाराज असल्याचे बोलले जात आहे. एनडीएमध्ये भाजपकडे 252 आमदार आहेत, अपना दल एसकेकडे 13, आरएलडीकडे 9, निषाद पक्षाकडे 6, सुभासपाकडे 6 आमदार आहेत. एकूण 286 आमदार एनडीएसोबत आहेत. राजा भैय्या यांच्या पक्षाचेही दोन आमदार भाजपाला पाठिंबा देणार आहेत. काँग्रेसचे दोन आणि बसपचे एक आमदार आहेत, त्यांच्याबद्दल काहीही सांगता येणार नाही.

भाजपचे राज्यसभेचे उमेदवार

भाजपच्या वतीने माजी केंद्रीय मंत्री आरपीएन सिंह, राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी, माजी खासदार तेजवीर सिंह, माजी महापौर नवीन जैन, माजी मंत्री संगीता बळवंत, प्रदेश सरचिटणीस अमरपाल मौर्य, माजी आमदार साधना सिंह आणि संजय सेठ यांनी अर्ज दाखल केले आहेत.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशRajya Sabhaराज्यसभाElectionनिवडणूकVotingमतदानAkhilesh Yadavअखिलेश यादव