शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

एक कोटी घेण्यास गीता प्रेसचा नकार, गांधी शांतता पुरस्कार जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2023 10:28 IST

२०२१ सालासाठीचा गांधी शांतता पुरस्कार जाहीर झाल्यानंतर उत्तर प्रदेशातील या संस्थेच्या विश्वस्तांची रविवारी रात्री एक बैठक झाली.

गोरखपूर : हिंदूंच्या धार्मिक ग्रंथांचे जगातील सर्वात मोठे प्रकाशक असलेल्या गीता प्रेसला गांधी शांतता पुरस्कार जाहीर झाल्यानंतर राजकीय वादंग निर्माण झाले होते. त्या पार्श्वभूमीवर या पुरस्काराची एक कोटी रुपयांची रक्कम न स्वीकारण्याचा निर्णय गीता प्रेसने घेतला आहे.

२०२१ सालासाठीचा गांधी शांतता पुरस्कार जाहीर झाल्यानंतर उत्तर प्रदेशातील या संस्थेच्या विश्वस्तांची रविवारी रात्री एक बैठक झाली. त्यात पुरस्काराची रक्कम न स्वीकारण्याचा निर्णय घेण्यात आला. विश्वस्तांनी सांगितले की, आमची संस्था कोणाकडूनही देणग्या स्वीकारत नाही. त्या परंपरेला अनुसरून आम्ही हा निर्णय घेतला. हा पुरस्कार जाहीर केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय सांस्कृतिक कार्यमंत्र्यांचे गीता प्रेसने आभार मानले आहेत. 

सनातन धर्माच्या तत्त्वांचा प्रसार करण्यासाठी जय दयाल गोयंका व घनश्यामदास जालन यांनी १९२३ साली गोरखपूर येथे गीता प्रेसची स्थापना केली होती. या संस्थेचे व्यवस्थापक लालमणी त्रिपाठी यांनी सांगितले की, गांधी शांतता पुरस्कार जाहीर होणे हा आमच्यासाठी मोठा सन्मान आहे.

गीता प्रेसची नाळ भारतीय संस्कृतीशीगीता प्रेसला गांधी शांतता पुरस्कार जाहीर केल्याबद्दल काँग्रेसने टीका केली होती. त्याला उत्तर देताना केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी म्हटले होते की, मुस्लिम लीग ही सेक्युलर संघटना आहे असे विचार मांडणारे लोक वगळले तर अन्य कुणीही गीता प्रेसला गांधी शांतता पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल टीका केलेली नाही. गीता प्रेस ही भारतीय संस्कृती व हिंदूच्या श्रद्धांशी जोडलेली संस्था आहे. असेही ते म्हणाले.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेश