शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

एक कोटी घेण्यास गीता प्रेसचा नकार, गांधी शांतता पुरस्कार जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2023 10:28 IST

२०२१ सालासाठीचा गांधी शांतता पुरस्कार जाहीर झाल्यानंतर उत्तर प्रदेशातील या संस्थेच्या विश्वस्तांची रविवारी रात्री एक बैठक झाली.

गोरखपूर : हिंदूंच्या धार्मिक ग्रंथांचे जगातील सर्वात मोठे प्रकाशक असलेल्या गीता प्रेसला गांधी शांतता पुरस्कार जाहीर झाल्यानंतर राजकीय वादंग निर्माण झाले होते. त्या पार्श्वभूमीवर या पुरस्काराची एक कोटी रुपयांची रक्कम न स्वीकारण्याचा निर्णय गीता प्रेसने घेतला आहे.

२०२१ सालासाठीचा गांधी शांतता पुरस्कार जाहीर झाल्यानंतर उत्तर प्रदेशातील या संस्थेच्या विश्वस्तांची रविवारी रात्री एक बैठक झाली. त्यात पुरस्काराची रक्कम न स्वीकारण्याचा निर्णय घेण्यात आला. विश्वस्तांनी सांगितले की, आमची संस्था कोणाकडूनही देणग्या स्वीकारत नाही. त्या परंपरेला अनुसरून आम्ही हा निर्णय घेतला. हा पुरस्कार जाहीर केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय सांस्कृतिक कार्यमंत्र्यांचे गीता प्रेसने आभार मानले आहेत. 

सनातन धर्माच्या तत्त्वांचा प्रसार करण्यासाठी जय दयाल गोयंका व घनश्यामदास जालन यांनी १९२३ साली गोरखपूर येथे गीता प्रेसची स्थापना केली होती. या संस्थेचे व्यवस्थापक लालमणी त्रिपाठी यांनी सांगितले की, गांधी शांतता पुरस्कार जाहीर होणे हा आमच्यासाठी मोठा सन्मान आहे.

गीता प्रेसची नाळ भारतीय संस्कृतीशीगीता प्रेसला गांधी शांतता पुरस्कार जाहीर केल्याबद्दल काँग्रेसने टीका केली होती. त्याला उत्तर देताना केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी म्हटले होते की, मुस्लिम लीग ही सेक्युलर संघटना आहे असे विचार मांडणारे लोक वगळले तर अन्य कुणीही गीता प्रेसला गांधी शांतता पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल टीका केलेली नाही. गीता प्रेस ही भारतीय संस्कृती व हिंदूच्या श्रद्धांशी जोडलेली संस्था आहे. असेही ते म्हणाले.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेश