शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणं युद्धासारखंच!
2
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
3
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
4
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
5
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
6
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
7
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
8
पहलगाम हल्ल्यानंतर भारतात होणारी मोठी स्पर्धा पुढे ढकलली
9
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
10
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
11
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
12
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
13
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
14
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
15
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
16
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
17
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
18
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
19
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
20
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान

"अग्निवीर योजना फाडून कचऱ्यात फेकून देऊ", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2024 17:41 IST

Lok Sabha Election 2024 : राहुल गांधी यांनी मतदारांना संबोधित केले. यावेळी राहुल यांनी स्मार्ट सिटीचा मुद्दा उपस्थित केला.

झाशी : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेशातील झाशी येथे जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी अखिलेश यादव यांनीऔषधांची महागाई, कोरोना लसीचा धोका आणि गरीब रेशन' या मुद्द्यावर भाष्य केले.ही निवडणूक म्हणजे महासागर मंथन आणि संविधान मंथनासारखी आहे. ही निवडणूक संविधान बदलण्याची भाषा करणाऱ्यांच्या विरोधात मतदान करणार आहे, असे अखिलेश यादव म्हणाले. 

अखिलेश यांच्यानंतर राहुल गांधी यांनी मतदारांना संबोधित केले. यावेळी राहुल यांनी स्मार्ट सिटीचा मुद्दा उपस्थित केला.  स्मार्ट सिटीच्या नावाने झाशीत छत्री टांगण्यात आली आहे, असे राहुल म्हणाले. तसेच, भाजपा सरकारवर हल्लाबोल करताना राहुल गांधी म्हणाले, ही निवडणूक संविधान वाचवण्यासाठी आहे. संविधानाशिवाय भारतातील गरीब जनतेला स्थान नाही. इंडिया आघाडी संविधानाच्या रक्षणासाठी लढत आहे. तर भाजपा, आरएसएस, नरेंद्र मोदी यांना हे संविधान फाडून फेकून द्यायचे आहे."

याचबरोबर, राहुल गांधी यांनी करोडो तरुण आणि महिलांचे जीवन बदलण्याचे आश्वासन दिले. राहुल गांधी पुढे म्हणाले, "नरेंद्र मोदींच्या सरकारने 22 अब्जाधीशांचे 16 लाख कोटी रुपये माफ केले, तर आमच्या सरकारच्या काळात हा पैसा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर खर्च झाला. बुंदेलखंडमधील जनता आणि शेतकऱ्यांसाठी आम्ही क्रांतिकारी काम करू. आम्ही प्रत्येक कुटुंबातील एका महिलेला लखपती बनवू." 

पुढे राहुल गांधी म्हणाले की, "आम्ही अग्निवीर योजना फाडून टाकू आणि कचऱ्यात फेकून देऊ. आम्ही शहीद जवानांसोबत भेदभाव करू देणार नाही. तसेच, मोफत धान्य योजना काँग्रेस सरकारने आणली होती. आमचे सरकार आल्यानंतर आम्ही त्याअंतर्गत अधिक, चांगल्या दर्जाचे रेशन देऊ, असे सांगत गरीब, शेतकरी आणि कमकुवत लोकांचे सरकार बनवायला हवे, अंबानी-अदानी सरकार हटवायला हवे, असे राहुल गांधी म्हणाले.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Uttar Pradesh Lok Sabha Election 2024उत्तर प्रदेश लोकसभा निवडणूक निकाल २०२४Akhilesh Yadavअखिलेश यादव